पुन्हा शत प्रतिशत भाजपा :पत्रकार हेमंत जोशी

पुन्हा शत प्रतिशत भाजपा :पत्रकार हेमंत जोशी 

सुपारीच घ्यायची असेल, पैसे उकळण्यासाठी केवळ लिहायचे असेल तर फक्त भाजपा का, इतरही मला त्यांची बाजू घेण्याचे पैसे देतील कारण माझे २० लाख मराठी वाचक हि संख्या कमी नाही त्यामुळे लिखाणाची चर्चा तर होतेच शिवाय सारेच्या सारे वाचक अफलातून, सामान्य वाचक तसे फारच कमी त्यामुळे लिखाणाचा इफेक्ट मोठा होतो पण असे पैसे मिळविण्याची सुपारी घेण्याची मला अजिबात गरज नाही, जे मला जवळून बघतात ओळखतात त्यांना माझी आर्थिक बाजू माहित असल्याने ते तर नक्की त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. सतत ३९-४० वर्षे अतिशय जवळून हे राज्य चालविणारे जे नेते, मंत्री, अधिकारी, मुख्यमंत्री, कंत्राटदार, दलाल, विरोधी पक्षातले, मीडिया  इत्यादी मोजके आहेत, राज्यातल्या त्या प्रत्येकाला मी अतिशय निरखून ओळखून आहे, जे बदमाश आहेत त्यांच्या विरुद्ध सतत लिहितो हे तुम्हाला चांगले ठाऊक आहे पण जे लिहितो ते हिमनगाचे एक टोक असते, बरीचशी अस्वस्थता मनातल्या मनात ठेवावी लागते. १९८० ते आजतागायत त्यातल्या त्यात जे बरे राज्यकर्ते होते त्यांचे अपेक्षाविरहित कौतुक केले आणि करीत राहीन. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा त्यांच्या मंत्रिमंडळासहित निवडणुकीला सामोरे जात आहेत, त्यातल्या त्यात आजतागायत राज्याचे कोण भले करणारे तर सतत नजरेसमोर येतात फडणवीस आणि त्यांचे अनेक सहकारी म्हणून राज्याचे भले करणारे फडणवीस सरकार पुन्हा सत्तेत यावे त्यासाठी गेले काहीच दिवस माझा हा तोकडा प्रयत्न सुरु आहे. तुम्ही कदाचित वेगळ्या विचारांचे वेगवेगळ्या नेत्यांना मानणारे असाल त्यामुळे माझे लिखाण कदाचित तुम्हाला अस्वस्थ करणारे असेल पण केवळ राज्याच्या निदान आज तरी हिताच्या दृष्टीने विशेष म्हणजे साऱ्या वर्गातल्या विविध जाती धर्माच्या अगदी मुस्लिमांच्या देखील हितासाठी पुन्हा एकवार सेना भाजपा युती सरकार विशेषतः फडणवीस सत्तेत येणे नक्की गरजेचे आहे ते इतर आधीच्या सत्ताधारयांपेक्षा शतपटीने सध्यातरी खूप चांगले असल्याने त्यांची नेमकी चांगली बाजु अगदी जशीच्या तशी तुमच्यासमोर सतत मांडतो आहे, गोड करून घ्या, मत परिवर्तन नक्की करा जर तुम्ही वेगळ्या विचारांचे असलात तरच…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *