Vikrant Joshi
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers
No Result
View All Result
Vikrant Joshi
No Result
View All Result

यशस्वी नारद शिवसेना गारद : पत्रकार हेमंत जोशी 

हेमंत जोशी by हेमंत जोशी
May 30, 2021
in Mantralaya, Politics, Social
0
यशस्वी नारद शिवसेना गारद : पत्रकार हेमंत जोशी 
यशस्वी नारद शिवसेना गारद : पत्रकार हेमंत जोशी 
बहुतेक अनेक विविध असंख्य हिंदी सिनेमांचे कथानक काहीसे असे असते कि सिनेमातला खलनायक एखाद्या कुटुंब प्रमुखाला एकतर ठार मारतो किंवा खोट्या आरोपात अडकवून खूप वर्षे तुरुंगात धाडतो आणि त्या कुटुंब प्रमुखाच्या गैरहजेरीत त्याच्या संपत्तीवर कबजा करतो वरून कुटुंब सदस्यांना नोव्हेअर करून मोकळा होतो, असे कितीतरी हिंदी सिनेमातून दाखवतात जे आपल्याला तोंडपाठ झालेले असते. अर्थात सिनेमाच्या कथानकासारखे आपल्याकडे हे असे कितीतरी कुटुंबातून घडते म्हणजे कुटुंबप्रमुख या नात्याचे अस्तित्व नाहीसे झाले कि त्याच्या पाठी असलेल्या मालमत्तेची कुटुंब सदस्यांची व्यवसायाची इतर वाईट नजर ठेवणारे वाट लावून मोकळे होतात. या राज्याचा कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री असतो आहे आणि या कुटुंबप्रमुखाच्या बाहेर जाण्यावर, सर्वसामान्य लोकांना भेटण्यावर त्यांनी स्वतःच फार मोठी बंधने घालून घेतल्याने कुटुंबातील सदस्यांचे म्हणजे सर्वसामान्य जनतेचे हाल सध्या कुत्रे देखील खात नाहीत हि वस्तुस्थिती आहे, कोणी जवळ घ्यायला मदत करायला प्रेमाने बोलायला नेमके समजावून सांगायला नसल्याने विशेषतः मुख्यमंत्र्यांशी थेट संपर्क करणे कठीण होऊन बसल्याने बहुतेकांचे कुटुंबातल्या सदस्यांचे मानसिक संतुलन झपाट्याने बिघडत चालले आहे. उद्धवजी कि देवेन्द्रजी यात नेतृत्व म्हणून किंवा मी एक दीर्घ अनुभवी पत्रकार म्हणून माझी पहिली पसंती बाळासाहेबांचा उद्धव आहे त्यानंतर नक्की देवेंद्र हेच नाव माझ्या जिभेवर आहे…
मराठी माणसाचे अस्तित्व तसेच महत्व टिकून राहण्यासाठी या राज्याला बाळासाहेब छाप नेतृत्वाची दीर्घकाळ गरज आवश्यकता आहे पण बाळासाहेब गेल्यानंतर काही वर्षातच बाळासाहेबांच्या विचारांची धगधगती शिवसेना कुठेतरी गायब झाल्याचे दृश्य विशेषतः मुंबईत आणि राज्यातही पाहायला मिळते आहे. बाळासाहेब असेपर्यंत राज्यातल्या कानाकोपऱ्यात विशेषतः मुंबई महानगरात अडचणीत संकटात सापडलेल्या प्रत्येक बहुतेक मराठी माणसाला सर्वात आधी कोणतेही पोलीस स्टेशन किंवा इतर कोणीही नजरेसमोर न येता साऱ्या मराठीची धाव त्या त्या परिसरातल्या शिवसेना शाखेची त्यासी प्रत्येकासी आठवण व्हायची आणि धाव फक्त आणि फक्त शिवसेना शाखेकडे घेतली जायची कारण शाखेत बसणारे शिवसेनेचे महत्वाचे पदाधिकारी छाती पुढे करून अन्याय झालेल्या मराठी माणसाला त्याच्या संकटातून बाहेर काढायचे विशेषतः अमराठी आणि पाक विचारांच्या बहुसंख्य मुस्लिमांची त्यामुळे मुंबई किंवा राज्यातल्या मराठी माणसाला उठसुठ त्रास देण्याची हिम्मत होत नसे पण महाआघाडी सरकार आले आणि उद्धव व शिवसेना प्रमुख नेत्यांची जणू नसबंदी या महाआघाडीच्या काही धूर्त चतुर नेत्यांनी केली कि काय असे आता वाटायला लागले आहे, अपवाद एकनाथ शिंदे यांच्यासारखे या राज्यातले अगदीच सेनेचे चार दोन नेते जे आजही बाळासाहेब पद्धतीने त्या त्या ठिकाणची ठाणे पद्धतीने शिवसेना पुढे हाकताना दिसताहेत पण ठाण्याचे नेतृव करतांना देखील थेट एकनाथ शिंदे यांच्या देखील अडचणी याच महाआघाडीमुळे वाढल्या आहेत कारण भिवंडी मुंब्रा मीरा रोड सारख्या या ठिकाणच्या जात्यंध मंडळींना आवर घालणे पूर्वीसारखे सोपे राहिलेले नाही. थोडक्यात या राज्यात महाआघाडी सरकार सत्तेवर आले आणि ठाकरे कुटुंब सदस्यांनी मातोश्रीच्या बाहेर पडून जी मुख्यमंत्री किंवा मंत्री होण्यात धन्यता मानली, अतिशय खुबीने शिवसेनेचा खेळ तेथेच खल्लास करण्यात आला ज्याचे वाईट प्रत्येक भाजपा नेत्याला देखील वाटते आहे, राग मनात धरून ठेवून उद्धव ठाकरे यांनी महाआघाडी मध्ये सामील होण्यात मोठी चूक केली आहे…
