Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

शरद पवारांची कीव करावी अखेरची हि धडपड असावी

हेमंत जोशी by हेमंत जोशी
February 24, 2025
in Corruption, Mantralaya, Politics
0

शरद पवारांची कीव करावी
अखेरची हि धडपड असावी

अलीकडे जसे डेस्टिनेशन मॅरेजला खूप महत्व आले आहे, पैसे असलेले दूरवर जाऊन लग्न समारंभ उरकतात, जेमेतेम पैसे असलेले जवळपास कुठेतरी जाऊन येतात किंवा काही वर्षांपूर्वी म्हणजे छगन भुजबळ राज्याचे सार्वजनिक खात्याचे मंत्री असतांना त्यांनी समता परिषदेचा मेळावा शरद पवारांच्या नक्कावर टिच्चून दिल्ली आणि लखनौमध्ये यशस्वी करून दाखविला होता त्यासाठी जसे त्यांनी राज्यातून दोन्हीकडे कार्यकर्ते कोंबून नेले होते,तेच पवारांनी दिल्लीत भरविलेल्या साहित्य संमेलनात केले जे म्हणाल तर लाजिरवाणे म्हणाल तर किळसवाणे आणि केविलवाणे ठरले. थोडक्यात शरद पवार यांनी त्यांच्या पुणेकर सवंगड्यांच्या भरवशावर आणि संजय नहार यांच्या खांद्यावर खुबीने बंदूक ठेवून तिकडे थेट मोदींच्या उपस्थितीत मोदींवरच चाप नेम ओढला पण पवार यांचा हाही नेम चुकला आणि बंदुकीची गोळी पवारांना स्वतःलाच जखमी करून गेली, वास्तविक वात विझायचे दिवस पवारांनी उभ्या राजकीय हयातीत सतत जे उथळ राजकीय डावपेचांचे कार्यक्रम राबवून एकाचवेळी अनेक नेम साधत गेम केले वास्तविक ते दिवस आता पूर्णतः इतिहासजमा झाले असताना, तरीही पवारांनी नेहमीचे तेच ते पोरकट आणि हलकट गेम खेळून पुन्हा राजकीय वर्चस्व आणि महत्व वाढविण्याचा असा केविलवाणा प्रयॊग खेळता अजिबात कामा नये. नसबंदी केलेल्या पुरुषाने जसे केवळ मनाच्या समाधानासाठी लग्न करू नये तसे नेमके पवारांनी त्या उथळ संजय नहार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून एकाचवेळी स्वतःचे हसे आणि नाहर यांचे थेट फडणवीस व मोदींकडले महत्व कायमस्वरूपी संपवून उघड्या झालेल्या नहार यांना पार नागडे करून ठेवले…

www.vikrantjoshi.com

म्हणजे ज्यांना साहित्य कशाशी खातात हे ठाऊक नाही नव्हते असे जवळपास 1500 पुणेकर शरद पवार राष्ट्रवादीच्या उरल्यासुरल्या कार्यकर्त्यांना आणि नहार यांच्याकडे जे हौशे गौशे नौशे मित्रमंडळ उठबैस करते अशा तब्बल 1500 मंडळींना पुण्यातून ‘ खाणे पिणे ‘ उरकून पुढे त्यातल्या अनेकांची पिण्याची सोय लावून झुकझुक गाडीने दिल्लीत साहित्यसंमेलनात नेण्यात आले पण नेलेल्या साऱ्यांनी दुर्दैवाने मोदींच्या प्रत्येक महत्वाच्या वाक्यवर टाळ्या पिटल्या कांहींनी तर शिट्याही फुंकल्या थोडक्यात संपलेल्या पवारांनी समस्त साहित्यिकांना अपमान करीत त्यांना अंधारात ठेवून त्यांच्या साक्षीने आणि उपस्थितीत दिल्लीतल्या साहित्य मंडपात पुण्यातल्या कार्यकर्त्यांचे त्यांच्या राष्ट्रवादीचा मेळावा तेही भाजपाच्या फडणवीस मोदी यांच्या उपस्थतीत घडवून आणला त्यात पवारांच्या भाट पत्रकारांचा मोठा भरणा पण अशाने पुन्हा एकदा राजकीय महत्व वाढण्याचे आणि विरोधकांच्या गोटात खळबळ माजविण्याचे तुमचे ते डावपेच आता केव्हाच इतिहासजमा झाले आहेत पवारसाहेब. अत्यंत खळबळजनक म्हणजे तुम्हा हा राजकीय राष्ट्रवादी मेळावा तुम्ही साहित्यिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवत भरवताय हे दिल्लीतल्या स्थानिक चाणाक्ष मराठी मंडळींच्या लक्षात यायला वेळ लागला नाही म्हणूनच दिल्लीकर मराठी मंडपात फिरकलेच नाहीत, तुमचा यानिमित्ताने आणखी एक नेहमीचा पोरखेळ ज्यात तुम्ही यादिवसात काहीसे अस्वस्थ आणि नाराज असलेल्या एकनाथ शिंदे यांनी जाळ्यात अडकविण्याचा आणि भाजपापासून त्यांना दूर नेण्याचा वरून आपण मराठे कसे एकत्र यायला असायला पाहिजे हे त्यांचे कान भरण्याचा नेहमीचा उथळ प्रयोग देखील या साहित्यसंमेलना निमित्ते तुमच्या सांगण्यावरूनच राबविल्या गेला त्यातून फारतर जसे संजय नहार आणि त्यांचे शैलेश पगारिया पद्धतीचे जे व्यावसायिक पुणेकर तेथे जमले होते त्या साऱ्यांचे तुम्ही कायमस्वरूपी यानिमित्ताने वाटोळे करून ठेवले, तसे एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना मुद्दाम पुरस्कृत करून फडणवीस मोदी यांना खिजविण्याचा डिवचण्याचा अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यातून राजकीय नुकसान केवळ एकनाथ शिंदे यांचे होऊ शकते, तुमच्या पुढे जाणार्या मर्द मराठा नेत्याला संपविण्याचे कसब, दुर्दैवाने एकनाथजींच्या लक्षात आले नाही…

