Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

देशमुख प्रकरणी कोण अडकले कोण सटकले : पत्रकार हेमंत जोशी

हेमंत जोशी by हेमंत जोशी
June 29, 2021
in Politics
0
देशमुख प्रकरणी कोण अडकले कोण सटकले : पत्रकार हेमंत जोशी

देशमुख प्रकरणी कोण अडकले कोण सटकले : पत्रकार हेमंत जोशी

भर्तृहरी आपल्या नितीशतकात लिहितो कि काही सज्जन सत्पुरुष असतात, ते आपला स्वार्थ सोडून केवळ दुसऱ्याच्या हितासाठी धडपड करीत असतात. दुसऱ्या प्रकारात सामान्य लोक असतात, जे आपला स्वार्थ बुडणार नसेल तर इतरांना मदत करायला तयार असतात. तिसऱ्या प्रकारातले आपल्या स्वार्थासाठी इतरांचे नुकसान करतात म्हणजे इतरांना छळून लुटून लुबाडून ओरबाडून स्वतःचा स्वार्थ साधतात या लोकांना त्याने मानव राक्षस म्हटले आहे आणि चौथ्या प्रकाराला काय नाव द्यावे त्यालाच प्रश्न पडलेला आहे, अशी माणसे जी कारण नसतांना इतरांना सतत छळतात मानसिक पिळवणूक करतात ज्यात त्यांचा काहीही कोणताही फायदा नसतो केवळ इतरांना छळण्याचा त्रास देण्याचा त्यांचे मनस्वास्थ्य बिघडवण्याचा अस्थिर करण्याचा अशांना विकृत आनंद मिळत असतो. मित्रहो, केवळ आपल्या या राज्याचा आज विचार केला तर पहिल्या प्रकारातली माणसे शोधावी लागतात आणि तिसऱ्या तसेच चौथ्या प्रकारातली माणसे जागोजाग बघायला अनुभवायला मिळतात जागोजाग सापडतात म्हणजे अशी विकृत विक्षिप्त वेडी वाह्यात पण वरचढ ठरणारी ठरलेली माणसे तुम्हाला आम्हाला आपल्या कुटुंबात नातलगात गावात शेजारी नोकरीत समाजात राजकारणात थोडक्यात विविध रूपात जागोजाग पाहायला मिळतात आणि भर्तृहरीचे हे नितीशतक मला येथे त्या तुरुंगाच्या दारात उभ्या असलेल्या अनिल देशमुख आणि देशमुख कुटुंबावरून आठवले. अनिल देशमुख तर माझे हे लिखाण जुने होईस्तो गजाआड असतीलच पण अद्याप काही त्यांच्या घरातले आणि कार्यालयातले सहीसलामत ईडीच्या नजरेआड आहेत तेही गजाआड व्हावे म्हणून हे लिखाण आपल्यासमोर मांडले आहे. लढणे केवळ माझ्या हातात असते, यश किंवा अपयश याचा विचार करायचा नसतो. मित्रहो, तुम्ही फार काही करू नका, अगदी सोप्या भाषेतले भर्तृहरीचे नितीशतक किंवा चक्रधर स्वामींच्या कथा व उपदेश वाचा म्हणजे जीवनाचे नेमके सार अगदी सहज त्यांच्या लिखाणातून समजते…

१९९५ मध्ये शिवसेना भाजपा अपक्ष आमदारांचे म्हणजे युतीचे सरकार सत्तेत आले आणि काटोल विधान सभा मतदार संघातून ज्यांनी त्यांना राजकारणात आणले त्या भावाला म्हणजे रणजित देशमुख यांना कोपऱ्यात ढकलून ते अपक्ष आमदार झाले तत्पूर्वी याच रणजित देशमुख यांनी अनिलबाबू यांना व्यवसायातून राजकारणात आणले आणि नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले तेव्हापासूनच अनिलबाबू समोर दिसणार्या शासकीय संपत्तीवर डल्ला मारायला लागले. जेव्हा केव्हा हे अनिलबाबू आणि त्यांची त्यांच्या महापापात सामील झालेली पायल सलील व ऋषी हि तीन विवाहित मुली मुले न्यायाधीशांसमोर पापांचा पाढा वाचतील सर्वात आधी आपण शाळेत असतांना जी कथा वाचलेली आहे, पद्धतीने अनिलबाबू यांच्या पत्नी व त्यांच्या मुलांच्या आई आरती देशमुख यांच्या कानाचा नक्की चावा घेतील कारण आरती देशमुख यांनी वेळीच जर ऐय्याशी कडे झुकणार्या ऐय्याशी साठी सतत जनतेचे सरकारचे पैसे लुटणार्या पोटच्या मुलांना आणि बदमाश नवऱ्याला आवर घातली असती तर आज या कुटुंबाला केलेल्या पापांचे पाढे भर बाजारात वाचावे लागले नसते. पेज थ्री लाईफ स्टाईलचे अख्ख्या कुटुंबाला आकर्षण त्यात देशमुख कुटुंब अडकत गेले. तुम्हाला काय वाटते हे असे लिहितांना मला विकृत आनंद होतोय ? नाय नो नेव्हर कारण अनिलबाबू माझे आवडते जवळचे मित्र त्यांना वारंवार सांगून बजावून देखील त्यांनी कधी माझे ऐकलेच नाही मंत्री असतांना कायम आपल्या खाजगी सचिवांना म्हणजे कधी गणेश हाके तर कधी राजेंद्र अहिवार आणि यावेळी संजीव पालांडे या मंडळींना हाताशी धरून या नेत्याने आणि त्याच्या या अशा स्टाफने जमा केली ती अवाढव्य अमाप समाप संपत्ती. म्हणून चौकशी तर अनिलबाबूंची ते नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष्य होते तेव्हापासून करायला हवी वाटल्यास अनेकांचे पुरावे मी देतो. हिंदी सिनेमातले डाकू आणि अनिलबाबू छाप नेते मंत्री यांच्यात कमालीचे साम्य असते म्हणजे स्वतःचा तेवढा मतदार संघ सांभाळायचा त्यावर थोडासा खर्च करायचा निवडून यायचे आणि देशाला लुटायचे हे यांचे काम. संजीव पलांडे सारखे अधिकारी तर अख्खी काळी कमाई स्वतःच्या घरी नेतात कारण त्यांना काहीही खर्च नसतो सारे काही अगदी बायकांसहित फुकटात त्यांना मिळत असते. वाचकमित्रहो, काळजी करू नका कारण अमाप समाप काळी कमाई करणाऱ्या प्रत्येकाचा कळत नकळत संजीव पलांडे अनिल देशमुख नक्की एक दिवस होत असतो…

