जरा सांभाळून : पत्रकार हेमंत जोशी

जरा सांभाळून : पत्रकार हेमंत जोशी 

जसे पूर आलेल्या नदीत पोहायला उतरायचे नसते, धूर सोडणाऱ्या ढुंगणासमोर तोंड करून बसायचे नसते, मूड कोणताही असो अधिक वजन असलेल्या बायकोला अंगाखांद्यावर घेऊन काहीही करायचे नसते, पिसाळलेल्या कुत्र्याच्या पाठीवर कुरवाळायचे नसते, सेक्स करायचा मूड आल्यानंतर पिसाळणाऱ्या हत्तीसमोर हत्तीण सोडून अन्य कोणीही जावयाचे नसते, माकड होऊन माणसाने कधीही या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारायच्या नसतात, तेच ते पाचकळ विनोद करून माणसाने स्वतःचा मेहमूद लक्ष्मीकांत बेर्डे, जगदीप, डॉ. साबळे करून घ्यायचा नसतो तद्वत अपयश समोर दिसल्यानंतर पेटून उठलेल्या शरद पवार यांच्या नादी भल्याभल्यांनी लागायचे नसते. अक्कलहुशारीने त्यांना सामोरे जायचे असते. आकांडतांडव करणारे पवार भयंकर डेंजरस असतात, ठरतात, हा इतिहास सर्वांनाच माहित आहे, पाठ आहे. दाऊद युगाचा अस्त झाल्यानंतर पवार तसे बऱ्यापैकी शांत राहून राज्याचे राजकारण स्वतःसाठी खेळत होते पण त्यावेळेचे भाजपाला मिळालेले यश आणि त्यांना मिळणारे अपयश, पवार यांचे पित्त अतिशय खवळलेले आहे. डोळ्यात तेल घालून या राज्यातल्या युतीने विशेषतः फडणवीसांनी पवारांना सामोरे जायचे आहे कारण चिडलेले पवार कोणत्याही थराला जातांना मागलापुढला विचार करतांना दिसणार नाहीत, अशावेळी पाकिस्थान परवडला म्हणायची वेळ आपल्यावर येते…


नवनीत राणा विदर्भातल्या अमरावती मधून निवडून आल्या म्हणून फारसा आनंद झाला असे अजिबात नाही कारण प्रोफेशनली मतदारांचा वापर करवून घेणारे नेते विदर्भातल्या मतदारांच्या कधी लक्षात आलेच नाहीत त्यामुळे आम्हाला कायम विदर्भातल्या स्थानिक व्यापारी वृत्तीच्या नेत्यांनी वापरून घेतलेले आहे, नवनीत किंवा त्यांचा नवरा त्यातलेच एक त्यामुळे त्यांच्या निवडून येण्याने मनाला आनंद झाला असे अजिबात नाही पण आनंदराव अडसुळांना विदर्भातल्या मतदारांनी मोदी लाट असतानाही पराभूत केले, बरे झाले. फार पूर्वी एक डॉक्टर दाम्पत्य मंत्रालयात दलाली करीत असे त्यासाठी हा डॉक्टर आपल्या देखण्या तरुण सेक्सी बायकोचा तिला शौकीन मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर पाठवून तिचा वाईट पद्धतीने उपयोग करवून घेत असे. त्यावर डी वाय पाटील, सुशीलकुमार शिंदे, अनंतराव थोपटे, दिनेश अफजलपूरकर इत्यादी नेते अधिकारी विस्ताराने तुम्हाला सांगू शकतील. हा डॉक्टर बाहेर चतुर्थ कर्मचाऱ्यांशी गप्पा मारीत बसायचा आणि त्याची पत्नी शौकिनांकडे जाऊन फाईल्स क्लिअर करवून घ्यायची, त्यांची ती नेहमीची पद्धत होती…


आम्हा विदर्भातल्या मतदारांची अवस्था वर्षानुवर्षे त्या डॉक्टर दाम्पत्यासारखी हलकट लाळघोट्या नेत्यांनी मजबूर करून ठेवली आहे, बाहेरचा उमेदवार आमच्यावर वेळोवेळी लादायचा मग ते दिवंगत नरसिंह राव असतील, गुलाम नबी आझाद असतील, आनंदराव अडसूळ असतील, वासनिक बापबेटे असतील, असे कितीतरी. विदर्भातल्या भोळ्या मतदारांना गृहीत धरून या नालायक संधीसाधू नेत्यांनी कायम आमचा त्या डॉक्टरने जसा बायकोचा वापर करून घेतला, आमचे हे असे झालेले होते त्यामुळे अडसूळ पडले बरे झाले निदान यापुढे तरी सहसा बाहेरचा उमेदवार लादण्याची विविध राजकीय पक्षातल्या श्रेष्ठींची हिम्मत होणार नाही. डॉक्टर दाम्पत्याचे उदाहरण दिले, अशा अनेक बायका या मंत्रालयात आपले शरीर विकून पैसे मिळवतात आणि सुंदर शरीराची चाळण करवून घेतात, त्यावर १९९० च्या दरम्यान कांताला वापरून घेणारे निंबाळकर आणि निंबाळकरांच्या भरवशावर मुलगी जावयाला जोडलेले दोन दोन फ्लॅट घेणाऱ्या कांता तुम्हाला व्यापक सांगतील…


शिवसेनेचे यावेळीही १८ खासदार निवडून आले पण यावेळची संख्या १८ वरून अगदी सहज २२ वर गेली असती. केवळ फडणवीसांच्या आग्रहाला उद्धव ठाकरे बळी पडले आणि ऐनवेळी नरेंद्र पाटलांना उमेदवारी देऊन, उदयनराजे भोसले यांना निवडून आणण्यात अप्रत्यक्ष जणू मदतच केली कारण राजे यांच्या समोर बाहेरचे तसेच युतीला अपरिचित नरेंद्र पाटील उभे करण्यात काहीही अर्थ नव्हता. पचका झाला. तेथून डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणूक लढवावी अशी ठाकरे यांची इच्छा होती पण अमोल कोल्हे अगदी सुरुवातीपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाचा हट्ट करून बसले होते. कोल्हे जर साताऱ्यामधून उभे असते तर शिवसेनेच्या एकाचवेळी दोन जागा अगदी सहज वाढल्या असत्या. साताऱ्यामधून डॉ. अमोल कोल्हे व शिरूर मधून पुन्हा एकदा आढळराव पाटील शंभर टक्के निवडून आले असते. उद्धवजी विनाकारण यावेळी आढळराव पाटील यांच्या प्रेमाला बळी पडले आणि कोल्हे थेट राष्ट्रवादीत जाऊन निवडून आले. येथे उद्धवजी आणि डॉ अमोल दोघांनीही स्वतःचे मोठे राजकीय नुकसान करवून घेतले. उद्धव ठाकरे यांनी आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील अनंत गीते इत्यादी त्याच त्या उमेदवारांना रिपीट केले नसते तर नक्की चित्र वेगळे दिसले असते. या राज्यात युतीमध्ये आणि शिवसेनेत त्यातून आनंदाला नक्की उधाण आले असते, दुर्दैवाने तसे घडले नाही…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *