Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

उद्धवा का करावी वाहवा ? पत्रकार हेमंत जोशी

tdadmin by tdadmin
January 31, 2021
in Uncategorized
0
उद्धवा का करावी वाहवा ? पत्रकार हेमंत जोशी

उद्धवा का करावी वाहवा ? पत्रकार हेमंत जोशी 

काही वर्षांपूर्वी एका बंगाली बाबूने प्रेयसीला हाताशी घेऊन जुन्या दिल्लीत, पैसे गुंतवा दुप्पट घेऊन जा पद्धतीची कंपनी काढून लोकांकडून अमाप पैसे गोळा केले आणि काही वर्षातच त्याने परदेशात पोबारा केला, गुंतवणूकदारांना जेव्हा हे कळले त्यांनी त्यानंतर त्याचे भाड्याचे कार्यालय आणि भाड्याचे घर फोडून हाती लागेल ते उचलून नेले म्हणजे चोराची लंगोटी सही पद्धतीने त्यांनी दोरीवर वाळत घातलेल्या त्याच्या प्रेयसीच्या ब्रा आणि पॅंटी पण सोडल्या नाहीत, एक महागडी ब्रा तर दोघांनी खेचता खेचता मध्येच तिचे दोन भाग झाले गरिबांनी तेही दोन भाग लुटून नेले. हुबेहूब सध्या महाआघाडी सरकारात घडते आहे, नेमके कळत नाही म्हणजे उद्धव यांच्या ते लक्षात येत नाही कि त्यांची मजबुरी आहे कि ते पूर्णतः हतबल ठरले आहेत पण त्यांच्या दुर्लक्ष करण्याचा म्हणा किंवा नेमका अभ्यास नसण्याचा गैरफायदा जो तो उचलतो आहे मग त्यात दलाल आले पत्रकार आले महाआघाडीतले जवळपास सारे मंत्री आणि साऱ्याच थरातले सरकारी अधिकारी कर्मचारी आले, ज्याच्या हाती जे लागेल ते तो तो लुटून नेत असल्याने अक्षरश: आपल्या राज्याची तुलना एकेकाळच्या झुंडशाही असलेल्या बिहार राज्याशी होऊ लागलेली आहे आणि मला वाटते सर्वाधिक महत्वाचे असे कि जोपर्यंत कोरोना महामारी आटोपत नाही तोपर्यंत उद्धव यांना पद्धतशीर अंधारात ठेवून मातोश्रीशी संबंधितांपासून तर राज्यातल्या शेवटच्या सरकारी महाचोरांपर्यंत जो तो लुटपाट करून मोकळा होतो आहे आणि हे मी माझ्या चार दशकांच्या पत्रकारितेत पहिल्यांदा एवढे प्रचंड घाणेरडे घडतांना बघतो आहे…  

अलीकडे माझ्या ओळखीच्या एका जाडजूड नेत्याचे निधन झाले. शारीरिक दृष्ट्या तो अगडबंब असल्याने असल्याने मला अकोल्यातल्या बाबासायबांसारखा सेक्स करता येत नाही याची त्याला कायम खंत होती त्यात त्याने इंदिराजींचा भक्त असल्याने कुटुंब लहान तर सुख महान पद्धतीने स्वतःचे वय ५० असतांना २५ वर्षाच्या शिक्षिकेशी लग्न करून तो मोकळा झाला होता पण भरधाव धावणाऱ्या घोड्यावर मरतुकड्या पुरुषाने स्वार व्हावे तसे त्याचे दर रात्री होत असे त्यामुळे ती चवताळून अंगावर येईल असे दारू पिऊन आल्यानंतर अजिबात काही करू नको असा सल्ला मी त्याला दरवेळी देत असे. तोच सल्ला विशेषतः मी उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांना दिला होता तुम्हालाही ते आठवत असेल कि कामांध झालेल्या गाढवासारखे त्या अर्णबला निखिल वागळेयांच्यासारखे अंगावर घेऊ नका त्यांनी माझा सल्ला मानला नाही शेवटी व्हायचे तेच झाले ज्या शिवसेना आणि मुंबई पोलिसांनी कधीकाळी एकेकाळी आक्रस्ताळ्या निखिल यास राज्यातला मोठा किंवा महान पत्रकार विनाकारण घडविले ठरविले आता तर अर्णब गोस्वामी थेट जगातील आणि अख्या हिंदुस्थानातील निखिल वागळे म्हणून नावारूपाला तुम्ही विनाकारण आणून ठेवला आहे. अर्णब च्या बडबडीकडे दुर्लक्ष करा, त्याला त्याच्या वाहिनीला अवास्तव महत्व देऊन हे झवते गाढव अंगावर घेऊ नका असे मी वारंवार बजावत होतो पण मुंबई पोलीस आणि उद्धव ठाकरे यांनी अर्णबच्या अवास्तव बडबडीला नको तेवढे महत्व देऊन केवळ त्याचा बदला घेण्याच्या दृष्टीने काही पावले विनाकारण उचलीत आणि स्वतःचे महत्व किंवा वाटोळे करून घेतले असे माझे स्पष्ट मत आहे. आता तर थेट निखिल सारखी हुबेहूब शिवसेना आणि मुंबई पोलिसांविषयीची भीती अर्णब गोस्वामींच्या कायमस्वरूपी मनातून यापुढे निघून जाईल त्यामुळे त्याची बडबड शंभर टक्के मुंबई पोलीस व त्याच्याशी खेटलेल्या नेत्यांना पुढले काही वर्षे मोठे त्रासाचे ठरतील… 

