Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती : भाग २: पत्रकार हेमंत जोशी

tdadmin by tdadmin
January 31, 2021
in Uncategorized
0
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती : भाग २: पत्रकार हेमंत जोशी


मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती : भाग २: पत्रकार हेमंत जोशी 

बाळासाहेब पाटील नवे सहकार मंत्री आहेत, मंत्री झाल्या झाल्या त्यांना सहकार खाते मिळणे तसे भाग्याचे लक्षण, बाळासाहेब भाग्यवान आहेत पण सहकार मंत्री म्हणून त्यांना स्वतःच्या नावाचा पदाचा कचरा करवून घ्यायचा नसेल तर त्यांनी सावध असावे पण ते  सावध असावेत वाटत नाही कारण ज्या कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची तुलना थेट रस्त्यावर उभे राहून वेश्याव्यवसाय करणाऱ्या रांडांशी व्हावी, केल्या जावी असे काही कर्मचारी अधिकारी बाळासाहेब पाटलांनी थेट आपल्या कार्यालयात म्हणजे मंत्री आस्थापनेवर नेमल्याने, नजीकच्या काळात बाळासाहेब पाटलांना तेही सहकार मंत्री म्हणून स्वतःचे नाव खराब करवून घ्यायचे आहे कि काय असे दिसायला वाटायला लागले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा धनाढ्य नालायक भ्रष्ट हलकट पापी हरामखोर नीच उलट्या काळजाचा बेधुंद माजोरडा छांदिष्ट मतिभ्रष्ट नवश्रीमंत पाताळयंत्री अधिकारी, भामटा अविनाश देशपांडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी थेट आपल्या कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमल्याने ज्यांना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधले आतबट्ट्याचे व्यवहार माहित आहेत त्यांना या नालायक अविनाश देशपांडे याची तेही थेट सहकार मंत्र्यांच्या कार्यालयात महत्वाच्या पदावर नेमणूक होणे म्हणजे बाळासाहेब पाटलांनी माकडाच्या हाती कोलीत दिलेले आहे असे जो तो म्हणू लागलेला आहे…

ज्या रामप्रसाद बोर्डीकर यांनीं ते  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष असतांना अविनाश देशपांडेला थेट परभणीतून येथे आणले नोकरीत चिटकवले त्या बोर्डीकर यांच्याकडे पाठ फिरवणारा हा अविनाश देशपांडे, माझे वाक्य आजच लिहून ठेवा, बाळासाहेब पाटलांचा जणू सूड उगविण्यासाठी पाठविलेला राक्षस आहे हे त्यांना स्वतःला देखील नजीकच्या काळात नक्की लक्षात येईल कारण केवळ सतत पैसे खाणे हाच ज्याचा प्रमुख हेतू आहे तो अविनाश देशपांडे येथे बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयात देखील तेच नीच काम करणार आहे जे तो आजपर्यंत करीत आला आहे. हाच हलकट देशपांडे १९९२ दरम्यान साधा सहाय्यक सचिव म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये रुजू झाला नंतर या भामट्याने १९९४ मध्ये आपल्या नोकरीचा राजीनामा दिला पण १९९५ दरम्यान त्याच्याच परिसरातले जयप्रकाश मुंदडा जेव्हा सहकार खात्याचे मंत्री झाले, सारे नियम बाजूला ठेऊन हरामखोर अविनाश देशपांडे बेकायदेशीर पुन्हा सेवेत नोकरीत रुजू झाला, विशेष म्हणजे मुंदडा यांच्या आशीर्वादाने त्याला सेवेमधली ज्येष्ठता पूर्ववत लाभली, देण्यात आली. पुढे हाच देशपांडे २००२ दरम्यान मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उपसचिव झाला, आज गेली कित्येक वर्षे त्याने तेथल्या काही मंडळींना हाताशी धरून कोट्यवधी रुपयांची

मालमत्ता जमा केलेली आहे…


www.vikrantjoshi.com

अविनाश देशपांडे यासी अलीकडे सोडून गेलेल्या त्याच्या एका खाजगी कर्मचाऱ्याने मला देशपांडे याच्या कुटुंबाच्या नावे असलेली राज्यातली राज्याबाहेरची मालमत्ता आणि बेनामी संपत्ती, तो साराच प्रकार मी यथावकाश नक्की तुमच्यासमोर मांडणार आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे देशपांडे आणि कुटुंबाच्या पारपत्रकांच्या म्हणजे पासपोर्ट मधल्या परदेशी जाण्या येण्याच्या नोंदी बघून तर एक ब्राम्हण कर्मचारी एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतो कसा, राहून राहून आश्चर्य वाटले. मुलाचे परदेशी शिक्षण आणि देशपांडे कुटुंबाचे सतत परदेशात येणे जाणे, सामान्य  माणसाला नक्की वेड लागेल. या अविनाश देशपांडे यासी निवृत्त होण्यास केवळ दोन वर्षे शिल्लक असतांना हा हरामखोर करप्ट अधिकारी एकप्रकारे बेकायदेशीर कसा काय मंत्री आस्थापनेवर रुजू झाला आहे, बघून आश्चर्य वाटते. अनेक वरिष्ठांच्या हुबेहूब सह्या करण्यात वाकबगार असलेला अविनाश देशपांडे नजीकच्या काळात जर बाळासाहेब पाटलांच्या सह्या करून मोकळा झाला तर खुद्द बाळासाहेब पाटलांनी फारसे आश्चर्य वाटून घेउ नये…

क्रमश: हेमंत जोशी 

Previous Post

एबीपी गाढव माझा :पत्रकार हेमंत जोशी

Next Post

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती : बाळासाहेब पाटील: पत्रकार हेमंत जोशी

tdadmin

tdadmin

Next Post
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती : बाळासाहेब पाटील: पत्रकार हेमंत जोशी

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती : बाळासाहेब पाटील: पत्रकार हेमंत जोशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.