Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

उद्धव ठाकरे नेमके कसे : पत्रकार हेमंत जोशी

tdadmin by tdadmin
January 31, 2021
in Uncategorized
0
उद्धव ठाकरे नेमके कसे : पत्रकार हेमंत जोशी


उद्धव ठाकरे नेमके कसे : पत्रकार हेमंत जोशी 

मराठी माणसांचे काही फंडे अंदाज आराखडे विचित्र असतात, त्यांना साऱ्याच बाबतीत फार घाई असते अगदी बायकोला देखील पलंगावर घेतल्या घेतल्या त्यांना वाटते तिने गर्भार रहावे म्हणजे तेथेही घाई लगेच पाठ करून झोपण्याची,  सत्य सांगितले कि तुमचे म्हणणे असते हेमंत जोशी तुमचे लिखाण अधून मधून अश्लील असते. एखादी हसली म्हणजे फसली हे तर त्यांना कायम वाटते किंवा फेसबुकवर एखादीने लाईक केले म्हणजे ती तुमच्या प्रेमात पडली असे होत नसते. मग मला तर जगभरातल्या माझ्या मराठी वाचक स्त्रिया लाईक करतात त्यात माझं कौतुक करणेअसते त्याचा अर्थ त्या माझ्या प्रेमात पडल्या असा जर मी काढला तर मला कायमस्वरूपी संघ प्रचारकासारखे जगभ्रमंतीसाठी निघावे लागेल. काही मराठी पुरुष थेट आय लव्ह यु म्हणून मोकळे होतात तर काहींचे हळूहळू आडून पाडून त्याच मुद्द्यावर येणे होते. समजा एखादी तुमच्या प्रेमात पडली विवाहित मराठी पुरुषांनो तर असते का तुमच्यात ती हिम्मत तिचा हात हातात घेऊन तिला आधी आपल्या कुटुंबासमोर नेण्याची नंतर जगासमोर आणण्याचे धाडस. अजिबात नाही, अशावेळी तुमच्यासारखा गांडफट्टू या जगात नसतो, प्रेमात पडणाऱ्या स्त्री किंवा पुरुषांची फसवणूक करू नका, ज्यांची फसवणूक होते त्यांच्या आयुष्याची वाट लागते…

www.vikrantjoshi.com

नव्याने मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत देखील लगेच आपले अंदाज आराखडे सांगून मोकळे होऊ नका. मला शंभर टक्के खात्री आहे तुमच्यापैकी अगदी बोटावर मोजण्याइतक्या लोकांना ते नेमके कसे हे ठाऊक आहे त्या मोजक्या मंडळींमध्ये पुन्हा मंत्री झालेले सुभाष देसाई. शिवसेनेचे आतल्या गोटात ठरलेले होते कि विधान परिषदेवर निवडून गेलेल्यांना मंत्रिमंडळात स्थान देणे नाही, असे असतांनाही सर्वात आधी सुभाष देसाई यासाठी कि उद्धव ठाकरे यांचा तो स्वभाव आहे म्हणजे एखाद्याशी मैत्री मग त्याच्यासाठी वाट्टेल ते आणि एखाद्याशी दुश्मनी घेतली रे घेतली कि तो एके काळी भलेही अतिशय जवळचा असेल पण प्रसंगी अतिशय ते निष्ठुर होतात व लाडक्यांची देखील थेट शिवाजी पार्कला रवानगी करतात, कोणत्याही परिणामांची काळजी चिंता पर्वा न करता. सुभाष देसाई यांना अगदी सुरुवातीपासून मातोश्रीवर अगदी किचनपर्यंत प्रवेश होता. १९९५ च्या दरम्यान त्यांच्या असे लक्षात आले कि ठाकरे कुटुंब सदस्यांऐवजी भलतीच स्वार्थी बदमाश बिलंदर मंडळी बाळासाहेबांच्या भोवताली कोंडाळे करून आहेत आणि बाळासाहेबांच्या नंतर कोण, त्यात थेट दूर दूर पर्यंत त्यांना कोणी दिसत नव्हते. विशेष म्हणजे तोपर्यंत उद्धव यांच्याकडे एक मवाळ साधे सिम्पल काहीसे अपरिपकव व्यक्तिमत्व म्हणून बघितले जात असे…

कमी बोलणे पण अत्यंत चतुर देसाईंच्या नजरेने मात्र उद्धव यांना हेरले आणि उद्धव यांचे व्यवस्थित ब्रेन वॉश करून त्यांना जर मार्गदर्शन केले तर त्यांच्यात बाळासाहेबांची जागा घेण्याची नक्की कुवत आहे हे सुभाष देसाईंच्या लक्षात आले आणि ते कामाला लागले त्यांनी प्रथम बाळासाहेबांना छान विश्वासात घेतले, कसे पुढे जायचे हे वेळोवेळी उद्धव यांना वडीलकीच्या भावनेतून सतत समजावून सांगितले आणि एक दिवस तेही बाळासाहेबांच्या हयातीतच, उद्धव पुढे आले, बघता बघता त्यांनी बाळासाहेबांचे पुढले वारसदार म्हणून स्वतःला शाबीत केले अर्थात हा ताजा इतिहास तुमच्यासमोर आहे, वेगळे काही सांगण्याची येथे त्यावर गरज आहे मला वाटत नाही. ज्या सुभाष देसाई यांचा उद्धव यांच्यां जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे, महत्वाचे म्हणजे ज्या देसाई यांनी  मालकाच्या म्हणजे बाळासाहेब व उद्धव यांच्या पुढे जाण्याचा कधीही प्रयत्न केला नाही ते देसाई आपोआप उद्धव यांच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवून मोकळे झाले. हे असेही उद्धव आहेत जे आपली नेमकी मर्यादा ओळखून शिवसेनेची मनापासून सेवा करतात त्यांना ते असे कुवत असो अथवा नसो मोठे पद देऊन मोकळे होतात. सुभाष देसाई मंत्री होणे काळ्या दगडावरची रेघ होती…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

Previous Post

इतना सन्नाटा क्यो है भाई : पत्रकार हेमंत जोशी

Next Post

OFF THE RECORD review on some of todays headlines…

tdadmin

tdadmin

Next Post

OFF THE RECORD review on some of todays headlines...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.