भंडारींचा भंडारा : पत्रकार हेमंत जोशी

भंडारींचा भंडारा : पत्रकार हेमंत जोशी 

जेथे खूप माणसे एकत्र जमतात त्याला भंडारा म्हणतात. माधव भंडारी राज्यातल्या भाजपच्या स्टार प्रचारकांपैकी एक आहेत. त्यांची भाषेवर कमांड आहे म्हणून त्यांना राज्यात स्टार प्रचारक आणि विविध वाहिन्यांवर डिमांड आहे. त्यांनी यावेळी लोकसभेचे प्रचारतंत्र मोठ्या खुबीने सांभाळले आहे. अत्यंत महत्वाचे जे इतरांना फारसे ठाऊक नाही ते म्हणजे या राज्यातल्या माजी सैनिकांच्या विविध अडचणी कायम सतत शासन दरबारी सोडविण्यात माधव भंडारी आघाडीवर असतात त्यातून जवळपास एक हजार माजी सैनिक दिवसरात्र राज्यभर दौरे काढून तेही स्वखर्चाने संघप्रचारकांनी देखील प्रसंगी कौतुक करावे पद्धतीने स्वतःला प्रचारकार्यात गुंतवून घेतलेले आहे. एकाचवेळी मुंबईच्या भाजपा मुख्यकार्यालयात ठाण मांडून बसायचे तेथे मीडिया सांभाळायची, वेळात वेळ काढून राज्यभर फिरून प्रचार देखील करायचा, लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी नेमकी दाखल घेऊन भंडारी यांचे जाहीर कौतुक नक्की करावे…


www.vikrantjoshi.com


माधव भंडारी जसे मीडिया साम्भाळतायेत त्यांच्या या रांगेत नक्कीच केशव उपाध्ये आणि विनोद तावडे यांचेही कौतुक व्हायला हवे पण लोकमत मध्ये यदु जोशी यांनी केवळ विनोद तावडे यांचीच तेवढी दखल घेतलेली दिसते, बदल्यांचे दिवस नजीक असल्याने कदाचित शिक्षणमंत्र्यांचे तेवढे कौतुक यदु जोशी यांच्याकडून झाले असावे त्यांच्या पत्नी शिक्षण खात्यात नोकरीला 

आहेत. हो सांगूनही तावडे मदतीला येतील हे मात्र तितकेसे खरे नसते, सावध असावे लागते. या लोकसभा निवडणुकीनिमित्ते अनेक मंत्र्यांना आम्ही कसे स्टार प्रचारक, दाखवून देण्याची नामी संधी होती, बहुतेकांनी ती गमावलेली असल्याने भविष्यात गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, बावनकुळेंच्या रांगेत कोणी बसलेले असेल वाटत नाही. जो मंत्री लोकप्रिय ठरतो त्याला पुढे पुढे जाण्याच्या संधी आपोआप चालून येतात. त्यामानाने पंकजा मुंडे यांनी त्यांच्या वडिलांच्या पश्चात मराठवाड्यातला गड आणि त्यांचा समाज छान पद्धतीने हाताळल्याचे दिसते. काही मोह त्यांनी सांभाळले असते तर धनंजय मुंडे यांचे महत्व वाढले नसते त्यांची आदळआपट जनतेने दुर्लक्षित केली असती. पण गरज नसतांना पंकजा यांनी नको ते उद्योग करण्याची घाई केली, स्वतःचे मोठे राजकीय नुकसान करवून घेतले, सभोवताली सतीश मुंडे यांच्यासारखे खादाड सल्लागार असले कि असे होते, यापुढे त्यांनी सावध असावे, चांगली माणसे भोवताली उभे करावेत म्हणजे बदनामी होणार नाही, त्यांचे राजकीय भविष्य नक्की ‘उज्वल’ असेल अन्यथा धनंजय यांचे फावेल…


विनोद तावडे यांच्यावर असलेली जबाबदारी तशी फुटकळ स्वरूपाची आहे, म्हणाल तर केलेल्या राजकीय चुका त्यांना एक मंत्री म्हणून भोवल्या आहेत, नेमका राजकीय फायदा आशिष शेलार यांना झाला आहे. मात्र माधव भंडारी किंवा केशव उपाध्ये यांच्या तोंडाला कुलूप लावल्या गेले आहे हे यदु जोशी यांचे लिहिणे म्हणजे माहिती न घेता थापा मारल्या म्हणणे अधिक उचित ठरावे. भंडारी किंवा उपाध्ये दिवसभरात नेमके कसे महत्वाचे काम पार पडतात, यदु जोशी यांनी भाजपा मुख्य कार्यालयात बसून माहिती घ्यावी म्हणजे विनोद तावडे यांची उगाचच तळी उचलल्याचे त्यांच्या अगदी सहज लक्षात येईल. एखाद्यावर कायम खुन्नस ठेवून नेमकी कामे कोणाकडे पद्धतीची पत्रकारिता निदान यदु जोशी यांना फारशी शोभणारी नाही पण त्यांचा मूळ स्वभाव अधून मधून उचल खातो असे दिसते म्हणजे बार गर्ल म्हणून काम सोडलेली नर्तिका लग्नानंतर देखील जशी मधूनच ठुमका घेत नवऱ्यासमोर नाचून महागड्या वस्तूची डिमांड करते तसे हे यदु कडून घडले कि काय, म्हणावे लागेल….


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *