Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

झिरो से हिरो : पत्रकार हेमंत जोशी

tdadmin by tdadmin
January 31, 2021
in Uncategorized
0

झिरो से हिरो : पत्रकार हेमंत जोशी 

झिरो से हिरो होणारे म्हणजे शून्यातून विश्व् निर्माण करणारे मला अतिशय मनापासून भावतात माझ्या  ते आकर्षणाचे विषय ठरतात असतात. पण मराठी माणसाची मोठे होण्याची कल्पना बहुतेकवेळा इतरांना फसवून लुबाडून श्रीमंत होण्याची असते त्यांना फार कमी वेळा ऑनमेरिट श्रीमंत व्हावे, वाटते बहुतेकांचा कल भ्रष्टाचाराचा अवलंब करून श्रीमंत होण्याकडे असतो त्यामुळे सुहास अवचट सारखे मराठी व्यावसायिक जेव्हा स्पर्धेत टिकून ऑनमेरिट मोठे होतात श्रीमंत होतात यशस्वी होतात, अशा  मराठी लोकांचे मनापासून कौतुक करावेसे वाटते. एखाद्या यशस्वी माणसाचे तोंडभरून कौतुक करावे तसेही आपल्या रक्तात नाही उलट अमुक एखाद्याचे वाटोळे होणे बघण्यात बहुतेक मराठींना मनातून आवडते बघायला आवडते. कधी गेलात का सुहास आणि दीपा अवचट या उत्साही बोलक्या कष्टाळू जोडप्याच्या माहीम मधल्या गोवा पोर्तुगीज हॉटेल मध्ये, नसेल गेलात तर अवश्य जा आणि विचारा त्या दोघांपैकी कोणी आहे का तेथे, असतील तर पटकन येतील तुमच्याकडे छान गप्पा देखील मारतील जर तुम्हाला ते आवडणारे असेल, अतिशय मोठ्या मनाचे हे जोडपे, छान वाटते जेव्हा मराठी माणसाला त्याच्या व्यवसायात  उत्तम यश मिळते… 

जे मराठी नसलेलले या मुंबईत या राज्यात विविध व्यवसायात करून दाखवतात ते तसे करून तुम्ही देखील यश मिळवू शकता म्हणजे मी मुंबईत ज्या खार सांताक्रूझ पश्चिम परिसरात राहतो तेथे फेमस राम श्याम भेळवाला आहे, तो जोशी आहे पण राजस्थानी आहे. दररोज दुपारी चार ते रात्री दहा वेळेत भेळ आणि अन्य प्रकार हातगाडीवर विकतो. ते दोघे भाऊ आहेत पण त्यांचा हा व्यवसाय मुंबईत गेल्यातीन पिढ्यांपासून आहे, रस्त्यावर उभे राहून व्यवसाय करणाऱ्या अमराठी लोकांची त्या बिनभांडवली धंद्यावरची मिळकत आणि श्रीमंती बघून मराठी माणसाला नक्की आपली स्वतःची लाज वाटेल. जोशी बंधू गोरेगावला स्वतःच्या मालकीच्या प्रशस्त बंगल्यात राहतात आणि या मुंबईत त्यांच्या अशा कितीतरी मालमत्ता आहेत शिवाय घरातले काही सदस्य चक्क अमेरिकेत आहेत कारण श्रीमंत मुंबईकर त्यांचे दररोजचे ग्राहक आहेत अशा श्रीमंत व्यापाऱ्यांच्या डोक्याचा या बंधूंनी ज्या खुबीने वापर करून ते श्रीमंत झाले, ऐकून बघून मराठींना हे मुंबईत सहज शक्य असतांना ते मागे का त्यावर राग येतो, वाईट देखील वाटते. पश्चिम पार्ल्यात मारुती पावभाजीवाला आहे त्याचे दररोजचे रस्त्यावर केवळ पावभाजी विकून होणारे उत्पन्न असे वाटते सारे सोडावे आणि पाव भाजी विकावी… 

विलास जोशी नावाचे मुंबईत एक नामांकित वकील आहेत, सुशांत त्यांचा मुलगा माझा मित्र आहे तो हॉटेल व्यवसायात आहे आणि प्रचंड यशस्वी आहे. नाशिक आणि सुरत महामार्गावर असलेले दत्त स्कॅक्स त्याच्या मालकीचे आहे याशिवाय काही विमानतळांवर त्याची दुकाने आहेत, सुशांत मेहनती आहे आणि दत्त मधल्या प्रत्येक मराठी पदार्थांची चव मला वाटते केव्हाच अगदी सातासमुद्रापलीकडे देखील पोहोचलेली आहे. स्पर्धेची मराठी माणसाने कधीही काळजी चिंता पर्वा करायची नसते. जरजे विकतो त्याचा दर्जा कायम आणि उच्च राखला तर ग्राहक तुमच्याकडे चालून येते. जेव्हा मी २१-२२ वर्षांचा होती तेव्हा जळगावला माझे थेट दररोज रस्त्यावर उभे राहून धंदा घेणाऱ्या वेश्यांच्या शेजारी शॉर्टहँड आणि टायपिंग क्लासेस होते, एक हजार विद्यार्थी त्यावेळी माझ्याकडे सकाळी पाच ते रात्री अकरा पर्यंत शिकायला यायचे. पुढे संगणक युग आल्याने मला पत्रकारितेत पूर्ण वेळ तेही मुंबईत येऊन उतरावे लागले अन्यथा मी त्यात सुखी होतो. आजही गेल्या चाळीस वर्षांपासून तेच, केवळ आठ पानांचे तेही पाक्षिक काढतो पण त्या पाक्षिकाची इतर कोणत्याही मोठ्या खपाच्या दैनिकापेक्षा अधिक चर्चा असते कारण सत्य तेवढे लोकांसमोर निर्भीडपणे मी व माझा मुलगा मांडतो, राज्यातले सारे मोठे आम्हाला व्यक्तिगत डोक्यावर घेऊन नाचतात. समाधान मिळते. माधव टेलर्स हे माझ्या विदर्भातले पण मुंबईत बसून त्यांचे अख्य्या भारतात नाव आहे आजही ते गेल्या चार दशकांपासून हिंदुस्थानातले प्रथम क्रमांकाचे नामवंत टेलर्स आहेत विशेष म्हणजे त्यांची दोन्ही मुले याच व्यवसायात सवाई आहेत. माधव मराठी आहेत ब्राम्हण आहेत. जेथे इच्छा असेल तेथे मार्ग असतो, मला तुमच्यातही उद्याचे उत्तम सर्वोत्तम व्यवसायिक बघायचे आहेत… 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Previous Post

सामंत उद्धवजींचा हनुमंत : पत्रकार हेमंत जोशी

Next Post

The “unsettled” Bureaucracy of Maharshtra today

tdadmin

tdadmin

Next Post
The “unsettled” Bureaucracy of Maharshtra today

The "unsettled" Bureaucracy of Maharshtra today

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.