Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

भाग २ : सरनाईक प्रतापी तरीही दुर्दैवी : पत्रकार हेमंत जोशी

हेमंत जोशी by हेमंत जोशी
June 22, 2021
in Politics
0
भाग २ : सरनाईक प्रतापी तरीही दुर्दैवी : पत्रकार हेमंत जोशी

भाग २ : सरनाईक प्रतापी तरीही दुर्दैवी : पत्रकार हेमंत जोशी

आमदार प्रताप सरनाईक यांनी दिनांक ९ जून रोजी एक पत्र उद्धव ठाकरे यांना लिहिले, वास्तविक ते पत्र त्यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धवजी यांना द्यावे असे अनेकांना वाटत असतांना सरनाईक यांनी मुख्यमंत्री सचिवालयात ते पत्र सादर केले, एकतर सर्वप्रथम हि चौकशी व्हायलाच हवी कि अशी महत्वाची खाजगी पत्रे मुख्यमंत्री सचिवालयातून कशी बाहेर येतात, उद्या आणखी असे एखादे पत्र बाहेर येऊन थेट मुख्यमंत्री अडचणीत येऊ शकतात त्यामुळे आधी चौकशी व्हायला हवी कि हे पत्र बाहेर कसे आले त्यानंतर सदर पात्र फोडणाऱ्याला योग्य ते शासन व्हावे अर्थात थेट उद्धव ठाकरे यांनीच जर ते पत्र जाणूनबुजून मीडिया समोर यायला हवे म्हणून फोडण्याचे आदेश दिले असतील तर याचा सरळ अर्थ असा कि उद्धव ठाकरे यांना प्रताप सरनाईक नकोसे झाले आहेत पण ती शक्यता देखील तशी कमी कारण बसता उठता विशेषतः शिवसेना गोटातून मुख्यमंत्री त्या एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याचे कायम सांगितल्या जाते किंबहुना एकनाथ शिंदे यांचे महत्व कमी करण्यासाठी शिवसेनेतली एक फळी कायम त्यांना बदनाम करण्याचा किंवा ते उद्धव ठाकरे किंवा मातोश्री पासून कसे दूर गेले पद्धतीच्या बातम्या पेरण्यात कायम व्यस्त असते हेच अनेकदा प्रताप सरनाईक यांच्याही बाबतीत कानावर पडते कि उद्धवजी त्यांच्यावर नाराज आहेत तेच मिलिंद नार्वेकर यांच्याही बाबतीत घडते म्हणजे मिलिंद नार्वेकर यांना उद्धव तसेच मातोश्रीवर आता अजिबात स्थान नाही असे आश्वासक शब्द सहज व कायम ऐकायला मिळत असतांना दुसरीकडे मात्र हेच मिलिंद नार्वेकर कसे व केवढे महत्वाचे आपल्या लक्षात येते कारण थेट राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्यात समेट मैत्री घरोबा घडवून आणण्यासाठी याच मिलिंद नार्वेकर यांना राज भवनावर धाडण्यात येते, हे तर नक्की आहे कि मिलिंद आपणहून माननीय राज्यपालांना भेटण्याचा आगाऊपणा नक्की करणार नाहीत त्यांनी आधी उद्धव यांच्याशी सखोल चर्चा करूनच राज्यपालांना भेटून बाजू मांडण्याची मोठी भूमिका पार पाडलेली असेल, थोडक्यात या अफवांवर विश्वास ठेवण्यात अजिबात अर्थ नाही याउलट शिवसेना आणि भाजपा हे कडवे हिंदुत्व मानणारे पक्ष अलीकडे या दोघात मोठी फूट पाडून नेस्तनाबूत करण्याचे कुभांड काहींनी रचल्याचे आणि त्यादृष्टीने बातम्या पेरण्याचे मोठे काम त्यांच्याच हितशत्रूकडून सुरु आहे त्यात मीडियातले काही भामटे सामील असल्याची पण माझी माहिती आहे. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे शिवसेनेत सत्तेत असलेल्यांचे कायम वाट्यावरून भांडणे होतात किंवा एकमेकांविरोधात कारस्थाने मुद्दाम रचली जातात त्यामुळे एकमेकांना मातोश्रीवर बदनाम करणे असे तेथे हमखास घडते, त्यातले नेमके काय घ्यायचे आणि काय सोडून द्यायचे याची अत्यंत चतुर अशा उद्धवजींना सुरुवातीपासून म्हणजे ते शिवसेनेत व्यस्त झाल्यापासूनची सवय आहे…

