Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

मान गये आपको, श्रीयुक्त चंद्रशेखर बावनकुळे!!

Vikrant Joshi by Vikrant Joshi
May 31, 2022
in Politics, Social
0
Maan Gaye Aapko, Shri Chandrashekhar Bawankule!!

मान गये आपको, श्रीयुक्त चंद्रशेखर बावनकुळे!!
-विक्रांत हेमंत जोशी

भाजपचे आमदार आणि नेते चंद्रशेखर बानकुळे यांच्या मुलाचे लग्न झाले. मी स्वत जातीने या विवाह सोहळ्याला पर्वा नागपूरात हजर होतो. या लग्नाचे वैशिष्ट्य कोणी विचारले तर मी त्यांना सांगेन की या लग्नाने सर्वांना एकत्र केले. सध्या महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती अशी आहे की, एक हिंदू पक्ष दुसर्‍या पक्षाशी भांडत आहे, एक धर्मनिरपेक्ष पक्ष उजव्या विचारसरणीशी जुळवून घेतोय, काका स्वतःच्या पुतण्याच्या विरोधात आहेत, अशावेळी या लग्नाने सर्वांना एकत्र केले. या लग्नात अनेकजण एकत्र आले. त्यांच्यात चर्चा, हास्य विनोद झाले. ते एकत्र जेवले आणि आनंदाने एकत्र, एकाच विमानातून आले आणि मग परत सुद्धा एकत्र गेले. हे कोणामुळे घडले? ही किमया केली चंद्रशेखर बावनकुळे यांनी !!त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करणे हे मी माझे कर्तव्य समजतो.

बावनकुळे पुत्र आणि भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी संकेत यांचा अनुष्का यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी विवाह झाला. महाराष्ट्रातील सर्वच राजकीयदृष्ट्या वजनदार मंडळी या लग्नात एकत्र आली होती. राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्योगपती गौतम अदानी यांचे संकेत आणि अनुष्का यांना आशीर्वाद मिळाले. योगगुरू रामदेव बाबा, राज्यपाल कोशियारी, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, संजय राऊत, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि अशी अनेकजण या लग्नात उपस्थित होते. प्रत्येकजण आपापल्या विचारधारा, पक्ष बाजूला ठेवून आले होते. काही केंद्रीय मंत्र्यांनीही येऊन या जोडप्याला आशीर्वाद दिले. सनदी अधिकारीही उपस्थित होते. मला असे वाटते की संपूर्ण आयएएस आणि आयपीएस अधिकारी या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. आमचे आणि बावनकुळे यांच्या कुटुंबात एक खास बंध आहे. त्यामुळे माझे वडील पुण्यात आयोजित रिसेप्शनला गेले आणि मी नागपूरला गेलो आणि सोहळा भव्यदिव्य होता. त्यातही सोहळ्यास सहभागी झालेल्या लोकांनी त्याला चार चांद लावले.

एवढ्या मोठ्या लग्नाचे आयोजन नियोजनबद्ध केल्याबद्दल संपूर्ण प्लॅनिंग टीमला सलाम. मला सांगण्यात आले की हे नियोजन जवळपास २ महिने सुरू होते. स्टेजवर कोण उभं राहणार ते व्हीआयपींना कोण स्टेजवर आणणार आणि गेटपर्यंत सोडणार, सगळं अगदी परफेक्ट होते! तसेच जे लोक उपस्थित होते, ते सामान्य नव्हते. मी म्हटल्याप्रमाणे राज्यात राजकीय पेचप्रसंग सुरू असताना, विविध पक्षांतील इतक्या लोकांना आमंत्रित करणे, त्यांना एकत्र आणणे हे काही सोपे काम नव्हते. बावनकुळे स्वत: सर्वांच्या घरी निमंत्रण घेऊन गेले. सोहळ्यात सहभागी 90% लोक मुंबईतून आले होते. ते सगळेच्या सगळे सोहळ्यात सहभागी झाले हे केवळ बावनकुळे यांच्या प्रेमापोटी. तसेच संकेत आणि अनुष्काला आशीर्वाद देण्यासाठी.

