Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

भाग 2 : पत्रकारांची अधिस्वीकृती कि पत्रकारितेतील विकृती

हेमंत जोशी by हेमंत जोशी
August 31, 2023
in Corruption, Mantralaya, Politics
0

भाग 2 :
पत्रकारांची अधिस्वीकृती कि पत्रकारितेतील विकृती

इतर कोणतेही शासकीय ओळख पत्र देतांना विशेष म्हणजे संख्या मोठी असतांना कोणतीही समिती त्यासाठी राज्य किंवा केंद्र शासन नेमताना दिसत नाही मात्र राज्यातल्या मूठभर पत्रकारांना अधिस्वीकृती पत्र प्रदान करताना एक नव्हे तब्बल सात समित्या जिल्हावार नेमण्यात आलेल्या आहेत, असे अनेक आहेत कि ज्यांना कुठल्याही पत्रकारितेतील बातम्यांचा लिखाणाचा दूर दूर पर्यंत गंध नसतो त्यांना कवडीची अक्कल नसते पण एकदा का नियमात राहून शासकीय अधिस्वीकृती पत्र पदरात पाडून घेतले कि हे असे कितीतरी बेअक्कल थेट मंत्रालयापासून तर प्रत्येक पुढाऱ्यांपर्यंत पत्रकार म्हणून स्वतःला मिरवून आणतात बक्कळ पैसे मिळवून मोकळे होतात अशावेळी जे हाडाचे उत्तम निष्णात पत्रकार असतात त्यांना या अशा पद्धतीच्या नालायक मीडियाकडे बघतांना अक्षरश: ओकारी येते. पत्रकारांच्या संघटना, विशेषतः मंत्रालय वार्ताहर संघासारख्या प्रभावी संघटना त्याआड राहून दुकानदारी किंवा वाहिन्या वृत्तपत्रांच्या मालकांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर दलाल्या, वरून अति सभयतेचा बुरखा पांघरून वाहिन्या वृत्तपत्रे त्यांचे मालक आणि तेथे काम करणारे हे असे वादग्रस्त दलाली करणारे पत्रकार, मीडियातले नको तेवढा उबग आणतात…

www.vikrantjoshi.com

जनतेला देशाला ज्ञानाचे डोस पाजणाऱ्या आणि सतत दररोज कायम तद्दन खोटी आकडेवारी दाखवून दर दिवशी विशेषत: माहिती व जनसंपर्क कार्यालयातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्यांना चिरीमिरी देऊन शासनाला पर्यायाने जनतेला जाहिरातींच्या रूपात लुबाडणार्या राज्यातल्या समस्त म्हणजे अगदी लोकमत सकाळ पुढारी लोकसत्ता पासून तर गावगाड्यापर्यंत साप्ताहिके काढून शासनाच्या तिजोरीवर दरोडा घालणार्या साऱ्याच वृत्तपत्रांना, त्यांच्या दरोडेखोर मालकांना तुरुंगात धाडण्याची आजतागायत एकही सरकारची हिम्मत न होणे हे या राज्याच्या गांडुपणाचे ज्वलंत उदाहरण आहे असे माझे ठाम मत आहे. विशेष म्हणजे अख्य्या देशात महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे जेथे पत्रकारांना अधिस्वीकृती पत्र देण्या राज्यभर सात विविध समित्या विनाकारण आणि खर्चिक स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या समित्यांच्या एकदा का त्यातील सदस्यांची निवड झाली कि वर्षभर विविध ठिकाणी बैठकांच्या नावाखाली शासकीय खर्चांनी सहली घडवून आणल्या जातात शिवाय अनेक पत्रकारांचे नको ते चोचले पुरविण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी गावात फिरून मान्यवरांना भिका मागून या समित्यांचे लाड पूर्ण करतात. वर्षभर समित्यांच्या बैठका मुद्दाम पर्यटन स्थळी घेण्यात येतात जेणेकरून सदस्यांची हौस आणि मौज शासकीय खर्चातून भागते. समित्यांवर निवडून येणारे असे कितीतरी सदस्य जे अधिस्वीकृती पत्र मिळविण्या अजिबात पात्र नसतात पण या अशा समस्त नालायकांसाठी समितीचे अनेक नियम धाब्यावर बसविण्यात येतात. तेच जर सदस्य विरोधी गटातला असेल तर काही खडूस सदस्य अगदी बाईक नजरेने त्यावर लक्ष घालीत एखाद्या लायक पत्रकाराचे प्रसंगी अधिस्वीकृती पत्र रद्द करून त्याला जगणे जेवणे नकोसे करून सोडतात. थोडक्यात आपल्या एकमेव राज्यात या असल्या समित्या हव्यात कशाला, राजकीय आणि जातीचे राजकारण जोपासायला कि बहुसंख्य मीडियातल्या मंडळींना फुकटात हाडूक चघळायला, एकनाथ शिंदे यांनी या असल्या समित्या बरखास्त करून त्याआड जमलेल्या बहुसंख्य जातीयवादी आणि दलाल मीडियाला वठणीवर आणून सोडावे…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Previous Post

पत्रकारांची अधिस्वीकृती कि पत्रकारितेतील विकृती

Next Post

कोणाला नैराश्य कोणाची नाराजी आणि फडणवीसांची फजिती

हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

Next Post

कोणाला नैराश्य कोणाची नाराजी आणि फडणवीसांची फजिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.