हेच अनिल देशमुख अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री असतांना राजेंद्र अहिवार हा मोस्ट करप्ट सरकारी अधिकारी त्यांचा खाजगी सचिव होता त्यानंतर तो केंद्रीय राज्यमंत्री असतांना रावसाहेब दानवे यांचाही खाजगी सचिव होता पण दानवेंना त्याचे नेमके धंदे कळले त्यांनी त्याला लगेच काढून टाकले. महाआघाडी सरकारात केवळ नशिबाने म्हणजे राष्ट्रवादीत आपापसात मोठी स्पर्धा असल्याने अजिबात कुवत नसलेल्या अनिल देशमुख यांच्याकडे शरद पवारांनी चुकून गृहखाते सुपूर्द केले, वास्तविक छगन भुजबळ यांचे याच खात्यामुळे तुरुंगात जाणे हे अनिलबाबू यांना माहित असूनही ते खाण्यात आणि वागण्यात त्यांच्याही पुढे गेले, ते गृहमंत्री झाले आणि त्याच दरम्यान सरकारी सेवेतून निवृत्त झालेला भामटा राजेंद्र अहिवार पुन्हा अनिलबाबुंच्या कार्यालयात हजर झाला विशेष म्हणजे कायद्यात अजिबात बसत नसतांना त्याला चक्क सायरन असणारी मारुती अर्टिगा कार देण्यात आली ज्यात बसून हाच राजेंद्र अहिवार विविध ठिकाणाहून अनिलबाबुंसाठी व स्वतःसाठी पैशांची वसुली करीत असे आणि संजीव पलांडे यांच्या वसुलीचे काम अनिलबाबू यांच्या कार्यालयातील नाना कातखेडे करीत असे ज्या नाना कातखेडे यांच्या शंभर कोटींच्या मालमत्तेचे पुरावे मी ईडीकडे लवकरच सादर करणार आहे. त्याशिवाय पैशांची वसुली करणारे आणखी दोघे ईडी च्या नजरेतून सुटले आहेत ज्यांना संजीव पलांडे अनिल देशमुख सलील देशमुख ऋषी देशमुख राजेंद्र अहिवार यांचे काळे कारनामे तंतोतंत माहित आहेत ते दोघे आहेत अनिलबाबू यांच्या कार्यालयातले रवी व्हटकर आणि विशाल कदम. त्याशिवाय सलील यांच्या पापात सामील असलेल्या त्यांच्या नागपुरातील काही मित्रांवर याआधीच ईडी ने धाडी घातलेल्या आहेत. विशाल कदम आणि रवी व्हटकर यांच्यापेक्षा सर्वात आधी ईडीने राजेंद्र अहिवार यासी ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केल्यास त्याला नेमके अनिलबाबू आणि कुटुंबीय माहित असल्याने आणखी मोठे घबाड त्यातून बाहेर येईल आणखी काही गंभीर पुरावे त्यातून सापडतील. ऐय्याशी व्यसनाधीनता झटपट श्रीमंत होण्याची वृत्ती त्यातून अनिल देशमुख यांच्यासारखे नेते अडचणीत येत असतात, आज भुजबळ किंवा देशमुख आटोपले उद्या असे अनेक नेते, दलाल व अधिकारी नक्की सापडतील अडकतील. अत्यंत महत्वाचे म्हणजे आधी जे भुजबळ खाजगीत सांगायचे आज तेच अनिलबाबू सांगत सुटले आहेत कि शरद पवार या संकटात आमच्या पाठीशी हवे तसे उभे नाहीत. तुम्हाला काय शरद पवार यांनी सांगितले होते काळी कमाई करायला, कधीच नाही, याउलट शरद पवार यांना अंधारात ठेवून तुम्ही सारे लुच्चे लफंगे नेते हे असे काळे धन मिळवून मोकळे होता, का म्हणून पवारांनी आपले वजन खर्च करावे आणि तुम्हाला या केलेल्या पापातून बाहेर काढावे ?

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Tags: #anildeshmukh #sharadpawar #bjp #shivsena
Previous Post

अंतिम भाग : एकनाथ खडसे इतरांना पडसे : पत्रकार हेमंत जोशी

Next Post

ज्याचे लफडे त्याला ईडी नडे : पत्रकार हेमंत जोशी

हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

Next Post
गच्छंती बहाणा तुरुंगवास निशाणा : पत्रकार हेमंत जोशी 

ज्याचे लफडे त्याला ईडी नडे : पत्रकार हेमंत जोशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.