Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

राज्यातल्या राजकीय घडामोडी भानगडी आणि कुरघोडी…

हेमंत जोशी by हेमंत जोशी
December 11, 2021
in Bureaucracy, Mantralaya, Politics, Social
0
राज्यातल्या राजकीय घडामोडी भानगडी आणि कुरघोडी…

राज्यातल्या राजकीय घडामोडी भानगडी आणि कुरघोडी…

-पत्रकार हेमंत जोशी

माझ्यातल्या प्रदीर्घ राजकीय पत्रकारितेतल्या अनुभवी माणसाला नरेंद्र पवार किंवा चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी बोटावर मोजण्या एवढे नेते यासाठी आवडतात कि पराजयाची किंवा सत्ता हातून गेल्याची काळजी खंत चिंता न करता जे नेते थेट दुसरे दिवसापासून कामाला लागतात म्हणजे बावनकुळे मंत्री होते तेव्हाही आणि आजही ते मंत्री नसतांना किंवा मधल्या काळात साधे आमदार नसतांना देखील सतत राजकीय प्रवाहात स्वतःला झोकून द्यायचे व्यस्त असतात असायचे तेच कल्याण डोंबिवलीच्या माजी आमदाराचे नरेंद्र पवार यांचे त्यांच्यावर भाजपाने अन्याय केला त्यानंतर पवारांनी अपक्ष विधान सभा लढवली त्यात ते पराभूत झाले पुन्हा भाजपमध्येच नरेंद्र सक्रिय झाले आणि आधीपेक्षाही अधिक दमाने खूप जोमाने कामाला लागले त्यातून आजही स्थानिक मतदारांना त्यांचे आमदार कोण नेमके नाव आठवत नाही नेमके नाव माहित नाही कारण त्यांना आजही वाटते कि त्यांचे आमदार नरेंद्र पवार हेच आहेत, नेते नेमके हे असेच असावेत थेट त्या शरद पवार यांच्यासारखे कि जे कायम जीवाची चिंता पर्वा न करता जीवघेणा आजार अंगावर पेलत पूर्वीच्याच उत्साहात काम करतात, राजकीय विरोधकांना नामोहरम करून सोडतात, 12 डिसेंबर म्हणजे शरद पवार 81 पूर्ण करून वयाच्या 82 मध्ये प्रवेश करताहेत, शरद पवारांना त्यांच्या वाढदिवसानिमीत्ते शुभेच्छा त्यांना आपण दीर्घायुष्य चिंतूया, अर्थात असे असले तरी माझे एक अत्यंत महत्वाचे पुढले वाक्य तुम्हीही आपल्या डायरीत नोंद करून ठेवा आणि वाक्य असे कि पुढल्या वाढदिवसाला शरद पवार राजकारणात दूरदूरपर्यंत व्यस्त नसतील ते शंभर टक्के त्यांच्या राजकीय व्यस्ततेतून सन्यास घेऊन किंवा निदान निवृत्ती पत्करून मोकळे होतील तत्पूर्वी शरद पवार साहेब अमेरिकेत जाऊन स्वतःवर इलाज करून मोकळे होतील त्यानंतर हळूहळू म्हणजे पुढल्या वर्षभरात ते मुख्य राजकीय प्रवाहातून बाजूला होतील म्हणून यादिवसात शरद पवार यांची मोठी धडपड सुरु आहे त्यांच्या एका अपयशावर यश मिळविण्याची. होय ! राजकीय निवृत्ती आधी काहीही करून कसेही करून त्यांना सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याचे बघायचे आहे आणि येथेही परमेश्वराने पवारांच्या बाजूने कौल दिल्याचे दिसते आहे म्हणजे तिकडे महाआघाडी सत्तेत येऊन अडीच वर्षे तशीही पूर्ण होत आलेली आहेत त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पहिल्या दिवसापासून त्यांचे प्रकृती स्वास्थ्य आणि करोना महामारी अजिबात साथ देत नसल्याने ते देखील या पदावरून पायउतार होण्याचा सिरीयस विचार करताहेत पण त्यांच्या मनात इतक्यात आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचे नाही त्याऐवजी तातडीने त्यांना धाकट्या चिरंजीवाला राजकारणाच्या शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आणावयाचे आहे…

माझ्या ओळखीचा परवेज नावाचा गृहस्थ नोकरीनिमित्ते दुबईला राहायचा, वर्षातून दोनदा केव्हातरी यायचा तो आला रे आला कि त्याची मुले हेच इतरांना सांगायची कि अब्बू आले आहेत सध्या, आम्हाला खेळवायला आणि आईला लोळवायला, महिनाभर राहून तो निघून जायचा आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या अब्दुलचे मग एवढे परवेजकडे येणे जाणे असायचे कि मुलांना वाटायचे त्यांचा बाबा अब्दुल आहे आणि परवेज केवळ त्यांच्या ओळखीचा आहे. काही महिन्यानंतर हे जर असेच पुढे देखील सुरु राहिले तर या राज्यातल्या जनतेचे अब्दुल आणि परवेज सारखे होईल म्हणजे मतदार किंवा जनता देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री ते आहेत अशी मनाची समजूत करून घेईल आणि उद्धव ठाकरे यांना जनता मुख्यमंत्री आहेत विसरून मोकळी होईल. उद्धव कमी नाहीत हे अगदी सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगत आलोय पण त्यांना करोना महामारी आणि स्वतःचे प्रकृतिस्वास्थ्य अजिबात साथ देत नसल्याने जेथे तेथे त्यांचे दुर्दैव आड येते आहे परिणामी हे राज्य किमान दहा वर्षे तरी चौफेर प्रगतीच्या बाबतीत मागे गेले आहे आणि हीच वस्तुस्थिती आहे. एखाद्या रूपवान तरुण स्त्रीचा तरुण पती जर सतत दवाखान्यात भरती असेल तर शेजारचा एखादा टग्या जसा त्याच्या घरी येऊन मजा मारून जातो तेच सध्या घडते आहे म्हणजे उद्धव यांना स्वतःबाबत अनेक मर्यादा असल्याने काही अतिशय टगे असलेले नेते म्हणा अधिकारी किंवा मंत्री म्हणा सत्तेत प्रचंड मजा मारून मोकळे होताहेत जे वातावरण अतिशय बुद्धिमान, राजकारणात वाक्बगार असलेल्या पण काही कारणांनी मजबूर ठरलेल्या उद्धव यांना देखील अस्वस्थ करून सोडते आहे म्हणून ते तोडगा शोधताहेत पण हवा तसा मनासारखा मार्ग त्यांना अजिबात गवसला नसल्याने त्यांच्या चिंतेत अधिकच भर नक्की पडलेली आहे. आम्हा मीडियाला देवेंद्र फडणवीस यांचे मीडिया प्रमुख केतन पाठक अगदी नियमित देवेंद्र यांच्या दैनंदिन कार्यक्रमाचे जे पत्रक पाठवतात, वाचता वाचता असे वाटत राहते कि या राज्याचे मुख्यमंत्री नेमके कोण आहेत म्हणजे महाआघाडी सत्तेत आहे कि एकमेव एकटे देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत एवढे ते एखाद्या सत्ताधाऱ्यासारखे किंवा एखाद्या लोकमान्य लोकप्रिय मुख्यमंत्र्यासारखे सार्वजनिक व राजकीय जीवनात व्यस्त असतात आणि हे चित्र राज्याच्या हिताच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही कारण राज्याची प्रगती साधतांना कायम सत्ताधारी व्यस्त असावेत आणि चांगली कामे करतांना दिसावेत पण नेमके उलटे घडते फार कमी मंत्री सकारात्मक कार्यात गुंतल्याचे दिसते इतर बहुतेक सारे केवळ व्यसनात किंवा पैसे मिळविण्यात तुडुंब डुबलेले दिसतात….

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Tags: #bjp #sharadpawar #ncp #shivsena #bjp
Previous Post

सहज सुचले म्हणून…

Next Post

Will CM Uddhav Thackeray take charge soon?

हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

Next Post

Will CM Uddhav Thackeray take charge soon?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.