Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

मैं ऐसा क्यो हू मैं वैसा क्यो हू

हेमंत जोशी by हेमंत जोशी
August 1, 2024
in Corruption, Mantralaya, Politics
0

मैं ऐसा क्यो हू मैं वैसा क्यो हू :

फार पूर्वी आमच्या विदर्भात अग्निहोत्री आडनावाचे एक भिक्षुक होते त्यांनी अनेक मुलींची लग्नें लावून दिली पण त्यांच्या स्वतःच्या पाच मुलींपैकी दोघी शेवटपर्यंत अविवाहित राहिल्या एक विधवा झाली आणि उरलेल्या दोघींचा घटस्फोट झाला. आपल्या नितीन गडकरींचे देखील त्या अग्निहोत्री भटजींसारखे, गडकरींनी देशात अनेक उत्तमोत्तम रस्ते बांधले पण आपल्या या राज्यात त्यांनी गोवा महामार्गाची अवस्था शेवटपर्यंत अविवाहित राहणाऱ्या मुलींसारखी करून ठेवलेली आहे, काही केल्या गोवा महामार्गाचे काम गडकरी प्रभावी मंत्री असून देखील पूर्ण होत नाही कदाचित पूर्ण होणार नाही तिकडे नासिक महामार्ग गेल्या कित्येक वर्षांपासून एखाद्या तरुण विधवेसारखे जगतो आहे आणि जेव्हा बघावे तेव्हा सतत उखडून ठेवलेला गुजराथ महामार्ग टाकून दिलेल्या घटस्फोटित मुली सारखे कसेबसे आयुष्य काढतो आहे, पत्नीशिवाय जगणारा जसे हस्तमैथुन करीत आयुष्य काढतो तसे या गुजराथ महामार्गावरील ये जा करणाऱ्या वाहनांचे, रस्ता पूर्णतः खोदलेला त्यामुळे हि वाहने कशीबशी वाट काढीत स्वतःचे समाधान करून घेतात, गडकरींना याच गुजराथ गोवा आणि नासिक उखडलेल्या महामार्गामुळे म्हणे गेल्या काही वर्षांपासून प्रचंड उचक्यांचा त्रास होतो आहे कारण प्रत्येक वाहनचालक एकतर त्यांच्या नावाने बोटे मोडतो किंवा त्यांना शिवी हासडून पुढे जातो. जसे रणजित देशमुखांनी सुरुवातीला बंधुराज अनिल देशमुखांना राजकारणात आणून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला उद्या भाजपावाले देखील जर विधानसभेला देखील पराभव झाला तर तेच म्हणतील गडकरींना रस्ते विकास मंत्रिपद देऊन आमची आमच्या हातांनी अणकुचीदार दगड स्वतःच्या ढुंगणावर मारून घेतला…

www.vikrantjoshi.com

गंमतीचा भाग सोडा पण राज्यातल्या जनतेचा नितीन गडकरींवर प्रचंड विश्वास आहे वरून याच नितीन गडकरींवर विरोधकांचे देखील मोठे प्रेम आहे म्हणजे राज ठाकरे त्यांना लव्ह यु म्हणतात, तर उद्धव ठाकरे त्यांना अगदी उघड फ्लाईंग किस देऊन मोकळे होतात किंवा शरद पवार तर याच गडकरींना मुठीत न ठेवता मिठीत घ्यायला केव्हाही तयार असतात थोडक्यात आपल्या या लोकप्रियतेचा याच गडकरी यांनी काहीशी मरगळ आलेल्या भाजपा आणि महायुतीला नजदिक येऊन ठेपलेल्या समोर काहीस अंधार दाटून आल्याने विधान सभा निवडणुकीत राज्यातल्या भाजपा महायुतीला निवडून आणण्यासाठी राज्यभर दौरे काढावेत नेहमीच्या खणखणीत भाषणांमधून त्यांनी राज्याला आश्व्स्त करावे कि जसे मी राज्यातले इतर मार्ग आणि महामार्ग दर्जेदार आणि अत्युत्तम केले तेच मी या तिन्ही महामार्गांचे करून दाखविले नाही तर देशाचा मंत्री म्हणून राजीनामा देऊन मोकळा होईल. मिस्टर गडकरी लोकसभेला त्या मोदी आणि शाह यांनी तुम्हाला नेहमीप्रमाणे अंडर एस्टीमेट केले आणि महाराष्ट्रात तुम्हाला फिरू न दिल्यामुळे किंवा नागपुरातच जखडून ठेवल्यामुळे त्याचे वाईट परिणाम भाजपा आणि त्यांना स्वतःला भोगावे लागले अर्थात हा वेगळ्या लेखाचा विषय किमान यावेळी शहा मोदी यांनी फक्त आणि फक्त नागपूरच्या या जोडगळीला प्राधान्य द्यावे, फडणवीस आणि गडकरी या दोघांवर डोळे बंद करून निवडणूक जिंकण्या विश्वास टाकावा, जर फडणवीस आणि गडकरी यांनी तोल गेलेला भाजपा पुन्हा सावरला नाही तर मला पुन्हा पत्रकार हेमंत जोशी म्हणू नका, वेडा म्हणा ठार वेडा म्हणा पगला कही का म्हणा समीर चौगुले म्हणा काहीही म्हणा…

