Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

कोई पत्थर सें ना मारे मेरे दिवाने को …

हेमंत जोशी by हेमंत जोशी
January 23, 2022
in Mantralaya, Politics, Social
0

कोई पत्थर सें ना मारे मेरे दिवाने को …

-पत्रकार हेमंत जोशी

जो उठतो मग तो विरोधातला असो कि पक्षातला विरोधक त्या देवेंद्र फडणवीसांना शाब्दिक दगड मारून मोकळा होतो मग अमृता चवताळून ढाल म्हणून पुढे येते आणि लैला मजनू सिनेमातले गाणे म्हणून मोकळी होते, कोई पत्थर सें ना मारे मेरे दिवाने को, हे असेच चालले आहे मागल्या दोन अडीच वर्षांपासून, एकटा देवेंद्र सर्वांना अंगावर घेतो आहे आणि मोठ्या प्रमाणात पुरून उरण्याचा आटोकाट प्रयत्न कारतोय त्यात कधी यश येते कधी येत नाही पण अद्याप देवेंद्र खचले नाही हरले नाहीत आणि घाबरले तर अजिबात नाहीत. परमहंस यांनी सांगितलेल्या एका कथेचा येथे आधार घेतो. एका बांधावरून बाप दोन मुलांना घेऊन चाललेला असतो त्यातला एक कडेवर बसलेला असतो आणि दुसरा बापाचा हात धरून चाललेला असतो. आकाशात जेव्हा दोन्ही मुलांना उडणारी घार दिसते, दोघेही टाळ्या वाजवतात त्यातला बोट धरून चालणारा चिखलात पडतो पण दुसरा सेफ असतो कारण तो बापाच्या कडेवर बसलेला असतो. मोदींनी फडणवीसांचा हात सोडून दिलाय त्यामुळे फडणवीस कधी भरकटतात तर कधी चिखलात देखील अडकतात आणि इकडे उद्धव ठाकरे एकदम सेफ कारण ते पवारांच्या कडेवरून खालीच उतरायला तयार नाहीत, दोघांची गट्टी आणि एकमेकांना मारलेली घट्ट मिठी, नाही म्हणायला भाजपाला ते सळो कि पळो करून सोडताहेत. तुम्हाला म्हणून सांगतो किंबहुना उद्धव, पवार आणि फडणवीस या तिघांनाही मी जवळपास साडे चार दशके अगदी जवळून बघत आल्याने मी या तिघांविषयी काही गोष्टी अगदी हमखास सांगू शकतो. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचे स्वभाव वैशिष्ट्ये असे कि ते जेव्हा एखादा त्यांना मनापासून मोलाचा सल्ला देतो असे त्यांना वाटते तेव्हा हे दोघेही त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष कारताहेत असे सल्ला देणार्याला त्यावेळी उगाचच वाटते पण प्रत्यक्षात तसे अजिबात नसते म्हणजे तुमच्या सल्ल्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आहे असे हे दोघेही दाखवत असले तरी त्यांचे ते दाखवणे अगदी वरकरणी असते वास्तविक त्यांनी तो दिलेला सल्ला हृदयात तयाचक्षणी साठवलेला असतो आणि पुढे ते त्याच सल्ल्यानुसार वागायला देखील सुरुवात करतात, उद्धव ठाकरे यांचे मात्र या दोघांच्या पद्धतीने अजिबात वागणे नाही म्हणजे एखादा बावळट असो कि हुशार, उद्धव यांना भेटायला आलेला जेव्हा त्यांना सल्ला द्यायला सुरुवात करतो तेव्हा उद्धव त्याचा सल्ला एवढा कान देऊन ऐकतात कि सल्ला देणार्याला वाटते कि उद्धव त्याक्षणापासून त्याच्या खिशातले पण प्रत्यक्षात तसे अजिबात घडत नाही घडलेले नसते कारण उद्धव ऐकतात अगदी मनापासून जनाचे आणि कायम करतात मनाचे आणि त्यांचा हा स्वभाव ज्यांनी म्हणून ओळखला आहे ते मिलिंद नार्वेकर असतील किंवा सुभाष देसाई किंवा वरूण सरदेसाई, ज्यांना उद्धव यांनी जवळ घेतले आहे जवळ ठेवले आहे त्यातला एकही त्यांना कधीही फुकाचे सल्ले देण्याच्या अजिबात भानगडीत पडत नाहीत. जे सल्लागार होण्याच्या प्रयत्नांत आजपर्यंत होते ते सारेच्या सारे उद्धव यांच्यापासून कोसो दूर गेले किंबहुना उद्धव यांनी त्यातल्या प्रत्येकाला राजकारणातून उठविले संपविले संकटात टाकले अशांचे नेतृत्व त्यानंतर पार भरकटले. उद्धव म्हणजे चावडीवरचा सरपंच ज्यांच्यासमोर फक्त गर्दी कोंडाळा करून बसायचे असते आणि ऐकून घ्यायचे असते सल्ला अजिबात द्यायचा नसतो नाहीतर सल्ला देणारा पुढल्या काही महिन्यात बाराच्या भावात जातो…

क्रमश: हेमंत जोशी

Previous Post

धोक्याची घंटा मोक्याची सूचना…

Next Post

फडणवीसांचा वांदा मोदींनी वापरला त्यांचा खांदा…

हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

Next Post

फडणवीसांचा वांदा मोदींनी वापरला त्यांचा खांदा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.