Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

पत्रकारांची अधिस्वीकृती कि पत्रकारितेतील विकृती

हेमंत जोशी by हेमंत जोशी
August 31, 2023
in Corruption, Mantralaya, Politics
0

पत्रकारांची अधिस्वीकृती कि पत्रकारितेतील विकृती

जसे नातेवाईकांपैकी, एक नातेवाईक विचाराने खराब असेल तर, तो इतर सर्व नाती खराब करून टाकतो, तुमच्यापैकीही अनेकांना आलेला हा अनुभव असेल तसे मीडियाचे देखील आहे म्हणजे मासळीसारखा एखादा सडका विचार मीडियातल्या एखाद्याकडून रुजवला जातो आणि अख्ख्या मीडियाला त्याची शिसारी आणणारी लागण होते, ज्या कमिटीची अजिबात गरज नाही त्या अधिस्वीकृती समितीचे विनाकारण अवास्तव महत्व निर्माण करण्यात आले आणि राज्याच्या मीडियात नको त्या वादाला विनाकारण तोंड फुटले. अलीकडे पत्रकार यदु जोशी यांनी पत्रकार विनोद जगदाळे यांना चारी मुंड्या चित करून यदु जोशी जेव्हा अधिस्वीकृती समितीवर अध्यक्ष म्हणून निवडून आला पत्रकारितेतला अशोक सराफ आमचा कॉमन मित्र उदय तानपाठक याने सोशल मीडियावर ज्यापद्धतीने त्याचा व यदूंचा एकत्र फोटो टाकला आणि वर्णन केले वाचून बघून वाटले कि जणू काही यदु जोशी यांनी सनी लिओनीला नवऱ्यापासून किंवा एखाद्या मैत्रिणीला मालक विजय दर्डा पासून पळवून आणले. उदय तानपाठक म्हणजे आमच्या कुटुंबातला करण अर्जुन मधला अशोक सराफ, असतो कायम यदूंबरोबर पण मैत्री आमच्याशी, त्यात अशोक कायम अमरीश बरोबर असतो. निवडणुका लढून जिंकण्यात यदु जोशी याचा हमखास सुरुवातीपासून हातखंडा आहे त्याने मोठ्या निवडणुका लढविण्याऐवजी हे असे घाणीत चिवडत बसणे अजिबात योग्य नाही पण उंटाच्या ढुंगणाचा मुका जसा घ्यावा कोणी तसे यदूला सांगावे कोणी…

www.vikrantjoshi.com

राज्य शासनाकडून पत्रकारांना मीडियाला जे ओळख पत्र देण्यात येते त्याला अधिस्वीकृती पत्र इंग्रजीत ऍक्रेडीटेशन कार्ड म्हणतात, जे नेमकी पत्रकारिता सोडून इतर अनेक उद्योग या अधिस्वीकृती पत्राच्या भरवशावर करतात. माझा अनुभव असा त्यांना या पत्राचे अधिक महत्व असते कारण त्यांचे बहुतेक मीडियाचे नको ते उद्योग या भरवशावर हमखास चालतात. मला सांगा समजा रेशन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स किंवा पासपोर्ट किंवा आधार कार्ड इत्यादी इश्यू करण्यासाठी राज्य शासनाने अशी आजतागायत कोणतीही समिती कधी गठीत केल्याचे तुम्हाला आठवते का, अजिबात तशी गरज नाही, यासाठी जशी शासन यंत्रणा सक्षम असते तोच नियम मीडियाला अधिस्वीकृती पत्र देतांना लावणे अत्यावश्यक असतांना मधेच हा असा आगाऊपणा शासनाने करण्याचे विनाकारण डोकेदुखी वाढवून घेण्याची गरज काय, विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे सत्तेत असताना अनुक्रमे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतांना तब्बल सहा वर्षे मुंबई आणि राज्याची अधिस्वीकृती समितीच अस्तित्वात नव्हती, या सहा वर्षात राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने या अधिस्वीकृती समितीचे अतिशय उत्तम कामकाज बघितले, मीडियातल्या कोणत्याही बोगस प्रतिनिधीला त्यांच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता या विभागाने मीडियात काम करणाऱ्या योग्य प्रतिनिधींना हे असे पत्र विनापेक्षा बहाल केले. एखाद्या विधान परिषदेची निवडणूक लढवावी एवढे फालतू अवास्तव महत्व यावेळी आणि आजकाल या अधिस्वीकृती समितीच्या निवडणुकीत विनाकारण निर्माण केल्या जाते ज्यातून फुकाचे हेवेदावे निर्माण होऊन नको त्यांचे अवास्तव महत्व वाढून त्यांची दुकानदारी त्याभरवंशावर सुरु होते, हि भानगड येथेच संपत नाही…

क्रमश: हेमंत जोशी

Previous Post

माझा खुलासा शिंदेंना दिलासा :

Next Post

भाग 2 : पत्रकारांची अधिस्वीकृती कि पत्रकारितेतील विकृती

हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

Next Post

भाग 2 : पत्रकारांची अधिस्वीकृती कि पत्रकारितेतील विकृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.