Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

नवे नवखे मंत्रिमंडळ : अनेकांना आराम नवख्यांना सलाम

हेमंत जोशी by हेमंत जोशी
December 16, 2024
in Corruption, Mantralaya, Politics
0

नवे नवखे मंत्रिमंडळ : अनेकांना आराम
नवख्यांना सलाम :

फडणवीसांच्या या नव्या नवख्या मंत्रिमंडळातील एकमेव, म्हणाल तर आमदार म्हणाल तर नेता असा होता ज्याला फडणवीस मुख्यमंत्री झाल्या दिवसापासून आपले नाव मंत्रिमडळात असल्याचे पक्के नक्की ठाऊक होते त्यामुळे ते त्यादिवसापासून आनंदात होते निश्चिन्त होते आपल्या आवडीची गाणी ऐकतांना त्यावर ठेका देखील धरत होते, नातवांना खेळवत होते आणि हे नाव आहे होते चंद्रशेखर बावनकुळे यांचे, भाजपा प्रदेशाध्यक्ष झाल्या दिवसापासून सतत धावपळ अनेक संकटे विविध आव्हाने दौरे दररोजच्या नवनवीन कटकटींना दगदगीला मनापासून कंटाळलेले पण तरीही एक नवे नवखे आव्हान पेलणारे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रचंड यशस्वी ठरलेले बावनकुळे, त्यांना आपण मंत्री होणार आहे हे नेमके कळल्याने मनापासून सुखावले होते, कष्टाचे श्रद्धेचे चीज झाल्याने बावनकुळे नक्कीच सुखावले आहेत. काही जोडपी लग्न लवकर करतात पण साधने वापरून पण पोर उशिरा जन्माला घालतात तसे भाजपामध्ये अमुक एखादा निर्णय झटपट एकाच झटक्यात घेतल्या जात नसला तरी बावनकुळे पुढल्या काही काही महिन्यात प्रदेशाध्यक्ष पदावरून सन्मानपूर्वक पायउतार होणार आहेत.टॉपमोस्ट देवेंद्र फडणवीसांनंतर भाजपात प्रदेशाध्यक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे असते अर्थात या पदावर देखील सुधीर मुनगंटीवार विनोद तावडे संजय कुटे पद्धतीच्या काही नेत्यांचा डोळा असला तरीही पुढल्या काही महिन्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष मंत्री न करण्यात आलेले रवींद्र चव्हाण असतील होतील…

www.vikrantjoshi.com

चव्हाणांविषयी पसरविण्यात आलेली कुठलीही अफवा त्यावर विश्वास ठेवणे नको, त्यांच्या सभोवताली विशेषतः सार्वजनिक बांधकाम खात्यात अगदी सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेले हे कंत्राटदार कम पत्रकार सतीश धारप यांचा सततचा वावर असल्याने त्यांना जेव्हा केव्हा रवींद्र चव्हाण मंत्रीमंडळात असतांना प्रति रवींद्र चव्हाण हा दर्जा हि ओळख दिली गेल्याने किंवा त्यांचे महत्व अगदी उघड स्वतः रवींद्र चव्हाण यांनीच उगाच वाढविल्याने, विशेषतः सतीश धारप यांची चव्हाणांच्या खात्यांमध्ये कामकाजामध्ये सततची ढवळाढवळ दादागिरी असल्याने वाढल्याने तसे नेमके पुरावे थेट अमित शाह यांना सतत सांगितल्या पाठविल्या गेल्याने यावेळी फडणवीस यांचे उजवे हात असूनही त्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान दिल्या गेले नाही, या बातमीला कदाचित तसा फारसा अर्थ नसावा म्हणजे सतीश धारप यांची दहशत त्यांचा शासकीय कामकाजात सततचा सहभाग त्यावर आमदारांच्या तक्रारीतून मोठे तथ्य आहे असू शकते पण सतीश धारप यांच्यामुळे रवींद्र चव्हाण यांचे मंत्रिपद हुकले त्यात फारसे तथ्य नाही याउलट नेमके सत्य असे,चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन यांच्या तोडीस तोड जर भाजपाच्या जडणघडणीत कुठल्याही महत्वाच्या निवडणुकांमध्ये ओढवणार्या संकटात त्या देवेंद्र फडणवीसांना मनापासून सहकार्य करीत विधानसभा निवडणुकीत विशेषतः ठाणे जिल्हा आणि अख्या कोकणात फार मोठे सहकार्य केले ते एकमेव रवींद्र चव्हाण यांनी किंबहुना त्यांची पक्ष संघटनेत आणि पक्ष बांधणीत हातून घडलेली अमोल कामगिरी त्यावर विशेषतः मोदी शाह आणि फडणवीस मनापासून खुश झाले आणि त्यांनी चव्हाण यांना बावनकुळे नंतर प्रदेशाध्यक्ष कारण्याचे नक्की केले आहे. चव्हाण यांच्या अथक प्रयत्नातून उत्कृष्ट कामगिरीतून अनेक वर्षानंतर शिवसेनेऐवजी भाजपाचे कोकणात वाढलेले महत्व त्याचे श्रेय अगदी कौतुकाने कधी उघड उघड फडणवीसांनी त्या रवींद्र चव्हाण यांना दिल्याने त्यांचे भाजपा प्रदेश अध्यक्षपद जवळपास नक्की करण्यात आले आहे…

क्रमश: पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Previous Post

मुख्यमंत्री कार्यालय कसे असावे असे नसावे : भाग 1

Next Post

उतावीळ आमदार गुढग्याला बाशिंग

हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

Next Post

उतावीळ आमदार गुढग्याला बाशिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.