Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

वृत्तपत्रे वाहिन्या व निवडणुका : पत्रकार हेमंत जोशी

tdadmin by tdadmin
January 31, 2021
in Uncategorized
0

वृत्तपत्रे वाहिन्या व निवडणुका : पत्रकार  हेमंत जोशी 

आयबीएन लोकमत वाहिनीवर उमेश कुमावत आणि त्याचा कंपू लोकसभा निवडणुकीनिमित्ते काही मॅनेज्ड मुलाखती घेतांना बघितले, निवडणुकांच्या काळात वाहिन्या बघतांना आणि बहुतेक जवळपास सारीच वृत्तपत्रे वाचता वाचता आपोआप ओकार्या येतात, स्वतःच स्वतःची किळस येते, आपणही किती विकाऊ क्षेत्रात काम करतो याची, काय करू शकतो, एखाद्या वेश्ये सारखा विचार करून कामाला लागतो, म्हणजे गंदा है पर धंदा है, हा तो विचार असतो. आयबीएन लोकमत वाहिनीवर निखिल वागळे, डॉ. उदय निरगुडकर यांच्यानंतर थेट अतिशय सुमार उमेश कुमावतला बघतांना माझीच मला लाज वाटते. पण चूक जशी आयबीएन लोकमतची होती तशी ती वागळे आणि निरगुडकरांची अधिक होती, या दोघांनी, मालकाच्या पुढून आणि गाढवाच्या मागून जायचे नसते, ध्यानात न ठेवल्याने एकाचवेळी सारेच मागे गेले म्हणजे निरगुडकर, वागळे आणि आयबीएन लोकमत किंवा झी वाहिनीदेखील. शेठजींकडे नोकरी करतांना हुशार आहोत नक्की दाखवून द्यायचे असते पण तुमच्यापेक्षा हुशार आहोत, अतिहुशार आहोत दाखवायचे भासवायचे अजिबात नसते. म्हणजे एखादा प्रतिभावंत विजय कुवळेकर यांच्या प्रमाणे सुखासमाधानाने नोकरी करून निवृत्त होऊन बाहेर पडतो. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, भल्याभल्यांचा मग असा कचरा होतो, हि म्हण त्या दोघांना किंवा अशा ज्यादा चमकू पाहणाऱ्यांना तंतोतंत लागू पडते. नुकसान नक्की या अशा मंडळींना ऐकणाऱ्यांचे होत असते, वचक ठेवणारी माणसे राज्याची राष्ट्राची गरज असते, वागळे निरगुडकर तोरसेकर हवे असतात…


शेठजी मंडळींना फरक पडतो आणि पडतही नाही म्हणजे डॉ. निरगुडकर किंवा निखिल वागळे यांच्यानंतर त्या गाजवून सोडलेल्या सिंहासनावर आपण थेट एका अत्यंत सामान्य वकूब असलेल्या उमेश कुमावत सारख्या अँकर ची नेमणूक केली आहे हे त्या विजय दर्डा किंवा सुभाष गोयल यांना लक्षात आलेले असते नुकसान होते आहे, दर्जा घसरला आहे हेही त्यांच्या ध्यानात येत असते पण स्वतःच्या इगोपुढे या शेठजी मालकांना सारे फिके वाटत असते. आर्थिक गणिते जमवून आणतो, जमवून देतो, अशी माणसे त्यांना अधिक भावतात. सामान्य वकूब असला तरी वृत्तपत्र कार्यालयांची सरकारी जागा वाचवणारे, आर्थिक रसद पुरविणारे सरकारी दरबारी दलाल्या करणारे वार्ताहर किंवा वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्यांना मोठी मागणी असते. महाराष्ट्र टाइम्स सारख्या वृत्तपत्रांमध्ये किंवा अशा पद्धतीने विविध वाहिन्यांमध्ये काम करणारे असे असंख्य मंडळी मला ठाऊक आहेत ज्यांना पगार अगदी जेमतेम पण त्यांच्या मालमत्ता डोळे विस्फारणार्या आहेत. माझ्याकडे पुरावे आहेत. असे अनेक म्हणजे महाराष्ट्र टाइम्स किंवा फ्री प्रेस मध्ये लिखाणावर प्रभुत्व असलेल्यांपेक्षा जो त्यांना दिलेल्या जमिनी सरकार परत घेणार याची काळजी अधिक घेतो, मालकांना भानगंडींमध्ये किंवा फाईल्स क्लिअर करतांना जो अधिक सहकार्य करतो त्याला डिमांड असते त्यामुळे काहीही झाले तरी मालक आम्हाला नोकरीतून काढून टाकणार नाहीत असे निरगुडकर किंवा वागळेंच्या दुनियेत 

अजिबात कोणीही वावरायचे नसते. येथे या राज्यात आपण सारे मराठी अमराठीच्या हातातले बाहुले आहोत, मराठींसारखे मूर्ख कोणीही नाही, हे शेठजींना, अमराठींना नेमके माहित असल्याने आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी इसवी सन २००० उजाडावे लागले, हल्ली हल्ली मराठी माणूस सुधारलेला दिसतोय म्हणजे त्याला हे लक्षात आले आहे कि नोकर का, मालक का नाही, पण प्रमाण आजही अत्यल्पच आहे…


विषयांतर यासाठी केले कि यावेळी तब्बल १६ पानांचा अंक निवडणूक विशेषांक मी काढतोय. अनेक जवळचे मित्र खासदारकीची निवडणूक लढवताहेत म्हणजे ठरविले असते तर मला इतरांसारखे खूप मिळविता कामविता आले असते, एकाचवेळी एकाचदिवशी जशा तीन तीन वाहिन्यांवर उदयन राजे भोसले यांच्या त्याच त्या प्रश्नांवर म्हणजे ठरवून दिलेल्या प्रश्नांवर मुलाखती सुरु होत्या ते तसे फार मोठे दुकान मला देखील नक्की थाटता आले असते, आपणही तसे वागायचे का, तशी गरज आहे का किंवा नेत्यांसमोर झुकण्याचा आपला स्वभाव आहे का, मनाला प्रश्न विचारल्यानंतर ‘ नाही ‘ असे उत्तर आले आणि या पंचवार्षिक योजनेत मग त्यातल्या त्यात जीव तोडून चांगले काम कोणी केले तर नाव देवेंद्र फडणवीस 

यांचे नजरेसमोर आले आणि लिहायला घेतले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना देखील हीच परिस्थिती होती म्हणजे त्यांना जर मुख्यमंत्री केले नसते तर राष्ट्रवादीने त्यांच्या मंत्र्यांनी गेट वे ऑफ इंदिरा देखील आमच्याच मालकीचे, सांगून तेही विकले असते म्हणून त्यादरम्यान प्रत्येक अंकात मी तीव्रतेने पृथ्वीराज चव्हाणांची बाजू घेत असे जसे एक योग्य, कणखर, दमदार, पुरून उरणारे नेतृत्व म्हणून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे बघतो….

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Previous Post

पवारांची लायक नालायक पिढी : पत्रकार हेमंत जोशी

Next Post

मोठी माणसे : पत्रकार हेमंत जोशी

tdadmin

tdadmin

Next Post

मोठी माणसे : पत्रकार हेमंत जोशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.