आजमितीला अतिशय झपाट्याने म्हणजे केवळ १७-१८ महिन्यात म्हणजे महाआघाडी सरकार सत्तेत व अस्तित्वात आल्यानंतर आपण काय बघतो तर या राज्याचे मराठी नेतृत्व पार दुबळे ठरलेले असून त्या नेतृत्वाची जागा अमराठी विशेषतः अतिशय वादग्रस्त मुसलमान नेते घेतांना आपण बघतोय म्हणजे विविध मीडियाच्या माध्यमातून सतत २४ तास बघतांना वाचतांना असे वाटते किंवा कायम असा भास होतो कि पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व हसन मुश्रीफ करताहेत, मराठवाड्याचे नेतृत्व अब्दुल सत्तार करतांना दिसताहेत, मुंबईत अस्लम शेख किंवा सिद्दीकी परिवाराच्या हाती जणू सारी सत्ता अख्खी मुंबई असे बघायला मिळते तर राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यानंतरचे महत्वाचे नेते म्हणून नवाब मलिक यांना सतत अतिशय महत्व देण्यात आल्याचे जाणवते, अबू आझमी यांना महाआघाडीच्या नेत्यांमध्ये विशेष स्थान व मान आहे आणी तिकडे आपल्या नेत्यांचे मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांचे साधे तोंड बघणे देखील शिवसेनेतल्या अगदी प्रमुख मंडळींना देखील दुरापास्त होऊन बसले आहे. बहुसंख्य टगे मुसलमान रस्त्याने असे काही वावरतात कि हे जणू मुस्लिमांचे पाकिस्थान आहे आणि अत्यंत महत्वाची व आतली बातमी तुम्हाला म्हणून सांगतो कि देवेंद्र फडणवीस यांच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांची इत्यंभूत माहिती जशी आमच्याकडे पाठवण्यात येते तशी माहिती एकाचवेळी दोघांकडून म्हणजे शिवसेना भवनातून आणि माहिती व जनसंपर्क विभागाकडून उद्धवजींच्या दिवसभरातल्या कार्यक्रमाची माहिती आम्हाला देण्यात येत असते आणि या महाआघाडीच्या कालखंडात आजपर्यंतची देवेंद्र आणि उद्धव यांची दैनंदिनी जर बघितली तर आजही असे वाटते कि देवेंद्र हेच या राज्याचे प्रमुख आहेत आणि उद्धव यांना जसे जमेल तसे ते अधून मधून करतात इतरवेळी ते काय करतात कुठे असतात हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आणि माझे नेमके हेच आजही सांगणे म्हणणे आहे कि मुख्यमंत्रीपद हे अत्यंत बेरकी व अनुभवी माणसाने सांभाळायचे असते, उद्धवजी आपण हे पद स्वीकारून म्हणजे इतर सिनियर शिवसेना नेत्याला संधी न देता राज्याचे मुख्यमंत्री झालात वरून आदित्य यांना देखील आत घेतले, आपण एकाचवेळी स्वतःची ठाकरे कुटुंबाची मराठी माणसाची शिवसेनेची किंमत कमी करून घेतली, पवारांच्या जाळ्यात तुम्ही अलगद अडकलात, येथे लिहितांना रडू येते पण हेच सांगतो तुमच्या या वागण्याने निर्णयाने मराठी माणूस व राज्यातले हिंदुत्व अडचणीत सापडले आले आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी
Tags: #bjp #congress #ncp #shivsena
Previous Post

सत्याचे प्रयोग : पत्रकार हेमंत जोशी 

Next Post

OFF THE RECORD review on some of the headlines…

हेमंत जोशी

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.

Next Post

OFF THE RECORD review on some of the headlines...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Vikrant Joshi

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

Vikrant Joshi

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!  

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  • विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची…

    The Untold Story of the Fadnavis-Shinde coup !

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Aryan Shahrukh Khan….Naam Toh Suna Hoga!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • CM Eknath Shinde and his entourage…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Will Maharashtra have a new CM?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Ashwajit’s ‘Car’ nama…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home
  • Sample Page

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • Home
  • Politics
  • Bureaucracy
  • Corruption
  • Mantralaya
  • Adhiveshan
  • Social
  • Transfers

© 2021. Website maintain by Tushar Bhambare.