अर्णब गोस्वामीला अटक झाली पण शरद पवार कोठे काही त्यावर प्रतिक्रिया देऊन मोकळे झाल्याचे दिसले का, तेच शिवसेना नेत्यांनी आणि मुंबई पोलिसांनी करायला हवे होते नेमके तेच भारतीय मीडिया ला देखील हवे होते कारण कोणतीही भारतीय किंवा या राज्यातली मीडिया अर्णब गोस्वामींच्या बाजूने नाही त्यांना मुंबई पोलीस आणि शिवसेना नेत्यांविषयी अधिक सॉफ्ट कॉर्नर आहे त्यामुळे मीडियातले म्हणतात कि बरे झाले पाव्हण्याच्या हाताने साप मेला पण मला हे वाटते कि अख्खी भारतीय मीडिया शिवसेना आणि मुंबई पोलिसांच्या बाजूने काही ठिकाणी उघड तर काही ठिकाणी आतून त्यांच्या बाजूने असतांना एकट्या अर्नबच्या बडबडीने या दोघांची मोठी बदनामी झाली असती असे अजिबात घडले नसते तिकडे केवळ अर्णब मुंबई पोलीस, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे, शिवसेना आणि महाआघाडी सरकार विरोधात बडबड करण्यात गुंतून पडला असतांना इतर अख्खा मीडिया मात्र या मंडळींच्या बाजूने उभा होती. अर्णब गोस्वामी यास अटक करून त्याला अवास्तव महत्व देऊन त्याला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवल्याने इतर मीडियावाले नाराज झाले आणि अर्णब तर तुमच्या विरोधात केव्हाच गरळ ओकून मोकळा होतो आहे. अर्णब यास महत्व न देणे हा त्याचे महत्व संपविण्याचा एकमेव रामबाण उपाय व इलाज होता. वाचकांनो, एक मात्र नक्की कि भाजपाच्या दृष्टीने नक्की काही तरी राज्यात फायद्याचे घडले आहे ज्याचे सुपरिणाम तुम्हाला कोरोना महामारी नंतर बघायला मिळतील थोडक्यात दिशा सालियन किंवा सुशांत सिंग किंवा ड्रग्स प्रकरण किंवा कंगना राणावत प्रकरणे उगाच नक्की अचानक असे थांबलेले नाहीत, काहीतरी करार केल्या गेले असतील आणि म्हणून तर शरद पवार हि प्रकरणे लोकांसमोरून गायब झाल्यापासून ते एकमेव मनातून मनापासून चिडलेले आहेत अस्वस्थ आहेत. त्यातल्या त्यात एक बरे झाले कि सुनील तटकरे यांनी मिसेस नाईक आणि त्यांच्या मुलीची उद्धव यांच्याशी नव्हे तर थेट शरद पवार यांच्याशी भेट घडवून आणली म्हणजे फार मोठी मदत उद्धव यांची नाईक कुटुंबाला झाली पण प्रसिद्धी शरद पवार यांना मिळाली, याचे उद्धव यांना नक्की वाईट वाटले असावे… 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Previous Post

माझे शिक्षक : पत्रकार हेमंत जोशी

Next Post

आंबेडकरांनी पुन्हा एक हिरा गमावला… पुरुषोत्तम आवारे पाटील

tdadmin

tdadmin

Next Post

आंबेडकरांनी पुन्हा एक हिरा गमावला... पुरुषोत्तम आवारे पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.