अजितदादासे प्यार किया तो डरना क्या

अजितदादासे प्यार किया तो डरना क्या :

बुद्धिजीवी सुसंसकृत सुसंस्कारी तसेच रा स्व संघ किंवा भाजपा कार्यकर्त्यांची अनेक नेत्यांची ज्या अजित पवारांवर उद्धट उर्मट जातीयवादी भ्रष्टाचाराचे आरोप आहेत होते त्यातून ज्या अजित पवारांना हे सरळमार्गी राष्ट्रप्रेमी मतदार नेते कार्यकर्ते स्वयंसेवक राजकीय अछूत या नजरेने बघत आलेले त्याच अजित पवार यांना त्यांच्या बदनाम बदमाश गॅंग सहित थेट महायुतीमध्ये सामील करून घेत वरून सत्तेत स्थान देण्यात आले हे म्हणजे असे झाले कि अमुक एखादा गुप्तरोगी आहे माहित असूनही त्याच्याशी एखाद्या रुपगर्वितेने जाणूनबुजून लग्न करण्यासारखे किंवा एखाद्या कर्मठ पाकिस्थानी मुसलमानांशी भारतीय वंशाच्या ब्राम्हण तरुणीने पळून जाऊन लग्न करण्यासारखे पण राजकारणात केव्हाही काहीही घडू शकते जसे कालपर्यंत ज्यांच्या तोंडावर बाळासाहेब ठाकरे थुंकायचे त्याच मुसलमानांचे आता मातोश्रीवर सत्कार व्हायला लागले हे असेच येथेही घडले ज्याचा फार मोठा फटका पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीला भाजपा महायुतीला बसला केवळ अजितदादांना मिठीत घेतल्याने नैराश्येपोटी भाजपा महायुतीला हमखास मतदान करणारे बहुसंख्य मतदानाच्या दिवशी एखाद्या निष्णात जादूगारासारखे गायब झाले होते पण आता मात्र विधानसभेला असे वागू नका, जसे जातीबाहेरची सून आपण अनिच्छेने का होईना तिला स्वीकारतो तेच विधानसभेला अजित पवार आणि गॅंग बाबत तुमचे विचार बदला, नाराजी आहे पण हे मैत्रीचे नाते तुम्ही स्वीकारायला हवे…

www.vikrantjoshi.com

घरातून पळून आलेल्या तरुणीला जसे माहेरी स्थान नसते त्यातून तिला सासरी स्वीकारणे आवश्यक ठरते हुबेहूब तेच अजित पवार यांचे कारण जेथून अजितदादा पळून आले फसवून आले ते राजकारणातले अमरीश पुरी शरद पवार आता त्यांच्यावर दात ओठ खाऊन आहेत, वर जाण्याआधी मी अजितला पोहचवून येईन त्याला राजकारणातून नेहमीसाठी नक्की नॉव्हेअर करेल हि शरदरावांनी घेतलेली शपथ आहे ज्यात काहीही झाले म्हणजे अजितदादांनी अगदी नाक घासून माफी जरी मागितली तरीही यापुढे पवारांकडे दादांना स्थान नाही म्हणजे नाही. त्यामुळे फसवून पळून आलेल्या या अजितदादांना भाजपा महायुतीच्या समस्त मतदारांनी आय लव्ह यु म्हणणे नंतर अख्य्या दादा गॅंगला बाहुपाशात घेणे आवश्यक आहे अन्यथा पुन्हा तेच घडेल जे वाटोळे महायुतीचे भाजपाचे लोकसभेला झाले नेमके तेच विधानसभेत घडेल. आजतागायत जे शरद पवार यांनी अनेकदा वेळोवेळी अनेकांशी केले नेमके तेच त्यांच्या वाट्याला आले, जणू नियतीने त्यांचा बदला घेतला, ज्या दादांना शरदरावांनी कडेवर घेतले त्यांनीच कानात मुतून ठेवल्याने, शरद पवार चांगलेच संतापले आणि त्यांनी पवार घराण्यातला जो सर्वाधिक चुणचुणीत दुर्दरशी बेरकी चाणाक्ष तरुण आहे आणि ज्याला राजकारणात आणल्याने अजितदादा आणि कुटुंबाला कायमची डोकेदुखी ठरून भविष्यात पवार घराण्यातल्या रोहित पवार सहित इतर कोणाचीही अजित दादा पद्धतीने घातपात दगा फटका करण्याची हिम्मत होणार नाही अशा वरचढ तरुणाला म्हणजे अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास यांच्या ऑलराऊंडर मुलास युगेंद्र यास थेट राज्याच्या राजकारणात आणले आहे ओढले आहे. बारामतीचे शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार शंभर टक्के युगेंद्र श्रीनिवास पवार आहेत त्यातून पराभवाच्या भीतीने हि विधानसभा न लढविण्याचे अजितदादांनी नक्की ठरविले आहे. सुप्रिया सुळे यांच्या उजव्या बाजूला रोहित डाव्या बाजूला युगेंद्र यांनी कायम उभे राहिल्यास भविष्यात अजित आणि कुटुंब किंवा त्यापध्दतीच्या कोणत्याही दगाबाजाला राजकीय यश मिळणार नाही हे शरद पवार यांनी कुटुंबात समजावून सांगितले त्यातून या तिघांचेही हातात हात घेऊन राजकारणात दोन हात करण्याचे ठरले आहे…

