Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

काँग्रेसचा फुटला फुगा नवा प्रदेशाध्यक्ष हवा

हेमंत जोशी by हेमंत जोशी
January 18, 2025
in Corruption, Mantralaya, Politics
0

काँग्रेसचा फुटला फुगा नवा प्रदेशाध्यक्ष हवा :

एका गौप्य्स्फोटाने लिखाणाची सुरुवात करतो. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत मिळविलेल्या घवघवीत अपयशानंतर आपला राजीनामा केव्हाच त्यांच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केला असल्याने, त्यांना राजीनामा देण्याबाबत खुद्द राहुल गांधी यांनीच तसे तोंडी आदेश काढल्याने अलिकडल्या काही दिवसात प्रदेश प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत राज्यातल्या काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरु आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी 2014 नंतर अनेकदा पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकराव ठाकरे दोघानां अनेकदा विनंती करूनही त्यांना साधी भेट देण्याचे टाळले आहे एकप्रकारे त्यांना सतत यासाठी राहुल गांधींनी अपमानित करण्याचे मुख्य कारण असे कि 2014 च्या राज्यातल्या विधानसभा निवडणुकामध्ये मुख्यत्वे ज्या नेत्यांमुळे राज्यात काँग्रेस पराभूत झाली त्याला कारणीभूत या दोघांची जशी निष्क्रियता कारणीभूत होती नेमके ते तसेच यावेळी थेट मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बघणार्या नाना पटोले यांच्याचमुळे विशेषतः त्यांच्या अहंकारी वृत्रीतून आणिअतिआत्मविश्वासातून राज्यातली काँग्रेस रसातळाला गेली आहे त्यामुळे यानंतर पटोले यांचा देखील राहुल गांधी यांनी आता माणिकराव व पृथ्वीराजबाबा करून ठेवलेला आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विधानसभेला मी त्या प्रफुल्ल पटेल यांच्या मस्तीला धूळ चाखेल अशा वलगना करणाऱ्या पटोले यांना या दोन्ही जिल्ह्यातून सहापैकी एकही आमदार निवडून आणणे शक्य झाले नाही आणि ते स्वतः देखील केवळ 208 मतांनी कसेबसे निवडून आले वरून राज्यातल्या काँग्रेसची दयनीय अवस्था करून ठेवली त्यामुळे राहुल गांधी यादिवसात मनापासून पटोलेंवर खूपच चिडले आहेत. जरी तुमचा विधानसभेला पराभव झालेला असला तरी तातडीने आपण प्रदेशाध्यक्षपद स्वीकारावे असा आग्रह विशेषतः स्वतः राहुल गांधी यांनी बाळासाहेब थोरातांकडे धरला होता पण आलेल्या नैराश्येतून लगेच मोठी जबाबदारी स्वीकारण्यात थोरात यांना काडीचाही रस नसल्याने त्यांनी हे पद नम्रपणे नाकारले आहे. नाना पटोले यांचा काँग्रेस प्रवेश झाल्यानंतर राज्यातल्या ज्या मान्यवर प्रभावी काँग्रेस नेत्यांनी पटोलेंना विरोधीपक्ष नेता किंवा प्रदेशाध्यक्ष करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती मात्र नाना यांनी अध्यक्ष झाल्यानंतर त्याच पाठीराख्या ताकदवान नेत्यांना कात्रजचा घाट दाखवत तद्दन फाल्तुक मंडळींना जवळ बाळगले आणि काँग्रेसचे वाटोळे करून ठेवले त्यामुळे यापुढे नानाच्या पाठीशी त्यांच्या पक्षातले देखील फारसे कोणी शिल्लक उरलेले नाही, जे आहेत ते फारच मामुली व राजकीयदृष्ट्या अशक्त असे नेते आहेत. नानांनी स्वतःचे व पक्षाचे बारा वाजवून ठेवले आहेत…

तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Previous Post

नवा प्रदेशाध्यक्ष हवा, वाजले कि तीन तेरा !!

Next Post

OFF THE RECORD review on some of headlines…

हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

Next Post

OFF THE RECORD review on some of headlines...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.