Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

अभिमन्यू पॉवर २ : पत्रकार हेमंत जोशी

tdadmin by tdadmin
January 31, 2021
in Uncategorized
0

अभिमन्यू पॉवर २ : पत्रकार हेमंत जोशी 

खंडहर कहेता है कि इमारत बुलंद थी, हिंदीतली हि म्हण बहुदा तारुण्य संपलेल्या किंवा संपत चाललेल्या पण एकेकाळी म्हणजे ऐन तारुण्यात अति सुंदर असलेल्या स्त्रीविषयी अनेकदा हमखास आम्ही पुरुष वापरतो. नागपुरात अधिवेशनानिमित्ते रॅडीसन ब्ल्यू या पंच तारांकित हॉटेलमध्ये मुक्कामाला असतांना ( अधिवेशन सुरु असतांना या पंचतारांकित हॉटेलास आमदार निवासाचे स्वरूप प्राप्त झालेले असते, कारण राज्य हाकणारे सारेच त्यात अधिकारी दलाल मंत्री इत्यादी सारेच आलेत या अति महागड्या हॉटेलात मुक्काम ठोकून असतात ) एका चाळीशीकडे झुकलेल्या ओळखीच्या स्त्रीकडे बघतांना खंडहर कहता है, हीच म्हण वापरत मी एका मित्राला म्हणालो, त्या स्त्रीला अगदी तिच्या लहान वयापासून मी ओळखतो. ऐन तारुण्यात तर ती जेव्हा जवळून जायची, सारेच तिच्याकडे वळून वळून बघायचे. पण याच भर जवानीत तिच्यावर अचानक कौटुंबिक जबाबदारी पडली आणि उदरनिर्वाहासाठी विविध कामे घेऊन ती जेव्हा मंत्रालयात येऊ लागली तेव्हाच मी म्हटले होते आता तिचे काही खरे नाही कारण ज्यांच्या ज्यांच्या हाती ती सापडेल सारेच तिला ओरबाडून काढतील, खातील आणि तेच पुढे घडले, तिच्या शरीराचा सत्यानाश काहींनी केला, पण लवकरच ती एका नेत्याच्या कुशीत कीप म्हणून सुखावली जो नेता आज मंत्री आहे, स्त्री लंपट म्हणून विशेषतः शिवसेनेतले सारेच त्याला ओळखतात. तिने आपल्या शरीराचे आणि आयुष्याचे मातेरे करून घेतले आहे…ती जेव्हा आमच्या हॉटेलात जेथे आम्ही नाश्टा घेत होतो तेथे आली पण मला बघताच एका झटक्यात आल्या पावली मागे फिरली नंतर कोपऱ्यात कुठेतरी जाऊन बसली तेव्हाच मी मित्राला म्हणालो, ती ज्याअर्थी थेट मुंबईवरून येथे या हॉटेलात आली आहे याचा अर्थ असा तो मंत्री शंभर टक्के येथेच उतरला आहे. नेमके तेच घडले जेव्हा ती लिफ्ट मधून वर गेली मी तिला लिफ्टमधून वर सोडणार्याला विचारले ती कुठे गेली, त्याने मला त्याच मंत्र्यांचे नाव सांगितले. मित्र अवाक झाला…


अलीकडे पंढरपूरकडली एक उफाडी भरल्या अंगाची आणि ग्रामीण बाज असलेली महिला मंत्रालयात विविध कामे घेऊन येऊ लागली आहे, अशा बायका सुदैवाने कायम अगदी सुरुवातीपासून माझ्या खबरी असतात कारण त्या मला भेटायला आल्या कि मी त्यांना योग्य सल्ला देतो, त्या हमखास, नेहमी म्हणतात, भाऊ तुम्ही एकमेव असे जेथे आम्ही सेफ असतो. मी म्हणजे गांधारी 

नव्हे कि रस्त्याने डोळ्यांना पट्टी बांधून चालतो. मीही पुरुष आहे, माझेही मन रस्त्याने फिरतांना किंवा चांगले काही समोर आले कि भरकटते पण सय्यम पाळायलाच असतो. जो स्त्रीच्या वक्षस्थळांकडे नव्हे तर चेहऱ्याकडे बघून आपले बोलणे सुरु ठेवतो तेथे प्रसंगी रूपवती देखील सेफ असते, आईशपथ माझे अमुक एखाद्या स्त्रीकडे तिच्याशी बोलतांना नको त्या भव्य स्थळांवर 

कधीही लक्ष नसते कारण विश्वासाने ती तुमच्याकडे आलेली असते. विवाहित पुरुषांनी देखील प्रेमात पडायला हरकत नसते पण त्यांनी थेट समाजासमोर प्रेयसीला घेऊन जातांना नेमके नाते आणि प्रेमात का पडलो सांगायला पाहिजे. पण बहुतेक पुरुष तद्दन गांडू असतात, बायकोसमोर नांगी टाकतात..ती पंढरपूरकडली घटस्फोटित पस्तिशीतली तरुणी अधून मधून भेटली कि जे 

किस्से सांगते, ऐकून मनाचा संताप संताप होतो. तिनेच मला सांगितले होते कि राज्यमंत्री अंबरीश राजे अत्राम आणि मंत्री महादेव जानकर अविवाहित आहेत पण ब्रम्हचारी अजिबात नाहीत. नेमके खरे खोटे तिला त्या मंत्र्यांना स्वतःला आणि त्या देवालाच माहित…


अलीकडे सदाभाऊ खोत यांनी मिटवलेले त्यांचे बाईचे प्रकरण कसे खरे होते, हेही तिनेच मला सांगितले. स्त्रीदाक्षिण्य कसे पाळायचे असते हे विशेषतः देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, डॉ. रणजित पाटील अनंत गाडगीळ, इत्यादी बोटावर मोजण्याइतक्या नेत्यांकडून शिकायला पाहिजे. दोन तीन मंत्री तर एवढे नीच आहेत कि त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक तरुणीने त्यांच्यासोबत झोपायलाच पाहिजे आणि भेटायला येणाऱ्या प्रत्येक पुरुषाने पैसे देऊनच त्यांच्याकडून काम करवून घ्यायला पाहिजे असे त्यांनी जवळपास ठरविलेलेच आहे, जणू शपथच घेतलेली आहे. अर्थात हे प्रत्येकच मंत्रिमंडळात असते त्यामुळे मंत्री किंवा त्यांचा स्टाफ किंवा अन्य नेते किंवा शासकीय अधिकारी पारखूनच तरुण स्त्रियांनी त्यांच्याकडे काम घेऊन जायला हवे…


फडणवीस मंत्री मंडळातले एक स्त्री लंपट मंत्री तर असे आहेत कि बाई हा तर त्यांचा वीक पॉईंट आहेच पण जे पुरुष त्यांना अमुक एखाद्या कामासाठी आगाऊ रक्कम देतात, त्यांच्याकडे काम तर होत नाहीच पण आगाऊ दिलेले पैसे त्यांनी परत केले, कधीही घडत नाही. भाजपामध्ये केवळ देखण्या तारुण्याच्या भरवशावर ‘ शाईन ‘ मारणारी स्त्री देखील हेच करते किंवा करायची, तिने जेव्हा माझ्या एका सुसंस्कृत विधवा मैत्रिणीचे लाखो रुपये बुडविले तेव्हा तिचे हे प्रकरण मी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातले तरीही तिने पैसे परत केले नाहीत पण एक झाले कि पक्ष श्रेष्ठींकडून मुख्यमंत्र्यांना सूचना आल्या असाव्यात त्यामुळे तिला अलीकडे मुख्यमंत्र्यांनी, अन्य मंत्र्यांनी, तिच्या पक्ष श्रेष्ठींनी देखील दूर ठेवल्याचे ठळकपणे दिसते, पक्षाच्या नावाने मोठमोठाल्या देणग्या दबाव टाकून जमा करायच्या आणि देणग्या म्हणून मिळालेल्या रकमा जमा न करता स्वतः हडप करायच्या हे तर तिचे नित्याचे उद्योग मात्र याबाबतीत फडणवीस भयंकर खडूस आहेत, त्यांना हे प्रकार लक्षात आले कि ते आकाश पातळ एक करतात. तुम्हीही अशा ‘ शाईन ‘ मारणाऱ्या बदमाश बायकांपासून किंवा नेत्यांपासून कायम सावध राहायला हवे…


१९८० ते २०१८ दरम्यान आम्ही शंकरराव चव्हाण किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे काही मुख्यमंत्री आणि काही मंत्री राज्यमंत्री स्त्रियांच्या बाबतीत सज्जन बघितलेत पण अख्खे मंत्रिमंडळ स्त्रियांचा आदर करणारे, एकदाही कधी असे घडलेले बघितले नाही. बाया झोपवणे आणि पैसे कमविणे हेच जणू बहुतेक मंत्री मुख्यमंत्री हमखास ठरवून आलेले असतात. अशावेळी केवळ आपल्याच नरगिस वर मनापासून प्रेम करणारे बॅरिस्टर ए. आर. अंतुले अनेकदा आदरापोटी आठवतात…


श्रीमान सुमित वानखेडे किंवा अभिमन्यू पवार म्हणाल तर फडणवीसांचे पीए आहेत म्हणाल तर सहकारी आहेत , विशेष म्हणजे अभिमन्यू पवार यांना तर राजकीय भवितव्य आहे, ते महत्वाकांक्षी आहेत, त्यांना थेट लातूर मधून म्हणजे त्यांच्या गावातून, येणारी विधान सभा लढवायची आहे, त्यांना अमित विलासराव देशमुख यांना पराजित करायचे आहे आणि ते त्यांना अगदी सहज शक्य आहे. पण थेट मुख्यमंत्र्यांकडे काम करीत असतांना देखील त्यांनी पैसे न खाण्यात जो संयम पाळलेला आहे म्हणून मी म्हणतो, अभिमन्यू पवार यांचे हे संयमी वागणे म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्या सारखे आहे किंवा एखाद्याने रूपवती स्त्रीच्या शेजारी पलंगावर झोपून देखील पाठ करण्यासारखे त्यांचे संतुलित वागणे आहे…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Previous Post

अभिमन्यू पॉवर १ : पत्रकार हेमंत जोशी

Next Post

अभिमन्यू पॉवर ३ : पत्रकार हेमंत जोशी

tdadmin

tdadmin

Next Post

अभिमन्यू पॉवर ३ : पत्रकार हेमंत जोशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.