पवार पंगा आणि पॉलिटिक्स : पत्रकार हेमंत जोशी

पवार पंगा आणि पॉलिटिक्स : पत्रकार हेमंत जोशी 

एखाद्या जंगलातला वाघ आजन्म ब्रह्मचारी राहणे पसंत करेल पण तो कामांध होऊन कधीही मांजरीच्या किंवा हरीणीच्या ओठांचे दीर्घ चुंबन घेणार नाही. पत्रकार उदय तानपाठक जरी एखाद्या घनदाट जंगलात अडकला तरीही तो तेथे एकटा नसेल माकड कोल्हा हरीण गेंडा अस्वल इत्यादींशी लगेच जुळवून त्यांना खदाखदा हसवून त्यांच्याशी गहिरी मैत्री करून मोकळा होईल. असे अनेक मंत्री माझ्या बघण्यातले कि त्यांना जरी थेट लंडनच्या इंग्रजाने शिकवणी दिली तरी त्यांना इंग्रजी येणार नाही. याउलट शिकवणी देणारा मराठी बोलायला लागेल. असे म्हणणारे म्हणतात कि हे दादांच्या बाबतीत प्रत्यक्षात घडले आहे म्हणजे इंग्रजी शिकवायला आलेली गोरी बाई पुढे इथलीच झाली आणि पुण्यात राहून लावण्यांचे कार्यक्रम करून पॉट भरण्यासाठी अस्क्खलीत मराठी बोलायला शिकली, जसे गोठ्यात ठेवलेला एक घाणेरडा बोकड त्याच्या जवळून जरी गेले तरी प्रत्येकजण क्षणार्धात नाक दाबून बाहेर येत असे पण नागपुरातून मुंबईत शिफ्ट झालेला एक पत्रकार त्या बोकडाजवळ गेल्यानंतर ते बोकड गळ्यात बान्धलेला दोर तोडून सैरावैरा धावत सुटले होते अर्थात हे सारे मला त्या शरद पवार यांच्यामुळे आठवले…. 

जसे एकदा भयावह कर्क रोगावर उपचार करतांना याच शरद पवारांनी थेट यमाला त्याच्याशी मस्त गप्पा मारून त्याला रिकाम्या हाताने माघारी धाडले होते तसे हेच शरद  पवार उद्या त्यांच्या मनात आले तर गणपतीला पण बारामतीला तेही स्वर्गातून बोलावून घेतील, गप्पा मारतील, नेम नाही पवारांकडे गणपतीचाही नक्की भ्रमणध्वनी असू शकतो, पण शरद पवार आपणहून गणपतीची स्थापना झाल्यानंतर तेही सह कुटुंब मात्र एखाद्याच्या घरी दर्शनाला गेले ना कोणी ऐकले ना कोणी बघितले, अगदी फौजिया खान पासून तर हेमंत टकले यांच्यापर्यंत अनेकांना माझे विचारून झाले. पण हेच अनप्रेडिक्टेबल शरद पवार यावर्षी तेही उद्धव ठाकरे यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला सहकुटुंब जाऊन आले विशेष म्हणजे त्यांनी हे दर्शन घेणे म्हणे मुद्दाम मीडियाला पण दाखवून दिले अर्थात त्यातून त्यांना हेच नक्की सुचवायचे होते कि उद्धवजी तुमच्यावर ओढवलेल्या या कठीण प्रसंगी मी सहकुटुंब तुमच्या पाठीशी आहे तरीही पवारांच्या या सूचक क्रियेवर उद्धव यांनी लगेच खुश होऊन सभोवताली गिरक्या घेऊन नाचू नये कारण पवारांचे तर ठरले आहे कि ते जे दाखवतात त्याच्या नेमके उलट देखील करतात वागतात किंवा क्रिया घडवून आणतात, कोरोना महामारीनंतर पवार त्यांच्या स्वभावाला साजेल असाच निर्णय घेऊन मोकळे होतील असे वाटते आहे… 

दिनांक ६ सप्टेंबरला नारकॉटिक्स केंद्रीय कार्यालयात जेथे रिया आणि कंपूची ड्रग्स प्रकरणी गंभीर चौकशी सुरु आहे त्या कार्यालया खाली दुपारपासून अचानक पोलिसांची मोठी कुमक मागवण्यात आली थोडक्यात तेथला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. मीडियाने उथळ तेही विभत्स व ओंगळ भोंगळ आपले प्रदर्शन वास्तविक करवून घेऊ नये असे मी वारंवार जे बजावत असतो त्याची प्रचिती ६ सप्टेंबरला तेथे आली म्हणजे तेथे उपस्थित विशेषतः रिपब्लिक भारत आणि इतरही काही वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी बोंबलायला सुरवात केली कि थोड्याच वेळात रिया चक्रवर्तीला अटक होत असल्याने हा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नेमकी माहिती न घेता उचलली जीभ लावली टाळूला पद्धतीने वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी असे बोंबलत सुटू नये त्यातून उगाच जगभरातल्या भारतीय दर्शकांच्या मनाची अस्वस्थता वाढते. वास्तविक दाऊद कडून ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री बॉम्ब ने उडवून देण्याची जी धमकी देण्यात आली होती त्या पार्शवभूमीवर तेही ड्रग्स तस्करीत दाऊद गॅंग चा १००% सहभाग असल्याने केवळ प्रिकॉशन म्हणून मुंबई पोलिसांनी स्वतःहून नारकॉटिक्स कार्यालयासमोर बंदोबस्त वाढवला होता, वाढवला आहे. काहीतरी चुकीचे अंदाज काढायचे आणि बातमी पसरवून मोकळे व्हायचे, वाहिन्यांचे हे असे उथळ वागणे कोणत्याही वाहिनीला  व त्यांच्या प्रतिनिधींना शोभणारे नाही अन्यथा भल्याभल्यांचा मग वाह्यात राजदीप सरदेसाई होतो ज्यांच्या तोंडावर थुंकावेसे वाटते. अत्यंत महत्वाचे म्हणजे, थर्डग्रडे रिया चक्रवर्ती हि विनायक दामोदर सावरकर नव्हे, कि तिला अटक करताना पोलिसांची गरज भासावी… 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *