Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

त्यांनी पंगा घेतला दंगा केला…

हेमंत जोशी by हेमंत जोशी
October 16, 2021
in Mantralaya, Politics, Social
0
त्यांनी पंगा घेतला दंगा केला…

त्यांनी पंगा घेतला दंगा केला…
-पत्रकार हेमंत जोशी

पार पडलेल्या दसऱ्याला दोन चांगल्या घटना या राज्यात घडल्या ज्यासाठी मी कायम झगडत असतो लढत असतो मोठा पंगा भल्याभल्यांशी घेत असतो. दोन्ही घटना माझ्या आवडत्या हिंदुत्व या विषयाशी अत्यंत निगडित होत्या म्हणजे थेट शरद पवार यांच्या पुतण्याने तेही स्वतःच्या घरापुढे देशातला सर्वात मोठा भगवा झेंडा कायमस्वरूपी फडकावला म्हणजे हे तर असे झाले कि मौलवींच्या मुलीने थेट भटजीच्या मुलाशी निकाह लावला किंवा दादांनी पैसे न खाण्याची शपथ घेतली. दुसरा मुद्दा थेट उद्धव ठाकरे यांचा ज्यांची मला गेली दोन वर्षे मोठी काळजी लागून राहिली होती जशी नववा महिना लागल्यानंतर लेकीची काळजी आईला लागते तशी किंवा सिगारेट ओढणाऱ्या मुलाची काळजी निर्व्यसनी बापाला लागते तशी म्हणजे सरतेशेवटी का होईना उद्धव यांनी पुन्हा एकवार मराठी प्रेमाची जाहीर कबुली दिली आणि ते एवढ्यावरच थांबून राहिले नाहीत तर गेली दोन वर्षे या राज्यात तेही सत्त्तास्थानी बसून उद्धव सतत जी मुसलमानांची सतत पाठराखण करीत होते त्या मुसलमानांसमोर त्यांनी या विजयादशमीला एकदाची डरकाळी फोडली एवढेच नव्हे तर केवळ मराठी बाणा नव्हे तर थेट हिंदुत्वाचा झेंडा हाती घेऊन त्यांनी आपल्या हिंदू विचारांना केवळ भाजपाच्या भीतीपोटी व्यापक फोडणी दिली. एवढ्या दिवस या वाघाचा घसा बसला होता त्यामुळे वाघाच्या जबड्यातून गेली दोन वर्षे जो खरूज झालेल्या बोक्याचा आवाज येत होता त्या उद्धव यांना डॉ. मोदी आणि डॉ. फडणवीस यांची मात्रा यावेळी तंतोतंत लागू पडली आणि त्यांनी एकदाची का होईना होय मी मराठी होय! मी हिंदू अशी मोठी डरकाळी फोडली….

पण काही नवरे कसे दिवसभर नुकतेच लग्न केलेल्या बायकोशी कामांध झालेल्या नवऱ्यासारखे कामुक वाक्ये फेकतात आणि रात्री दोघे पलंगावर पहुडताच पुढल्या पाच मिनिटात पाठ करून झोपणाऱ्या नवऱ्यासारखे उद्धव यांचा मराठी बाणा आणि हिंदुत्वाचा नारा अशा क्षणात लुळ्या पडणाऱ्या नवऱ्यासारख्या घोषणा ठरता कामा नये म्हणजे विजयादशमीला डरकाळी फोडायची आणि दुसरे दिवशीपासून पुन्हा सिद्दीकी अस्लम किंवा मलिक यांच्या गळ्यात पडून मैत्रीची बांग द्यायची, असे यापुढे घडले म्हणजे जसे गेली दोन वर्षे उद्धव यांनी मुसलमानांचे लांगुलचालन केले ते जर यापुढे त्यांनी घोषणा देऊनही फोल ठरले तर शिवसेनेला मोठा फटका बसेल आणि कडवी हिंदुत्व भूमिका घेणाऱ्या भाजपाला या राज्यात साऱ्याच थरातून फायदा होईल त्यांना हिंदूंची मोठी सहानुभूती मिळेल. तुम्हाला हे माहित आहेच कि वारंवार जे एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवतात विशेषतः जे नवरा बायको असतात त्यांना एका फँटसी ने कायम ग्रासलेले असते आणि हे जसे पुरुषांच्या बाबतीत घडते तसे स्त्रियांना देखील लागू पडते म्हणजे अमुक एखाद्याची पत्नी जरी थेट माधुरी दीक्षित सारखी सेक्सी आणि सुस्वरूप असली तरी संभोग करताना पुरुषांना पत्नी जवळ असतांना देखील कदाचित त्यांची आवडती मैत्रीण किंवा अगदी मोलकरीण देखील आठवत असते आणि हेच बायकांच्या बाबतीत देखील घडत असते तीच वस्तुस्थिती आहे म्हणजे अमुक एखाद्या स्त्रीचा पती थेट टायगर श्रॉफ सारखा जरी दिसायला असला तरी तीच ती चव तिला देखील कालांतराने नकोशी होते आणि पलंगावर मग ती देखील आवडणार्या पुरुषाचा चेहरा आणते. छगन भुजबळ यांचे बाबतीत अगदी या उदाहरणासारखे घडलेले आहे….

छगन भुजबळ यांनी जे अलीकडे स्टेटमेंट दिले आहे, ‘महाराष्ट्र टाइम्स’ दैनिकाला जी मुलाखत दिली आहे त्यातून त्यांना मी वर दिलेलं उदाहरण तंतोतंत लागू पडते किंवा छगन भुजबळ शरद पवार यांना व त्यांच्या राष्ट्रवादीला कंटाळले आहेत असे देखील त्यातून प्रतीत होते म्हणजे त्या मुलाखतीत भुजबळ यांचे पुन्हा एकवार किंवा अलीकडे वारंवार शिवसेना प्रेम उफाळून वर आले आहे आणि त्यांनी शिवसेना सोडणे मोठी चूक होती हे अप्रत्यक्ष काबुल केलेले आहे, भुजबळएकप्रकारे शरद पवार यांनी त्यांच्यावर अन्याय केला याची अप्रत्यक्ष कबुली ते देतात म्हणजे ते या मुलाखतीत म्हणतात कि जर मी आज शिवसेनेत असतो तर केव्हाच केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री झालो असतो थोडक्यात भुजबळ पवारांविषयी आपली नाराजी आणि शिवसेनेविषयी, उद्धवप्रति अलीकडे वाढलेले प्रेम त्याची अशी जाहीर कबुली देतात. पण यातली खरी वस्तुस्थिती येथे मी सांगतो कि शिवसेनेत उद्धव एस्टॅब्लिश होण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर देखील त्यांना जे जे नेते वरचढ वाटत होते त्या सर्वांना त्यांनी एकतर बाजूला केले दूर फेकले किंवा बहुतेकांना त्यांनी शिवसेनेतून मोठ्या खुबीने बाहेर काढले. होय ! कदाचित भुजबळ शिवसेनेत असते तर ते नक्की केंद्रीय मंत्री किंवा अगदी मुख्यमंत्री पण झाले असते पण त्यानंतर त्यांचा देखील उद्धव यांनी शंभर टक्के नारायण राणे मनोहर जोशी किंवा राज ठाकरे केला असता आणि आज छगन भुजबळ यांचा रामदास कदम झालेला आपण साऱ्यांनी बघितला असता. नाही म्हणायला शरद पवारांनी देखील छगन भुजबळ यांना आधी झटका दिला म्हणजे ओबीसीचे देशभरातले नेते म्हणून जे भुजबळ महाराष्ट्राबाहेर किंवा अगदी दिल्लीत देखील गाजायला लागले होते, पुढे हे डोईजड ठरलेलं भूत पवारांनी त्यांची भानामती वापरून थेट तुरुंगात पाठवून दिले म्हणजे भुजबळ यांना त्यांची आधी जागा दाखवून दिली त्यांना ओबीसींचे सोडा साधे माळ्यांचे देखील नेते म्हणून आधी नेस्तनाबुत केले नंतर वाटल्यास या कैद्याला बाहेर आणून थेट कॅबिनेट मंत्री केले आणि उद्धव यांनी देखील हे असेच केले असते कारण शरद पवार यांच्यानंतर अत्यंत शृड राजकारणी म्हणून घातकी नेता म्हणून मी उद्धव यांच्याकडेच बघतो पाहतो….

पुढल्या भागात : हेमंत जोशी

Tags: #DasraMelawa2021 #uddhavthackeray #bhujbal #ncp #shivsena
Previous Post

B for BJP, B for Bollywood !

Next Post

The Ajit Pawar factor!

हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

Next Post

The Ajit Pawar factor!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.