आमदार प्रताप सरनाईक यांनी पाठवलेले पत्र म्हणजे त्यांनी स्वतः डोके वापरून खेळलेली खेळी असे अजिबात वाटत नाही किंबहुना संजय राऊत यांनी त्यांना हा सल्ला दिलेला असल्याचे माझी माहिती आहे अर्थात मनातली अस्वस्थता आणि भीती हा भाग त्या पत्रात खुबीने व्यक्त झाला आहेच कारण नेते असोत वा अधिकारी ते इतर कोणत्याही चौकशांना फारसे कधी घाबरतांना मी बघितलेले नाहीत पण थेट छगन भुजबळ यांनीच या पद्धतीच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना भेटीदरम्यान नक्की सांगितलेले आहे कि इतर कोणत्याही चौकशांना तुम्ही न घाबरणे ठीक पण ईडीच्या भानगडीत कधी पडू नका ईडी म्हणजे थेट ढुंगणात बांबू, एकदा का घुसला कि निघता निघत नाही आणि प्रताप सरनाईक व छगन भुजबल हि मैत्री तशी फार फार जुनी त्यामुळे ईडीचे मोठे संकट आल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी केवळ प्रताप सरनाईक यांना असे पत्र लिहिण्याचा मौलिक सल्ला संजय राऊत यांनी दिलेला दिसतो. आमदार प्रताप सरनाईक तर एकदम लहान माणूस त्यांच्यासमोर अविनाश भोसले म्हणजे विटीसमोर दांडू किंवा कुमार केतकर समोर गायकवाडांचा खंडू पण आयुष्यात पहिल्यांदा छगन भुजबळ किंवा अविनाश भोसले जेथे ईडीच्या चौकशीसमोर हतबल ठरले काहीसे अस्वस्थ किंवा विचलित झाले तेथे प्रताप सरनाईक घाबरून जाणे अत्यंत स्वाभाविक आहे म्हणून त्यांनी म्हणे एखाद्या महाराजांसारखे प्रकट झाल्यानंतर सामना दैनिकाच्या कार्यालयात संजय राऊत यांची भेट घेऊन त्यानंतर उद्धवजींना पत्र लिहिण्याचे धारिष्ट्य दाखवले. पत्र लांबलचक आहे पण पत्रात उद्धवजींची मुख्यमंत्री या नात्याने अधिक तारीफ केलेली आहे त्यानंतर तुम्ही भाजपाशी कसे जुळवून घ्यावे हे सांगितले आहे. प्रताप यांनी पत्रात तसा उल्लेख केला नसला तरी माझी माहिती अशी कि जे ईडी चे गंडांतर आज माझ्यावर आलेले आहे एक दिवस ते तुमच्यावर येण्याची पण अधिक शक्यता आहे माझी तशी माहिती आहे महत्वाचे म्हणजे किरीट सोमय्या यांनी त्यापद्धतीने पुरावे जमा करण्याचे मोठे काम हाती घेतले आहे हा निरोप देखील प्रताप यांनी ठाकरे यांच्याकडे पोहोचविल्याची माझी माहिती आहे. या अशा सततच्या कुरघोड्या या दिवसात शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत आणि हा प्रकार शिवसेनेत अगदी १९९० पासून कायम सतत घडत आला आहे त्यातूनच तेव्हापासून शिवसेनेत अनेकदा फूट पडली आहे ज्याची उद्धव यांना आता सवय झालेली आहे. त्यांना हे देखील माहित आहे कि प्रताप सरनाईक जसे संजय राऊत यांच्या अत्यंत जवळचे आहेत तसे मेतकूट एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात आहे त्यातून उद्धव शिवसेनेतल्या या गटबाजीकडे गमतीने बघत असतात. वेळीच लक्षात घ्यावे आणि ठाणे जिल्ह्यातली आजची अत्यंत प्रभावी शिवसेना नजीकच्या काळात खिळखिळी होणार नाही याची सेनानेत्यांनी मोठी काळजी घ्यावी…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Tags: #shivsena #uddhavthackeray
Previous Post

सरनाईक प्रतापी तरीही दुर्दैवी : पत्रकार हेमंत जोशी

Next Post

एकनाथ खडसे इतरांना पडसे : पत्रकार हेमंत जोशी 

हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

Next Post
एकनाथ खडसे इतरांना पडसे : पत्रकार हेमंत जोशी 

एकनाथ खडसे इतरांना पडसे : पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.