आता थोडा राजकीय मुद्दा ! बावनकुळे हे ओबीसींचे नवे नेते म्हणून उदयाला आलेले आहेत. लिहून ठेवा !!!मुंडे, भुजबळांचा काळ आता अस्ताला जात आहे. बावनकुळे हे नव्या युगातील ओबीसी नेते आहेत. जे काही मी आणि माझ्या वडिलांनी गेल्या 4 दिवसात अनुभवले ते सगळं बघून सांगतोय…एरव्ही पवारांसारखे बडे लोक स्टेजवर जातात, नवविवाहितांना आशीर्वाद देतात आणि लगेचच सोहळ्यातून काढता पाय घेतात. तेही या लग्नात जवळपास तासभर थांबले होते. जवळच्या व्यक्तींच्या लग्नाला दोनदा उपस्थित न राहणारे देवेंद्र फडणवीस पुणे आणि नागपूर या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित होते. पुण्यातील रिसेप्शनला मुकलेले लोक 39 अंश सेल्सियस तापमानातही नागपूरच्या रिसेप्शनला उपस्थित होते. राणे, शेलार, मुनगटीवार आणि इतर अनेक खासदार आणि आमदार नागपुरात होते. हे सर्व का घडले आणि सर्वजण इतक्या उत्साहाने का आले हे तुम्हाला माहीत आहे?

याचे श्रेय बावनकुळे यांना जाते. 2019 साली पक्षाने त्यांना तिकीट नाकारले, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सर्वाधिक काम करूनही तिकीट नाकारल्यामुळे ते खूप दुःखी होते! तेव्हा मी त्यांच्याशी ४५ मिनिटे फोनवर बोललो होतो, मला आठवते. माझ्या वडिलांनीच सल्ला दिला होता, की त्यांनी पक्षासाठी काम करत राहिल्यास एक दिवस पक्षाला आपली चूक कळेल आणि तेच घडले. ते दोन वर्षातच एमएलसी झाले. त्यांनी एकनाथ खडसे टाळले. बावनकुळे हे गडकरी आणि फडणवीस यांना तितकेच प्रिय आहेत. कॉर्पोरेट्सशीही त्याचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे लग्नात गौतम अदानीसारखी व्यक्तीही आली आणि खूप वेळ होती. बावनकुळे यांच्या चेहऱ्यावर सदोदित असलेले हास्य, 2014-2019 या काळात ऊर्जामंत्री असताना जो कोणी आला त्याला मदत करण्याची इच्छा यामुळे ते लोकप्रसिद्ध झाले. आता नागपूरचे पालकमंत्री, ऊर्जामंत्री आहेत आणि मुख्यमंत्री जेव्हा मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी येतात तेव्हा वीज जाते. बावनकुळे यांना रा.स्व. संघाचाही पाठिंबा आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी त्यांना शुभेच्छा पाठवल्या.बावनकुळे एक विदर्भवादी आणि एक नागपूरकर खूप उंचीवर पोहोचले आहेत. आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे.

बावनकुळे यांना देवाने त्याला एक सुंदर कुटुंबही दिले आहे. कुटुंबाने साथ दिली तरच माणूस आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो. घर म्हणजे पत्नी आणि मुले. त्यांची साथ बावनकुळे यांना आहेच. त्यामुळे आज ते इतके मोठे होऊ शकले आहेत. बावनकुळेजी, माझ्या आपणास शुभेच्छा. संकेत आणि अनुष्काचे पुन्हा एकदा अभिनंदन.

-विक्रांत हेमंत जोशी

Tags: #bjp #mlc #bjp #chandrashekharbawankule #devendrafadnavis
Previous Post

Maan Gaye Aapko, Shri Chandrashekhar Bawankule!!

Next Post

इकडले तिकडले राज्यातले…

Vikrant Joshi

Vikrant Joshi

Last 14 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!

Next Post

इकडले तिकडले राज्यातले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.