Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

वृत्तपत्रांचा मृत्युलेख ३ : पत्रकार हेमंत जोशी

tdadmin by tdadmin
January 31, 2021
in Uncategorized
0

वृत्तपत्रांचा मृत्युलेख ३ : पत्रकार हेमंत जोशी 

हे असे प्रत्येक देशात निदान एकदा तरी घडायला हवे, त्याचे असे झाले, बायकोला म्हणालो, आपल्याला दुबईला जायचे आहे, तेथल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्थाही केलेली आहे, त्यावर ती चक्क ‘ नाही ‘ म्हणाली…अर्थात माझे हे वाक्य गंमतीने घ्यावे, एखाद्याचा जीव जावा आणि आपले भले व्हावे असे विचार डोक्यात येणेही चुकीचेच…तिने आता आमच्या बाथरूम मधला बाथटब देखील तातडीने काढून टाकला आहे, माझ्या खालच्या माळ्यावर एक शासकीय अधिकारी राहतात, त्यांनी तो चांगली किंमत देऊन विकतही घेतला…


श्रीदेवी गेली त्यादिवसापासून मी गोंधळात पडलोय कारण वाहिनी मग ती कोणतीही असो, दिवसभर सारेच्या सारे श्रीदेवीची गाणी, डान्स आणि तिच्या आयुष्याची बारी वाईट वाटचाल दाखविण्यात गुंतलेले आहेत, उद्या समजा सनी लिओनी गेली तर…बापरे! भारतातल्या कोणत्याही रस्त्यावरून त्यादिवसात पुरुष मंडळी दिसणारच नाहीत…ज्यांच्या लेखणीत दम आहे, श्रम आहेत, अभ्यास आहे, नियमितता आहे, व्यासंग आहे, मला नाही वाटत अशांचे वृत्तपत्र केवळ शासकीय जाहिराती मिळाल्यात तरच जगेल. तमाम अजिबात दर्जा नसलेल्या वृत्तपत्र मालकांनो, अहो, आपले राज्य, आपला देश हा दानशूरांचा आहे, तुमच्या चांगल्या लढ्यात या देशातले तमाम दानशूर मनापासून साथ आणि दाद देतात, हा माझा स्वतःचा अनुभव आहे, तुम्हाला ते कशातही कमी पडू देत नाहीत. म्हणूनच कैलास म्हापदी सारखे लढवय्ये निर्भय लेखणीबहाद्दर पत्रकार नियमितपणे त्या ठाण्यातून दैनिक चालवून, काढून मोकळे होतात पण जिद्द कशी, तर कैलाशला केव्हाही फोन करा, तो फक्त आणि फक्त वर्तमानपत्राशी संबंधित पोटतिडकीने बोलत असतो, आणि या अशा पराक्रमी मराठी पत्रकारांसमोर कुठलाही शेटजी टिकाव धरणे अशक्य असते, लोकमत सारख्या दैनिकांना पुढारी देशोन्नती सामना किंवा सकाळ सारखी दैनिके पुरून उरतात आहेत, जिद्द मोठे काम करते. पन्नास पन्नास वर्षे साप्ताहिके दैनिके पाक्षिके काढणाऱ्यांची वर्तमानपत्रे हातात देखील घ्यावीशी वाटत नाहीत, हे त्यांचे मोठे अपयश आहे, संध्यकाळच्या दारूची सोय झाली, मास मच्छी फुकटात खायला मिळाली, घरी नेण्या शे पाचशे रुपये दिले कि संपली यांची पत्रकारिता वरून या तद्दन भंगार वृत्तपत्रांनी संबंधितांना चिरीमिरी दिली कि वर्षानुवर्षे शासकीय जाहिराती मिळतात, ते उत्पन्न वेगळेच. या पत्रकारांना काहीही करायचे नसते फक्त लाचार भिकारी होऊन शासनाच्या जाहिरातींवर आणि संधी मिळेल तेथे ब्लॅकमेलिंग करून अतिशय भिक्कार पद्धतीने जगायचे असते, बरे झाले किंवा बरे होईल या अशा पत्रकारितेतले कवडीचीही ज्ञान नसलेल्यांच्या शासकीय जाहिराती बंद केल्या गेल्या तर….


एक मात्र शासनाने अवश्य करावे, या तमाम मंडळींना एक संधी द्यावी, वृत्तपत्र नेमके कसे असावे याचे नॉर्म्स ठरवून त्या पद्धतीने जी जी वृत्तपत्रे निघतील, त्यांच्या शासकीय जाहिराती सुरु ठेवाव्यात, कदाचित काहींचे डोळे उघडतील आणि त्यांच्यातले चांगले पत्रकार उफाळून पत्रकारितेचा देशभक्तपर लढा सुरु करतील, बदमाशांच्या नाकात दम आणून सोडतील, पण आज तरी हे असे चित्र धूसर आहे, उकडले तिकडले पाहून दैनिके तीही वेगवेगळ्या जिल्ह्यातून काढायची, शासनाच्या सवलती, जाहिराती लुटायच्या, पर्यायाने जनतेला आणि शासनाला कायम उल्लू बनवायचे, आम्ही पत्रकार आहोत, सांगून, सच्चा पत्रकारांच्या मांडीला मांडी लावून बसायचे, प्रतिष्ठा मिळवायची, त्या प्रतिष्ठेच्या आडून पित्तपत्रकारिता करायची, हे असले उद्योग यापुढे चालू न देण्याचे मोठे काम या शासनाने हाती घेतले आहे, त्यांचे मनापासून अभिनंदन फक्त हे सारे करतांना आमच्यातले सच्चे, कडवे, साधे, श्रेष्ठ पत्रकार किंवा वृत्तपत्रे मरणार नाहीत याचीही काळजी खबरदारी शासनाने अवश्य घ्यायला हवी….

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Previous Post

Sridevi-Karma is A Bitch! Anyways–RIP

Next Post

OFF THE RECORD review on some of headlines….

tdadmin

tdadmin

Next Post

OFF THE RECORD review on some of headlines....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.