Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

ऍस्ट्रोगुरु ज्योती जोशी एकदम शी शी !!

हेमंत जोशी by हेमंत जोशी
December 14, 2024
in Corruption, Mantralaya, Politics
0

ऍस्ट्रोगुरु ज्योती जोशी एकदम शी शी !!

ज्यांना पोहायला येत नाही त्यांनी विहिरीत उडी मारू नये, ज्यांना लैंगिक दुर्बलता आहे अशा पुरुशांनी लग्न करू नये तद्वत जे राजकीय दृष्ट्या अक्कलशून्य आहेत त्यांनी राजकीय भविष्य वर्तवून स्वतःचे हसे करून घेऊ नये. भविष्य वर्तविणारे तसेही मला एकप्रकारे लुटारू अधिक वाटतात किंवा लुटणे लुबाडणे फसविणे हेच भविष्य वर्तविणाऱ्या मंडळींचे काम असते. स्वतःला ऍस्ट्रोगुरु म्हणवून घ्यायचे आणि नेमके खोटे भविष्य सांगायचे वरून सांगायचे कि मला राजकारणातले फारसे कळत नाही, थेट सांगा कि तुम्हाला भविष्यातलेच काही कळत नाही. यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत असे भविष्य वर्तविणाऱ्या कुठल्या तरी थापाड्या ऍस्ट्रोगुरु ज्योती जोशी, नेमके फडणवीसच मुख्यमंत्री झाले आणि बाई तोंडावर पडल्या मग सारवासारव करतांना त्यांनी एका मुलाखतीत कुठलेसे एका राजाचे अगदीच तकलादू कथानक जोडून सारवासारव कारण्याचा प्रयत्न केला वरून मला राजकारणातले फारसे काही कळत नाही अशी कबुली पण दिली थोडक्यात त्यांना राजकारणातले काही कळत नाही पेक्षा या तद्दन उथळ ऍस्ट्रोगुरुला भविष्यातलेच काही कळत नाही असे मला याठिकाणी जाहीर सांगावेसे वाटते. आजकाल अमुक एखाद्या नेत्याची पक्षाची सुपारी घायची किंवा निखिल वागळे पद्धतीने पूर्वग्रह दूषित पद्धतीने पत्रकारिता करायची हा आजकाल बहुतेक पत्रकारितेत किंवा वाहिन्यातील उथळ धंदा, अशावेळी ज्योती जोशी पद्धतीच्या केवळ बोलघेवड्या मंडळींना हाताशी धरून त्यांच्याकडून वाट्टेल ते वदवून घेणे त्यावर पैसा मिळविणे त्यातून हे घडते. सांगितलेले भविष्य फसल्यावर ज्योती जोशी म्हणाल्या मला राजकारणातले काही समजत नाही, अग बाई तुला भविष्यातलेच काही समजत नाही, उगाच जोशी आडनावाला बदनाम करू नको आणि सुपार्या घेत फडणविसांवर असले फाल्तुक भविष्य देखील वर्तविणे नको….

www.vikrantjoshi.com

ज्यांची जन्म वेळेनुसार अगदी तंतोतंत कुंडली तेही त्या त्या वेळी एखाद्या तज्ज्ञाकडून तयार केलेली असते त्यावरून फारतर नेमके भविष्य वर्तविल्या जाते किंवा जाऊ शकते, मात्र बहुतेक भारतिय उथळ भविष्य सांगणार्या या अशा ज्योती जोशी छाप लोकांच्या कींवा अमुक एखाद्या बुवाबाजीच्या नादी लागून बहुतेकवेळा वेळ आणि पैसा वाया घालवितात असे माझे स्पष्ट मत आहे किंवा तसा आलेला अनुभव आहे. भारतीय छोट्या मोठ्या संकटात खचतात घाबरतात हतबल होतात आणि हमखास बुवाबाजी किंवा ज्योती जोशी पद्धतीच्या उथळ मंडळींच्या मागे लागतात वरून आणखी आणखी फसवणूक करून घेतात, उशिराने त्यांच्या लक्षात येते कि आपली फार मोठी फसवणूक झालेली आहे. भारतीयांनी सतत सावध असावे यापद्धतीच्या लुटारूंकडून फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. फडणवीसां विषयी खोटे भविष्य वर्तविल्याबद्दल कुठल्या या उथळ ऍस्ट्रोगुरु ज्योती जोशी यांनी लोकांची जाहीर माफी मागावी आणि पुन्हा असा आगाऊपणा आपल्या हातून घडणार नाही हेही जाहीर सांगावे….

तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Previous Post

The ‘Aftermath’ of the swearing-in ceremony!

Next Post

मुख्यमंत्री कार्यालय कसे असावे असे नसावे : भाग 1

हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

Next Post

मुख्यमंत्री कार्यालय कसे असावे असे नसावे : भाग 1

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.