Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

उठला वेश्यांचा बाजार कामांध ग्राहकांनी बेजार

हेमंत जोशी by हेमंत जोशी
June 6, 2024
in Corruption, Mantralaya, Politics
0

उठला वेश्यांचा बाजार कामांध ग्राहकांनी बेजार :

सुरुवातीपासून जवळपास 56-57 हजार मताधिक्य असणारे आमच्या बांद्रा लोकसभा मतदार संघात ऍडव्होकेट उज्वल निकम हे प्रचंड मताधिक्य घटून केवळ 8-10 हजारांच्या फुटकळ मताधिक्याने पराभूत का झाले त्यावर उत्तर अतिशय सोपे आहे, आपल्या या महाराष्ट्रात शासकीय प्रशासकीय अधिकारी मीडिया आमदार मंत्री असे विविध नेते फुलटाइम व्यावसायिक असतात, भल्या पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत केवळ काळ्या कमाईचा विचार त्यांच्या डोक्यात असतो आणि फावल्या वेळात ते त्यांच्या मूळ व्यवसायाकडे कर्तव्याकडे थोडेफार लक्ष देतात, ज्या वर्षा गायकवाड यांचा आमच्या लोकसभा मतदार संघाशी काडीचाही संबंध नाही, या लोकसभा मतदार संघात त्यांचे साधे वास्तव्य देखील नसतांना या अशा उच्चभ्रू हिंदू मतदारांचे प्राबल्य असलेल्या मतदार संघातून त्या अजिबात प्रचार न करता निवडून येतात विशेष म्हणजे भाजपाचे संपूर्ण मतदार संघावर हुकूमत असतांना देखील त्या निवडून येतात कारण या लोकसभा मतदार संघाशी संबंधित सारेच आमदार पार्टटाइम नेते आहेत आणि फुल टाइम धंदेवाईक आहेत, सत्तेचा दुरुपयोग करून अवाढव्य कमाई करवून देणारे त्यांचे सारेच व्यवसाय आहेत आणि थोड्याफार फरकाने हेच दृश्य महाराष्ट्रात सर्वदूर आहे म्हणजे चंद्रपूर पासून तर थेट गोव्याच्या टोकापर्यंत वर सांगितलेले सारेच्या सारे काळ्या कमाईच्या व्यवसायात सतत गुंतलेले असल्याने ये तो होना ही था !!

www.vikrantjoshi.com

निवडणुकीत भाजपा महायुतीचा मोठ्या पराभवास आणखी एक महत्वाचे कारण, एक घडलेला सत्य किस्सा सांगतो. त्या पत्रकाराचे नाव सांगत नाही पण आता वयोवृद्ध असलेल्या एका दैनिकात शेवटपर्यंत केवळ वार्ताहर म्हणून काम करणार्याने मीडियातल्या इतर बहुतेक दलालांसारखी आयुष्यभर दलाली केली, नेते अधिकारी मंत्री मुख्यमंत्री अनेकांवर मीडियाच्या संघटनेचा खुबीने वापर करीत दबाव आणून कमाईची कामे करवून घेत दरदिवशी घरी बक्कळ काळा पैसा आणण्याशिवाय पत्रकारितेत समाजासाठी कोणतेही योगदान दिले नाही. त्याला एक छुपा षोक होता, लेडीज बार मध्ये जाण्याचा, ठाणे जिल्ह्यातल्या एका विशिष्ट बार मधली एक बारबाला त्याला खूप आवडायची तिच्यावर तो पैसे उधळायचा, अत्यंत धक्कादायक म्हणजे त्याच बारबालेला एक दिवस त्याच्या मुलाने चक्क लग्न करून पत्नी म्हणून घरात आणले नेमके हेच राज्यातल्या विशेषतः भाजपाबाबत फार मोठ्या प्रमाणावर तेही दिल्लीतल्या नेत्यांच्या सांगण्यावरून घडले, ज्यांची जागा तुरुंगात असायला हवी त्यांना महायुतीमध्ये स्थान दिले वरून सत्ता दिली आणि येथेच महायुतीने विशेषतः भाजपाने स्वतःच्या पायावर फार मोठा धोंडा पाडून घेतला. या किळसवाण्या निर्णयावर मतदार रुसले त्यांना नैराश्य आले आणि याच नैराश्येपोटी त्यांनी मतदान केले नाही मतदान करायला ते बाहेर पडले नाही, सहलीला बाहेर निघून गेले…

अर्थात सारे पुरावे पुढे मी व्यापक मांडणार आहेच पण आणखी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा, राज्यातल्या जातीच्या राजकारणाचा, एकही दलित मुस्लिम आणि मराठा तसेच कुणबी मतदाराने विशेषतः भाजपा उमेदवाराला अजिबात मतदान केले नाही वरून हे सारेच मतदार अगदी ठरवून मतदानाला बाहेर पडले आणि भाजपाशिवाय त्यांच्या आवडीच्या उमेदवाराला मतदान करून आले विशेष म्हणजे जरांगे इफेक्ट भाजपाला गोत्यात आणण्यास कारणीभूत ठरला पण याच कुणबी मराठा मतदारांनी एकनाथ शिंदे यांच्या कोट्यातल्या उमेदवारांना मात्र का मतदान केले ते नेमके समजलेले नाही. आपल्या या राज्यात समस्त मुस्लिमांचा सर्वाधिक मोठा शत्रू इतर कोणीही नसून त्यांच्या मनात प्रचंड राग अर्थात उज्वल निकम यांच्याविषयी असणे स्वाभाविक आहे, त्यामुळे उज्वल निकम यांच्या ऐवजी निवृत्ती पोलीस अधिकारी जावेद अहमद यांना उमेदवारी देणे नक्कीच उचित ठरले असते, दुर्दैवाने अहमद यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आणि निकम यांना उमेदवारी देण्यात आली त्यातून सर्वाधिक जहाल प्रचार विशेषतः प्रत्येक मुसलमानांकडून मोठ्या प्रमाणावर केल्या गेला आणि कच्चे लिंबू वर्षा गायकवाड निवडून आल्या त्याचे खापर नक्कीच भाजपा श्रेष्ठींनी त्यांच्या आमदारांवर फोडणे गरजेचे आहे. मित्रांनो, वीर सावरकरांचे शब्द आज पुन्हा अधोरेखित झाले, मला इंग्रजांची भीती नाही, मुस्लिमांची सुद्धा नाही. मला भीती आहे, हिंदुत्वाच्या विरोधात
असलेल्या हिंदूंची…

तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Previous Post

अस्वस्थ करून सोडणारा संघ, न कळणारा न कळलेला संघ

Next Post

पवारांची धूर्त खेळी फडणवीस सुडाचे बळी

हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

Next Post

पवारांची धूर्त खेळी फडणवीस सुडाचे बळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.