अजित पवारांचे ग्रह नक्की फिरले आहेत कारण सख्य्या आई आणि भावासहित संपूर्ण पवार घराणे सारेच्या सारे अजितदादा यांच्यावर तुटून पडले आहेत विरोधात गेले आहेत, भलेही सुनेत्रा पवार अधून मधून पवार कुटुंबियातील विविध सदस्यांची भेट घेताहेत पण भेटल्या नंतर त्यांच्याशी जी इतरांची वागणूक असते ती थेट जया बच्चन आणि रेखा किंवा ऐश्वर्या पद्धतीची असते सारे बोलणे भेटणे ती केवळ एक औपचारिकता असते, खाष्ट सासूसारखे त्यांच्यातले बोलणे असते पूर्वीचा तो आदर जिव्हाळा किंवा ओलावा त्यात अजिबात नसतो. कारण शरद पवार यांच्या सख्त सूचनेवरून यापुढे अजितदादा आणि कुटुंबियांच्या जवळपास देखील न फिरकण्याची शरदरावांची प्रेमाची आदराची सक्ती आहे त्याचवेळी जय आणि पार्थ यांना भावी नेतृत्व म्हणून अजिबात न मिळालेली न मिळणारी कार्यकर्त्यांची नेत्यांची पसंती त्यातून राजकारणात खामगाव ते जलम्ब पॅसेंजर ट्रेन सारख्या अगदीच स्लो स्पीड पकडणाऱ्या सुनेत्रा पवार त्याचवेळी अजित पवार संगतीने सोबतीने आलेल्या नेत्यांची सुरु झालेली गळती जी यापुढे काहीच दिवसात थेट गीतांजली एक्सप्रेस सारखा वेगवान स्पीड पकडणार आहे, अजित पवार म्हणूनच खूप अस्वस्थ आहेत, मनातून मनापासून हादरले बरयापैकी घाबरले आहेत, तिकडे नेमके कोणत्या पक्षात जायचे कि परतायचे हे त्या छगन भुजबळांचे नेमके आणि नक्की ठरलेले, थोडक्यात चारही बाजूंनी अजितदादांची यादिवसात कोंडी झालेली विशेष म्हणजे याच अजित पवारांना अगदी शंभर टक्के ते एकनाथ शिंदे त्या संताजी धनाजीसारखे जळी स्थळी दिसतात, दोघेही एकमेकांना पाण्यात पाहतात, शिंदे दादांना सतत पुरून उरतात, दोघांमध्ये अजिबात सख्य नाही मोठी दरी आहे दुरावा आहे, केवळ ते देवेंद्र फडणवीस एकमेव आधार, अजितदादांच्या देऊळ पाण्यात असल्याने कधी नव्हे ते या कंजूष नेत्याने खिशात हात घातला आहे, तो कसा, विषय येथेच संपत नाही…

अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top