मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती : बाळासाहेब पाटील: पत्रकार हेमंत जोशी


मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती : बाळासाहेब पाटील: पत्रकार हेमंत जोशी 

श्रीमान बाळासाहेब पाटील असे कसे हो तुम्ही सहकार मंत्री कि जणू आल्या आल्या तुम्ही दाखविले सुचविले आहे कि तुम्हाला देखील सहकार मंत्री म्हणून नेमके या राज्याचे कसे वाटोळे करायचे आहे. ते कसे त्यावर आधी एक चुटका तुम्हाला येथे सांगायलाच हवा. एकदा भूतलावर एकाचवेळी तीनअतिशय तरुण सुंदर स्त्रियांचा मृत्यू झाल्यानंतर यम त्या तिघींनाही थेट देवतांचा राजा इंद्रासमोर उभे करतो. त्यातल्या प्रथम आलेल्या तरुणीला इंद्र विचारतात, भूतलावर कसे ग तुझे आयुष्य होते. देवा, येथे येईपर्यंत मी कौमार्य सांभाळून सतत देवीदेवतांचे ध्यान करण्यात मग्न असे तरुणी सांगते. अरे कोण आहे रे तिकडे, या तरुणीची रवानगी लगेच सुवर्णनगरीत जेथे सारी उत्तमोत्तम सुखे उपलब्ध आहेत तेथे करा. नंतर ते दुसऱ्या तरुणीकडे वळून तेच विचारतात, तुझे आजपर्यंत कसे आयुष्य होते. ती म्हणते, देवा सुरवातीच्या आयुष्यात माझ्या काही चुका झाल्या त्यावेळी काहीशी तापट रागीट देखील होते नंतर मात्र मी पूर्णतः बदलले आणि सन्मार्गाला लागले अनेक पुण्याची कामे केली. देव त्यावर आज्ञा करतात, अरे या स्त्रीला त्या द्वितीय क्रमांकाच्या सुखनगरीत सोडून या. शेवटी ते जेव्हा तिसऱ्या काहीशा मादक प्रचंड आकर्षक तरुणीकडे वळतात तोच ती त्यांना आधी करकचून डोळा मारते, सेक्सी आळोखे पिळोखे देऊन म्हणते, डिअर इंद्रा, मी मात्र आयुष्यभर मज्जा केली. डिस्को पब ड्रिंक्स आणि रंगिल्या राती, असे माझे धम्माल आयुष्य होते. त्यावर परमेश्वर आज्ञा करतात, या तरुणीला माझ्या महालात आत्ताच्या आता सोडून या

सहकार मंत्री बाळासाहेब, तुम्ही संतोष पाटील यांच्यासारखा एखादा अपवाद सोडल्यास तुमचे हे स्टाफच्या बाबतीत निर्णय घेणे देवाने त्या तिसऱ्या तरुणीच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयासारखे दिसते. तेच सिद्ध होते. सभोवतालच्या कंपनीवरून माणूस कसा नेमके म्हणे कळते तेच तुमचे झाले आहे कारण मंत्री आस्थापानेवर तुम्हाला हे पक्के माहित होते कि अविनाश देशपांडे सारखे एड्स झालेल्या वेश्येसारखे काही अधिकारी काही कर्मचारी तुमच्याकडे येण्याचा आग्रह धरून आहेत आणि नेमके तुम्ही तेच केले एकप्रकारे एड्स झालेल्या रांडांना जणू तुम्ही थेट आपल्या शयनगृहात आणून ठेवले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे थेट भ्रष्टाचाराचा महाअड्डा जेथे एखादा प्रभू पाटील अन्याविरुद्ध पेटून उठतो आणि इतर सारे केवळ अविनाश देशपांडे, सुधीर तुंगार किंवा शशिकांत शिंदे असतात थोडक्यात गरीब शेतकऱ्यांना लुटून फक्त आपले आणि आपल्या कुटुंबाचे

भले साधण्यात मग्न असतात. अविनाश देशपांडे यांच्यावर मी याआधी लिहिल्यानंतर आश्चर्य म्हणजे त्यांच्या मूळ गावातल्या, परभणीतल्या, मराठवाड्यातल्या त्यांच्या स्टाफमधल्या, कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या कार्यरत विविध मंडळींनी जे त्यांच्याविषयी उत्स्फूर्त पुरावे मला आणून दिले, वाचून, एक ब्राम्हण एवढ्या खालच्या थराला जाऊन भ्रष्टाचार करतो बघून मी ब्राम्हण आहे याची मला माझीच लाज वाटली…


www.vikrantjoshi.com

रमेश रावसाहेब खिस्ते आणि अविनाश देशपांडे या जोडगळीने शशिकांत शिंदे यांच्यासारख्या काही बलाढ्य पण पैशांसाठी वखवखलेल्या नेत्यांना हाताशी धरून अनेक वर्षे नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जो प्रचंड गोंधळ आणि धुमाकूळ घातला पुरावे वाचून वाईट वाटले. या बोटावर मोजक्या मंडळींनी मग ते आयकर खात्याचे अधिकारी असोत किंवा एकेकाळी अजित पवारांच्या कार्यालयातले अजित देशमुख असोत अशा काही बड्या धेंडांना केवळ खुश करण्यासाठी लाखो

रुपयांचे हापूस आंबे गिफ्ट करून अप्रत्यक्ष या मंडळींना त्यांनी आजपर्यंत खिशात घातले आणि अनेक भानगडी दाबल्या, आर्थिक फायदे करवून घेतले. आजपर्यंत अविनाश देशपांडे यांच्या ज्या मालमत्तेची गुंतवणुकीची माहिती माझ्याकडे आलेली आहे अंदाजे ती मालमत्ता ९५ कोटी रुपये एवढी आहे आणि हा आकडा येत्या काही दिवसात नक्की वाढत जाणार आहे. अविनाश आणि त्यांच्या काही कृषी उत्पन्न बाजार समितीशी संबंधित मंडळींनी भागीदारीत केल्या जाणारे व्यवसाय व गुंतवणूक ईडी किंवा आयकर खात्याला ला नक्की आव्हान ठरणारे आहे…

क्रमश:  हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *