Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

महायुती मंत्रिमंडळ : महती माहिती आणि मस्ती

हेमंत जोशी by हेमंत जोशी
August 26, 2024
in Corruption, Mantralaya, Politics
0

महायुती मंत्रिमंडळ : महती माहिती आणि मस्ती :

एखाद्याच्या आयुष्यात जे कधीही घडू नये ते नेमके लीना चंदावरकर आणि रेखा या दोन्ही अभिनेत्री बाबत घडले म्हणजे रेखाचे लग्न दिल्लीतल्या उद्योगपती अग्रवाल यांच्याशी आणि लीना चंदावरकरचे लग्न गोव्यातल्या बांदोडकरांशी झाले खरे पण दोघींचेही पती हनिमून साजरा करण्याआधीच अचानक देवाघरी गेले, अत्यंत वाईट घडले होते. राज्याच्या महायुती संबंधित बहुसंख्य अतृप्त विधान परिषद आणि विधान सभा सदस्यांचे नेमके रेखा आणि लीना सारखे झाले आहे म्हणजे सत्तेशी सारेच संलग्न पण लग्न केवळ 29 आमदारांचे लागले इतर सारेच हात चोळत बसले त्यांना हनिमून साजरा करता आलेला नाही, अगदी सहज शक्य असतांना एकालाही ना महामंडळ मिळाले ना राज्यमंत्रीपद ना मंत्रिमंडळात स्थान मिळाले मग ज्या शिरसाठ पद्धतीच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही त्यांनी खाजगी फायद्याची कामें करवून घेत महायुतीला एवढे बदनाम करून सोडले कि त्याऐवजी या अतृप्त आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले असते तर अधिक परवडले असते, म्हणण्याची वेळ त्यांच्या प्रमुख नेत्यांवर येऊन ठेपली आहे, त्यात सर्वाधिक दुरुपयोग एकनाथ शिंदे यांचा या समस्त आमदारांनी करवून घेतला कधी त्यांच्या राजकीय मजबुरीचा तर कधी त्यांच्या दिलदार वृत्तीचा नेमका गैरफायदा उचलत मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांनी आणि बहुतेक मंत्र्यांनी महायुतीची अनेकदा अक्षरश: बारबाला करून सोडली. मंत्रिमंडळ मर्यादित ठेवण्यात महायुतीच्या नेत्यांची मोठी चूक झाली, काहींना मंत्रिमंडळात स्थान काहींना किमान विविध महामंडळे दिली असती तर सत्ता न मिळालेल्या अनेक प्रमुख आणि प्रभावी आमदारांनी मराठा आंदोलन भडकविण्यात आतून जी मोलाची भूमिका पार पाडली ते कदापि घडले नसते किंवा हर्षवर्धन पाटील पद्धतीने केवळ सत्ता न मिळण्याच्या नाराजीतून पुढल्या काही दिवसात महागळती लागण्याची जी मोठी शक्यता आहे त्याला प्रमुख कारण नेमके हेच कि कित्येकांना विनाकारण सत्तेपासून दूर ठेवण्यात आले…

www.vikrantjoshi.com

अभिषेक बच्चनशी लग्न करण्याआधी हीच ऐश्वर्या रॉय आधी सलमान खान त्यानंतर विवेक ओबेरॉय संगे दिनरात सख्ख्या बायकोसारखी संसार करीत होती पण लग्नाआधी चंचल असलेल्या ऐश्वर्या किंवा त्यापध्दतीच्या तरुणीने लग्नानंतर अगदी खाली मान घालून विवाह केलेल्या नवऱ्यासंगे संसार करावा तसे अजित पवार आणि त्यांच्या गटातल्या बदनाम असलेल्या महाभ्रष्ट ठरलेल्या जवळपास साऱ्याच मंत्र्यांबाबत घडले म्हणजे महायुतीमध्ये मंत्री म्हणून स्थान मिळाल्यानंतर समस्त मंत्र्यांनी कधी नव्हे ते यावेळी सरकारी तिजोरीवर थेट दरोडे न घालता केवळ भुरट्या चोरयांवर समाधान मानले कारण अजित पवारांसहित त्या साऱ्यांना तुरुंगात न जाता त्याआधी ओढवलेल्या संकटातून स्वतःची खुबीने मुक्तता करवून घ्यायची होती म्हणूनच थेट प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ दिलीप वळसे पाटीलांसहित जवळपास साऱ्याच मंडळींनी शरद पवारांची अजिबात इच्छा नसतांना साथ सोडली आणि अजित पवारांची चड्डी मागून घट्ट धरून ठेवली, यापुढे मात्र दादासंगे बाहेर पडलेले बहुसंख्य आमदार आणि नामदार केव्हाही शरद पवारांना पुन्हा एकवार घट्ट मिठी मारून मोकळे होतील. एक गुपित येथे उघड करतो, अजितदादांच्या सोबतीने जे महायुतीमध्ये सामील झाले त्यापैकी फडणवीस शाह आणि थेट मोदी यांना आजच्या तारखेला सर्वाधिक जवळचे कोण, माहित आहे का, कदाचित हे त्या व्यक्तीला नेत्याला मंत्र्याला देखील माहित नसेल तर त्याने आयुष्यात वेळोवेळी अनेकदा जे चंचल निर्णय घेतले, धरसोड केली, पक्ष आणि निष्ठा बदललेल्या तो वेडेपणा निदान यापुढे जरी केला नाही तरीही आयुष्याच्या संध्याकाळी हा नेता ओढवलेल्या समस्त संकटातून मुक्त होईलच पण त्याला पुन्हा एकवार सत्तेतली मोठी संधी नक्की मिळेल आणि त्या नेत्याचे नाव आहे छगन भुजबळ. होय! या दिवसात छगन भुजबळ हे अजित पवार यांच्या पेक्षा काकणभर जास्त नजदिक भाजपातल्या टॉपच्या नेत्यांना आहेत, अतिशय जवळचे आहेत ज्याचा त्यांनी नेहमीची धरसोड वृत्ती उरी न बाळगता कायमस्वरूपी मोठा राजकीय फायदा करून घ्यावा…

पूर्वी आपल्या या राज्यात समस्त नेत्यांमध्ये इंदिरा किंवा राजीव गांधी यांच्या जवळ जाण्यात फार मोठी स्पर्धा असायची, जी स्पर्धा आजही आपल्या या राज्यात आहे महायुतीमध्ये आहे. महायुतीच्या किंवा भाजपाच्या समस्त नेत्यांना प्रत्येकाला नरेंद्र मोदी यांच्याशी थेट जवळीक ठेवायची साधायची असते, आणखी एक धक्कादायक गुपित असे कि सत्तेशी जे नेते किंवा इतर सारेच संबंधित आहेत असतात, राज्यातल्या या प्रत्येकाला त्यातले काही उघड तर काही विरोधी पक्षातले असल्याने अशांना आतून त्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्यक्तिगत संबंध जोपासायचे असतात जे ते जोपासतात त्यात अनेक विविध उद्देश असतात. आता आणखी एक गुपित उघड करतो, महायुतीच्या ज्या नेत्यांशी मोदी आणि शाह यांच्याशी जवळीक आहे किंवा जे फडणवीस वगळता या दोघांच्या खूपच जवळचे आहेत त्यांची क्रमवारी अशी, एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे !! निदान यापुढे जरी विशेषतः धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ या दोघांनी भाजपा नेत्यांशी निर्माण झालेल्या मधुर संबंधात खोडा घातला नाही तर या दोघांनाही त्यातून मोठा राजकीय फायदा शंभर टक्के मिळेल. पुढल्या भागात याच मंत्रिमंडळावर आणखी काही धक्कादायक पुरावे खास तुमच्यासाठी…

तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Previous Post

विधानसभा निवडणूका : अब आयेगा मजा !!

Next Post

राज्याचे राजकारण काहीसे स्फोटक खूपसे खळबळजनक

हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

Next Post

राज्याचे राजकारण काहीसे स्फोटक खूपसे खळबळजनक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.