Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

संघ माझा चांगला, विरोधकांना भोवला

हेमंत जोशी by हेमंत जोशी
January 28, 2025
in Corruption, Mantralaya, Politics
0

संघ माझा चांगला, विरोधकांना भोवला :

संघाचे विरोधक संघाला मधुमेहाची उपमा देतात कारण मधुमेहाचा शरीरात शिरकाव झाल्यानंतर हा रोग जसा अख्खे शरीर पोखरून काढतो शरीराचा सत्यानाश करतो तेच रा स्व संघाचे असे विरोधकांचे म्हणणे सांगणे, संघ देखील एखाद्या मोहिमेवर निघाला कि तो आधी मोठ्या खुबीने युक्तीने अंदाज बांधत आधी प्रवेश करतो त्यानंतर हळूहळू विरोधकांना पोखरत त्यांच्या भूमिकेचा कृत्यांचा नायनाट करतो, हिंदुत्वापलीकडे जे जे घडणारे असते त्यावर हल्ला करून शत्रूला कायमस्वरूपी जेरीस आणतो, संघ स्वयंसेवक केवळ वरकरणी अतिशय संयमी शांत असतो तसा दिसतो पण आतून प्रत्येक स्वयंसेवक राष्ट्रप्रेमापोटी पेटून उठलेला असतो, पुढल्या काही वर्षात हेच संघ स्वयंसेवक हे राष्ट्र हिंदुराष्ट्र करून सोडतील त्यानंतर भलेही त्यांना आणखी शेकडो वर्षे कदाचित लागतील पण आधी आशिया खंड त्यानंतर अवघ्या जगात ते नक्कीच हिंदुत्वाचा डंका पेटवून मोकळे होतील. संघाशिवाय राज्याच्या कोणत्याही निवडणुका जिंकणे कठीण आहे हे देवेंद्र फडणवीसांच्या ध्यानात आले किंवा त्यांना ते संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून श्रेष्ठींकडून ध्यानात आणवून देण्यात आले आणि विधानसभेला मग संघ स्वयंसेवकांवर निवडणूक प्रचाराची मोठी जबाबदारी टाकण्यात आली त्यांना त्या प्रचारकार्यात जुंपण्यात आले, पुढल्या केवळ काही महिन्यात परिणाम समोर आले केवळ संघामुळे संपूर्ण राज्यात भाजपासहित अख्य्या महायुतीला घवघवीत यश मिळाले विशेष म्हणजे प्रचाराची धुरा पेलताना भूमिका पार पाडताना कुठल्याही संघ सयंसेवकाने हा भाजपा उमेदवार तो राष्ट्रवादी किंवा सेनेचा उमेदवार असा अजिबात भेदभाव न करता त्यातल्या प्रत्येकासाठी उत्तम नियोजन केले त्यातून महायुती सत्तेत आलीच पण बलाढ्य शत्रूला त्याचवेळी पूर्णतः जमीनदोस्त करण्यात आले…

www.vikrantjoshi.com

संघाला अंडर एस्टीमेट केले तर कोणते वाईट परिणाम भोगावे लागतात हे भाजपाच्या अति हुशार आणि ओव्हर कॉन्फिडन्ट असणाऱ्या विशेषतः दिल्लीतल्या नेत्यांच्याही ते लक्षात आल्याने काहीसे दुर्लक्षित झालेले संघाचे देशातले आणि राज्यातले महत्व अस्तित्व आता पुन्हा वाढल्याचे यानंतर ते कमी होणार नसल्याचे तुमच्या लगेच ते लक्षात येईल. यापुढे संघ पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने सत्तेतल्या समस्त मंत्रिमंडळाचे वैचारिक आदानप्रदान बैठका नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्या आल्या होण्यास सुरुवात झाली आहे. नव्या मंत्रिमंडळात शासकीय नोकरीत असलेले किंवा नसलेले संघाचे कट्टर शिस्तप्रिय स्वच्छ कडवे देशभक्त असलेले स्वयंसेवक प्रामुख्याने भाजपा मंत्र्यांनी घ्यावेत अशा सूचना त्यांना होत्या ज्या लगेच अमलात आणल्या गेल्या आहेत यापुढे मंत्री आस्थापनेवर अनेक असंख्य संघ स्वयंसेवक तुम्हाला स्वीय सहाय्यक खाजगी सचिव विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाल्याचे कानावर पडेल. प्रखर हिंदुत्व आणि जाज्वल्य देशभक्ती केवळ याच प्रगत विचारातून हा स्वागतार्ह बदल कधी नव्हे तो उभ्या राज्याला सुखद धक्का देणारा आहे. संघ भाजपा केवळ प्रखर देशभक्तीला महत्व देतो प्रसंगी त्यांचा कडवा स्वयंसेवक जरी बेशिस्त वागायला लागला आणि तो राजकीय दृष्ट्या कितीही महत्वाचा किंवा ताकदवान असला तरी कट्टर संघ आणि त्यातून तयार झालेले भाजपावाले या पद्धतीच्या नेत्यांचा एका क्षणात तावडे खडसे करून मोकळे होतात हि समस्त महायुतीच्या मंत्र्यांना आणि सत्तेशी संबंधित साऱ्याच शासकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दलालांना माझी सूचना आहे…

आजतागायतच्या समस्त मंत्रिमंडळात किंवा मंत्र्यांच्या सभोवताली तेच ते चेहरे पाहायला मिळायचे जे केवळ देशबुडवे आणि राज्य लुबाडणारे दयानंद चिंचोलीकर पद्धतीचे मंत्री आस्थापनेवर पाहायला मिळायचे, यावेळी पहिल्यांदा केवळ राष्ट्रप्रेमातुन हा बदल देवेंद्र फडणवीसांनी घडवून आणलेला आहे म्हणून मी फडणवीसांना कायम ज्युनियर मोदी असे म्हणतो त्यामुळे ना खाऊंगा ना खाने दूंगा हीच यावेळी मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची भूमिका असल्याने त्यांच्याही सभोवताली कळत नकळत काही जी नावे तुमच्या कानावर पडायची, फडणवीसांनी त्या समस्त मंडळींना दूर केले आहे दूर राहा असे स्पष्ट सांगितले आहे त्यामुळे यापूर्वी जे फडणवीसांचे नाव सांगून विशेषतः शासकीय कार्यालयात धुडगूस घालायचे त्यावर फडणवीसांनी कडक भूमिका नक्की घेतली असल्याने जर चुकून असे नाराज नीरज पद्धतीचे बेरकी दादागिरी करतांना दिसले तर त्यांची तक्रार थेट मुख्यमंत्री कार्यालयात करावी असे मला वाटते. अत्यंत महत्वाचे म्हणजे जेव्हा जेव्हा भाजपा सरकार सत्तेत यायचे तेव्हा फारतर एखाद्या दुसर्या संघ स्वयंसेवकाला मंत्री आस्थापनेवर रुजू करवून घेतल्या जायचे यापुढे मात्र जास्तीत जास्त संघ स्वयंसेवकांनाच मंत्री कार्यालयात रुजू करवून घेण्याच्या सूचना थेट भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिल्या आहेत, पुन्हा तेच कि यापुढे हिंदू राष्ट्र हीच संघ भाजपाची भूमिका असल्याने त्यांच्या संगतीने असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाने देखील प्रेरणा घेत दीर्घकाळ सत्तेत राहण्यासाठी संघाचे अवश्य वेळोवेळी सहकार्य घेतल्यास त्यांना त्याचे भविष्यात मोठे फायदे होतील…

तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Previous Post

Advertising Policy, is this a joke?

Next Post

एमएसआरडीसीचे अनिल गायकवाड, अमेरिकेला का कसे केव्हा जाऊन आले

हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

Next Post

एमएसआरडीसीचे अनिल गायकवाड, अमेरिकेला का कसे केव्हा जाऊन आले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.