अजितदादा, मला तुमच्यावर राग नाही पण तुमचा कायमस्वरूपी सिनेमातला राजेश खन्ना होऊ नये असे मनापासून वाटते म्हणून अलीकडे मी काही मुद्द्यांवर तुमच्या पाठी लागलोय.पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा मित्रपक्षांपैकी एकनाथ शिंदे यांनी लाज राखली आणि अजित पवारांनी आमची देशात लाज काढली असे अगदी उघड संघ भाजपावाले या दिवसात तुमच्या नावाने बोंबा मारताहेत. अत्यंत महत्वाचे म्हणजे 2019 ला बारामती लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार कांचन कुल यांना 5,23,000 मते मिळाली होती, यावेळी जवळपास तेवढीच मते थेट तुमच्या पत्नीला मिळाली याचा सरळ अर्थ असा कि बारामती लोकसभा मतदार संघात केवळ भाजपाची मते सुनेत्रा पवारांना मिळाली तुमची राजकीय ताकद आता तेथे झिरो आहे, काकांनी तुम्हाला अख्खे खाऊन टाकले आहे किंवा काकांनाच तुमची मोठ्या चलाखीने मदत झाली असेही काही जाणकार माहितगार सांगताहेत,थोडक्यात पत्नीच्या महायुतीच्या विजयासाठी तुम्ही अजिबात सिरीयस नव्हते केवळ कायद्याच्या जाचातून मुक्तता करून घेत काळा पैसा पांढरा करून घेण्यासाठी तुम्ही भाजपचा खुबीने वापर करून घेताहेत असा जो तो भाजपा नेता अगदी उघड बोलतो आहे. अजित पवारांना भाजपा महायुतीमध्ये स्थान देऊन आपण पक्षाचे महायुतीचे पार वाटोळे करून घेतले वरून पवार काका पुतण्याने आपल्याला एखाद्या रखेलीसारखे वापरून घेतले त्यांच्या येण्याने भाजपमध्ये अविश्वासाचे वातावरण तयार झाले असे जो तो म्हणतो आहे तरीही तुम्ही विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतांना महायुतीची घडी बसविण्यासाठी आजही बाहेर पडायला तयार नाही तिकडे स्वतःच्या पक्षासाठी आणि नेतृत्व आणखी फुलविण्यासाठी ते एकनाथ शिंदे दिनरात साधी झोप देखील काढायला तयार नाहीत आणि तुमचे दर्शन पावसाळ्यातल्या सूर्यासारखे त्या मंत्रालया बाहेर सर्वसामान्यांना अजिबात होत नाही. थोडक्यात शरद पवारांनी अजित पवार हा सोडलेला ट्रोजन हॉर्स आहे कि काय असे आता वाटायला लागले आहे. दादा उठा आणि प्रचाराला लागा महायुतीला फाट्यावर मारू नका संकटात टाकू नका…

तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Previous Post

Maharashtra’s MEMS 108 Ambulance Project…

Next Post

जरांगे जरा जपून मनोजकुमार होईल

हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

Next Post

जरांगे जरा जपून मनोजकुमार होईल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.