शरदराव तुम्हाला आठवते का, काही वर्षांपूर्वी एका सरदारजीने अगदी जाहीर तुमच्या थोबाडात ठेवून तो निघून गेला होता, त्याने एक ठेवून दिली होती, मोदींनी या संमेलनात सर्वांदेखत तुमच्या अनेक थोबाडात ठेवून दिल्या, विशेष म्हणजे तिकडे मोदींनी वाक्यावाक्यातून तुमच्या थोबाडात ठेवली रे ठेवली कि जमलेले सारे जे संजय नहार याने तुमच्या सांगण्यावरून तिकडे पुण्यातून भरून आणले होते ते सारेच मोठ्यांदा टाळ्यांचा कडकडाट करायचे, हिंदी सिनेमात जसा एखादा सच्चा प्रियंकर आपल्या प्रेयसीला मांडवातून उचलून नेतो आणि नवरदेव केवळ हात चोळत बसतो त्या नवरदेवासारखे नेमके तुमचे झाले. तुमचा डाव मोदींनी तुमच्यावरच उलटवला, कार्यक्रम तुम्ही घडवून आणला मात्र हायजॅक मोदींनी केला टाळ्या त्यांनी घेतल्या. जमलेले बहुतेक सारे समाजवादी विचारांचे किंवा हिंदुत्व न मानणारे, मोदी यांना हे नेमके माहीत असल्याने त्यांनी सावरकरांपासून तर संघ आणि हिंदुत्वाचे महत्व ज्या प्रत्येक घटनेविषयी तुम्हाला सख्त नफरत आहे, तुमच्या नाकावर टिचून हिंदुत्व त्याचे महत्व जाहीर विशद केले तुम्हा साऱ्यांना अस्वस्थ आणि विचलित केले, बरे झाले, वरून तुम्हाला सार्यांदेखत पाणी पाजले ते दृश्य तर मैलाचा दगड ठरला, जेथे तेथे राजकारण आणायचे आणि खेळायचे तुमची ती जुनी आणि वाईट सवय, साहित्यिकांना देखील तुम्ही सोडले नाही, हे तर असे झाले एखाद्या भाबड्या मित्राच्या घरी मुक्कामाला जायचे त्याला बेशुद्ध करून बेसावध करायचे त्यानंतर त्याच्या सुस्वरूप पत्नीला जवळ घ्यायचे, या साहित्य संमेलनात मला समस्त साहित्यिक त्या भाबड्या मित्रासारखे वाटले, त्यांचा दुरुपयोग करून घेण्यात आला. हा विषय येथेच संपत नाही…

अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Previous Post

अभिनेत्याला पोटदुखी लई, अमोलभाऊंची कोल्हेकुई

Next Post

काँग्रेसचे वाजले कि बारा, कालचा गोंधळ होता बरा

हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

Next Post

काँग्रेसचे वाजले कि बारा, कालचा गोंधळ होता बरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.